शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

राममंदिराच्या विकासासाठी ११०० कोटीचे बजेट : गोविंददेव गिरी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 22:57 IST

Govinddev Giri Maharaj, Ram Mandir अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे ११०० कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील ३०० ते ४०० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देराममंदिराच्या विकासासाठी ११०० कोटीचे बजेट ४०० कोटीत मंदिराचे बांधकामअयोध्या बनणार विश्व सांस्कृतिक राजधानी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अयोध्येतील राममंदिर परिसराच्या विकासासाठी अंदाजे ११०० कोटी रुपयांचे बजेट निर्धारित केले असून, यातील ३०० ते ४०० कोटी रुपये मंदिराच्या बांधकामात खर्च होणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष गोविंददेव गिरी महाराज यांनी आज पत्रपरिषदेत दिली.

अयोध्येचा विकास विश्वाची सांस्कृतिक राजधानी अशा तऱ्हेने केला जाणार असून, मंदिर निर्माणासाठी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान निधी समर्पण अभियान राबविण्यात येणार असल्याचे महाराजांनी सांगितले. कोरोना संक्रमणामुळे बाधित झालेले काम आता सुरू झाले असून, साडेतीन वर्षात पूर्ण होईल. बांधकामात राजस्थानातील दगडांचा समावेश होणार असून, आंदोलनादरम्यान जमा झालेल्या विटांचा उपयोग भूभाग सपाट करण्यासाठी होणार आहे. मंदिराच्या बाहेर १०८ एकरांचा भाग विकसित केला जाणार असून, तेथे डिजिटल लायब्ररी, प्राथमिक आरोग्य केंद्र, संग्रहालय, मंदिर आंदोलनात बलिदान देणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्मारक आदींची उभारणी केली जाईल. प्रभू रामचंद्रांना वैश्विक विनयाचे प्रतीक म्हणून उभारले जाणार आहे. त्यासाठी शेजारील देशांतील विद्यार्थ्यांना आमंत्रित करून त्यांना श्रीरामाच्या आदर्शाचा पाठ पढविला जाईल, असे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.

 पायव्यावर निर्णय आज, परदेशातून पैसा नको

मंदिर उभारणीसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. तेथे खोदकाम करून दगडांचा पायवा तयार केला जाणार आहे. अनेक नामांकित आयआयटी विशेषज्ञांच्या चमूने यासाठी दोन पर्याय सुचविले आहेत. त्यावर मंगळवारी दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. तसेच बांधकामासाठी परदेशातून निधी घेतला जाणार नाही. अनेक उद्योगपतींनी मंदिर बांधकामाचा खर्च वहन करण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, हे काम सर्वसामान्यांच्या सहयोगातून पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचे गोविंददेव गिरी म्हणाले. पत्रपरिषदेला गोविंद शेंडे, समितीचे उपाध्यक्ष राजेश लोया, रवींद्र बोकारे, प्रशांत तितरे, निरंजन रिसालदार उपस्थित होते.

 आंदोलनात ‘तुकडे गँग’

दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनात शेतकरी नाहीत. शेतकऱ्यांच्या नावाने तेथे तुकडे गँग उतरली आहे. हे आंदोलन पाकिस्तान व खलिस्तान समर्थकांचे असून, देशात अस्थिरता निर्माण करण्यासाठी आंदोलन उभे झाल्याचा आरोप गोविंददेव गिरी यांनी यावेळी केला. अयोध्येत प्रस्तावित मशिदीकरिता निधीची मागणी झाल्यास, त्यात सहयोग करण्यास तयार आहोत. देशातील बहुतांश मुस्लिम राष्ट्रवादी आहेत. मात्र, काही नेते हिंदू-मुस्लिम ऐक्यात फूट पाडण्याचे कारस्थान रचत असल्याचेही ते म्हणाले.

 

 ११ कोटी लोकांकडून निधी समर्पण

राममंदिराच्या निर्माणासाठी निधी समर्पण अभियानातून ४ लाख गावांतील ११ कोटी लोकांशी संपर्क साधला जाईल. यासाठी देवनाथ पीठाधीश्वर आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या अध्यक्षतेत विदर्भ प्रांत समितीची स्थापना झाली आहे. दहा, शंभर व एक हजार रुपयांचे कूपण नागरिकांकडून त्यांच्या इच्छेनुसार स्वीकारले जाणार आहे. राममंदिर आंदोलनातून संग्रहित झालेले सहा कोटी रुपये श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या खात्यात वळते केले जाणार असल्याचे गोविंददेव गिरी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या