शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

राममंदिराच्या विकासासाठी ११०० कोटीचे बजेट : गोविंददेव गिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:57 IST

Govinddev Giri Maharaj, Ram Mandir अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे ११०० कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील ३०० ते ४०० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देराममंदिराच्या विकासासाठी ११०० कोटीचे बजेट ४०० कोटीत मंदिराचे बांधकामअयोध्या बनणार विश्व सांस्कृतिक राजधानी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे ११०० कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील ३०० ते ४०० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

अयोध्येचा विकास विश्वाची सांस्कृतिक राजधानी अशा तऱ्हेने केला जाणार असून, मंदिर निर्माणासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार असल्याचे महाराजांनी सांगितले. कोरोना संक्रमणामुळे बाधित झालेले काम आता सुरू झाले असून, साडेतीन वर्षात पूर्ण होईल. बांधकामात राजस्थानातील दगडांचा समावेश होणार असून, आंदोलनादरम्यान जमा झालेल्या विटांचा उपयोग भूभाग सपाट करण्यासाठी होणार आहे. मंदिराच्या बाहेर १०८ एकरांचा भाग विकसित केला जाणार असून, तेथे डिजिटल लायब्ररी, प्राथमिक आरोग्य केंद्र, संग्रहालय, मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मारक आदींची उभारणी केली जाईल. प्रभू रामचंद्रांना वैश्विक विनयाचे प्रतीक म्हणून उभारले जाणार आहे. त्यासाठी शेजारील देशांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना श्रीरामाच्या आदर्शाचा पाठ पढविला जाईल, असे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.

 पायव्यावर निर्णय आज, परदेशातून पैसा नको

मंदिर उभारणीसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तेथे खोदकाम करून दगडांचा पायवा तयार केला जाणार आहे. अनेक नामांकित आयआयटी विशेषज्ञांच्या चमूने यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. त्यावर मंगळवारी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच बांधकामासाठी परदेशातून निधी घेतला जाणार नाही. अनेक उद्योगपतींनी मंदिर बांधकामाचा खर्च वहन करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, हे काम सर्वसामान्यांच्या सहयोगातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे गोविंददेव गिरी म्हणाले. पत्रपरिषदेला गोविंद शेंडे, समितीचे उपाध्यक्ष राजेश लोया, रवींद्र बोकारे, प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार उपस्थित होते.

 आंदोलनात ‘तुकडे गँग’

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत. शेतकऱ्यांच्या नावाने तेथे तुकडे गँग उतरली आहे. हे आंदोलन पाकिस्तान व खलिस्तान समर्थकांचे असून, देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आंदोलन उभे झाल्याचा आरोप गोविंददेव गिरी यांनी यावेळी केला. अयोध्येत प्रस्तावित मशिदीकरिता निधीची मागणी झाल्यास, त्यात सहयोग करण्यास तयार आहोत. देशातील बहुतांश मुस्लिम राष्ट्रवादी आहेत. मात्र, काही नेते हिंदू-मुस्लिम ऐक्यात फूट पाडण्याचे कारस्थान रचत असल्याचेही ते म्हणाले.

 

 ११ कोटी लोकांकडून निधी समर्पण

राममंदिराच्या निर्माणासाठी निधी समर्पण अभियानातून ४ लाख गावांतील ११ कोटी लोकांशी संपर्क साधला जाईल. यासाठी देवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेत विदर्भ प्रांत समितीची स्थापना झाली आहे. दहा, शंभर व एक हजार रुपयांचे कूपण नागरिकांकडून त्यांच्या इच्छेनुसार स्वीकारले जाणार आहे. राममंदिर आंदोलनातून संग्रहित झालेले सहा कोटी रुपये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या खात्यात वळते केले जाणार असल्याचे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या