शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

जिल्ह्यात ११० पाण्याचे नमुने दूषित; आजाराला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

ग्रामपंचायतींना दिले उपाययोजनांचे निर्देश नागपूर : जिल्ह्यातील ११० ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ...

ग्रामपंचायतींना दिले उपाययोजनांचे निर्देश

नागपूर : जिल्ह्यातील ११० ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ९६७ पाण्याचे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासले होते. पावसाळ्याच्या तोंडावर आढळलेले दूषित पाण्याचे नमुने म्हणजेच आजाराला निमंत्रण देणारे ठरू शकतात. यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने सर्व ग्रामपंचायतींना उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य विभागाकडून दर महिन्याला जिल्ह्यातील पाण्याच्या गुणवत्तेचे नमुने घेतले जातात. हे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतून तपासले जातात. पावसाळ्याच्या तोंडावर प्रयोगशाळेच्या अहवालाला महत्त्व असते. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढू नयेत म्हणून विभागाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जातात. जून महिन्याच्या अहवालात जिल्ह्यातील ११० पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत.

- ७ ग्रामपंचायतींना ‘यलो’ कार्ड

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे १ ते ३० एप्रिलदरम्यान पाणी गुणवत्ता स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १४ ग्रामपंचायतींना यलो कार्ड देण्यात आले होते. त्या ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या स्रोतात त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाने दिले होते. अजूनही ७ ग्रामपंचायतीला ‘यलो कार्ड’ कायम आहे.

- अनुजैविक तपासणीत २५० पाणी नमुण्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत अनुजैविक तपासणी अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ३६०० पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. यात २५० पाणी नमुन्यांत बॅक्टेरियल इन्फेक्शन आढळले आहे.

- तालुकानिहाय दूषित पाणी नमुने

तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने

नागपूर १३३ ३१

मौदा ९४ ६

कुही ७० १

सावनेर ९४ २१

भिवापूर २९ ०

कळमेश्वर ४३ ६

पारशिवनी ९१ ११

उमरेड ५१ २

कामठी १०९ ४

रामटेक ७५ १३

नरखेड ४३ ४

हिंगणा ६२ ४

काटोल २२ ०

देवलापार ५१ ७

- जे स्रोत दूषित असते, त्यांचे क्लोरिनेशन करून निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात येतात. त्या उपाययोजना केल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येते. वर्षात चार वेळा पाणी गुणवत्ता तपासणी होते. त्याचबरोबर पाण्यातील रासायनिक व अनुजैविक तपासणीसुद्धा केली जाते. या सर्व तपासण्या केवळ ग्रामस्थांना शुद्ध आणि शाश्वत पाणी मिळावे हीच अपेक्षा असते.

अनिल किटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

- आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या

आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी वारंवार करण्यात येते. असे असले तरी, पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.

रश्मी बर्वे, अध्यक्ष व आरोग्य सभापती जि.प.