शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११० पाण्याचे नमुने दूषित; आजाराला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:06 IST

ग्रामपंचायतींना दिले उपाययोजनांचे निर्देश नागपूर : जिल्ह्यातील ११० ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ...

ग्रामपंचायतींना दिले उपाययोजनांचे निर्देश

नागपूर : जिल्ह्यातील ११० ठिकाणचे पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत. आरोग्य विभागाने जून महिन्यात जिल्ह्यातील ९६७ पाण्याचे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत तपासले होते. पावसाळ्याच्या तोंडावर आढळलेले दूषित पाण्याचे नमुने म्हणजेच आजाराला निमंत्रण देणारे ठरू शकतात. यासंदर्भात पाणीपुरवठा व स्वच्छता मिशनने सर्व ग्रामपंचायतींना उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत.

आरोग्य विभागाकडून दर महिन्याला जिल्ह्यातील पाण्याच्या गुणवत्तेचे नमुने घेतले जातात. हे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेतून तपासले जातात. पावसाळ्याच्या तोंडावर प्रयोगशाळेच्या अहवालाला महत्त्व असते. दूषित पाण्यामुळे साथीचे आजार वाढू नयेत म्हणून विभागाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जातात. जून महिन्याच्या अहवालात जिल्ह्यातील ११० पाण्याचे नमुने दूषित आढळले आहेत.

- ७ ग्रामपंचायतींना ‘यलो’ कार्ड

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे १ ते ३० एप्रिलदरम्यान पाणी गुणवत्ता स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले होते. या सर्वेक्षणात १४ ग्रामपंचायतींना यलो कार्ड देण्यात आले होते. त्या ग्रामपंचायतींच्या पाण्याच्या स्रोतात त्रुटी आढळल्या होत्या. त्यामुळे त्रुटी दूर करण्याचे निर्देश विभागाने दिले होते. अजूनही ७ ग्रामपंचायतीला ‘यलो कार्ड’ कायम आहे.

- अनुजैविक तपासणीत २५० पाणी नमुण्यात बॅक्टेरियल इन्फेक्शन

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने १ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत अनुजैविक तपासणी अभियान सुरू आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत ३६०० पाण्याचे नमुने तपासण्यात आले आहेत. यात २५० पाणी नमुन्यांत बॅक्टेरियल इन्फेक्शन आढळले आहे.

- तालुकानिहाय दूषित पाणी नमुने

तालुका तपासलेले नमुने दूषित नमुने

नागपूर १३३ ३१

मौदा ९४ ६

कुही ७० १

सावनेर ९४ २१

भिवापूर २९ ०

कळमेश्वर ४३ ६

पारशिवनी ९१ ११

उमरेड ५१ २

कामठी १०९ ४

रामटेक ७५ १३

नरखेड ४३ ४

हिंगणा ६२ ४

काटोल २२ ०

देवलापार ५१ ७

- जे स्रोत दूषित असते, त्यांचे क्लोरिनेशन करून निर्जंतुकीकरण करण्यासंदर्भात ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात येतात. त्या उपाययोजना केल्यानंतर पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येते. वर्षात चार वेळा पाणी गुणवत्ता तपासणी होते. त्याचबरोबर पाण्यातील रासायनिक व अनुजैविक तपासणीसुद्धा केली जाते. या सर्व तपासण्या केवळ ग्रामस्थांना शुद्ध आणि शाश्वत पाणी मिळावे हीच अपेक्षा असते.

अनिल किटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग

- आजारी पडायचे नसेल तर पाणी उकळून प्या

आरोग्य विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या माध्यमातून पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी वारंवार करण्यात येते. असे असले तरी, पावसाळ्याच्या तोंडावर पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून प्यावे.

रश्मी बर्वे, अध्यक्ष व आरोग्य सभापती जि.प.