शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

राममंदिराच्या विकासासाठी ११०० कोटीचे बजेट : गोविंददेव गिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:57 IST

Govinddev Giri Maharaj, Ram Mandir अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे ११०० कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील ३०० ते ४०० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देराममंदिराच्या विकासासाठी ११०० कोटीचे बजेट ४०० कोटीत मंदिराचे बांधकामअयोध्या बनणार विश्व सांस्कृतिक राजधानी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे ११०० कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील ३०० ते ४०० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

अयोध्येचा विकास विश्वाची सांस्कृतिक राजधानी अशा तऱ्हेने केला जाणार असून, मंदिर निर्माणासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार असल्याचे महाराजांनी सांगितले. कोरोना संक्रमणामुळे बाधित झालेले काम आता सुरू झाले असून, साडेतीन वर्षात पूर्ण होईल. बांधकामात राजस्थानातील दगडांचा समावेश होणार असून, आंदोलनादरम्यान जमा झालेल्या विटांचा उपयोग भूभाग सपाट करण्यासाठी होणार आहे. मंदिराच्या बाहेर १०८ एकरांचा भाग विकसित केला जाणार असून, तेथे डिजिटल लायब्ररी, प्राथमिक आरोग्य केंद्र, संग्रहालय, मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मारक आदींची उभारणी केली जाईल. प्रभू रामचंद्रांना वैश्विक विनयाचे प्रतीक म्हणून उभारले जाणार आहे. त्यासाठी शेजारील देशांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना श्रीरामाच्या आदर्शाचा पाठ पढविला जाईल, असे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.

 पायव्यावर निर्णय आज, परदेशातून पैसा नको

मंदिर उभारणीसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तेथे खोदकाम करून दगडांचा पायवा तयार केला जाणार आहे. अनेक नामांकित आयआयटी विशेषज्ञांच्या चमूने यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. त्यावर मंगळवारी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच बांधकामासाठी परदेशातून निधी घेतला जाणार नाही. अनेक उद्योगपतींनी मंदिर बांधकामाचा खर्च वहन करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, हे काम सर्वसामान्यांच्या सहयोगातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे गोविंददेव गिरी म्हणाले. पत्रपरिषदेला गोविंद शेंडे, समितीचे उपाध्यक्ष राजेश लोया, रवींद्र बोकारे, प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार उपस्थित होते.

 आंदोलनात ‘तुकडे गँग’

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत. शेतकऱ्यांच्या नावाने तेथे तुकडे गँग उतरली आहे. हे आंदोलन पाकिस्तान व खलिस्तान समर्थकांचे असून, देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आंदोलन उभे झाल्याचा आरोप गोविंददेव गिरी यांनी यावेळी केला. अयोध्येत प्रस्तावित मशिदीकरिता निधीची मागणी झाल्यास, त्यात सहयोग करण्यास तयार आहोत. देशातील बहुतांश मुस्लिम राष्ट्रवादी आहेत. मात्र, काही नेते हिंदू-मुस्लिम ऐक्यात फूट पाडण्याचे कारस्थान रचत असल्याचेही ते म्हणाले.

 

 ११ कोटी लोकांकडून निधी समर्पण

राममंदिराच्या निर्माणासाठी निधी समर्पण अभियानातून ४ लाख गावांतील ११ कोटी लोकांशी संपर्क साधला जाईल. यासाठी देवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेत विदर्भ प्रांत समितीची स्थापना झाली आहे. दहा, शंभर व एक हजार रुपयांचे कूपण नागरिकांकडून त्यांच्या इच्छेनुसार स्वीकारले जाणार आहे. राममंदिर आंदोलनातून संग्रहित झालेले सहा कोटी रुपये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या खात्यात वळते केले जाणार असल्याचे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या