शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

१०८ वी इंडियन सायन्स काँग्रेस;  ...अन्यथा भविष्यात मातीदेखील नष्ट होईल; राहीबाई पोपेरे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2023 18:28 IST

Nagpur News औषधांच्या वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मातीदेखील नष्ट होईल, असा इशारा सीड मदत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी येथे दिला.

ठळक मुद्देफार्मर सायन्स काँग्रेसचे उद्घाटन

नागपूर : रासायनिक खते, औषधांच्या अति वापरामुळे शेती नष्ट होत आहे. रासायनिक खते, औषधांच्या वापरामुळे रानभाज्या नष्ट झाल्या. याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात मातीदेखील नष्ट होईल, असा इशारा सीड मदत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी येथे दिला. या रासायनिक खतांमुळे विषयुक्त शेती होत आहे. आज आपल्या काळ्या मातीला (शेती) वाचवण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी विषमुक्त शेती पिकविण्याची गरज आहे. तेव्हा विषमुक्त शेती पिकवा आणि माती वाचवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

इंडियन सायन्स काँग्रेसनिमित्त फार्मर सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले हाेते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना अध्यक्षस्थानी होत्या. भारतीय कृषी अनुसंधान संस्थेच्या कोलकाता येथील केंद्रीय मत्स्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. बसंत कुमार दास, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर, डॉ. एस. रामकृष्णन, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, संयोजक डॉ. प्रकाश ईटनकर उपस्थित होते.

राहीबाई पोपेरे म्हणाल्या, सुरुवातीच्या काळात माझ्या कामावर टीका व्हायची, लोक हसायचे. आज ३,५०० महिलांना सोबत घेऊन २०० गावांमध्ये काम सुरू आहे. आपण पैसे देऊन विष खरेदी करतो आणि खातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. यासाठी देशी बियाण्यांचा वापर व त्यापासून मिळणारे उत्पादन वाढले पाहिजे. प्रत्येकाच्या शेतात देशी बियाणे वापरले गेले पाहिजे, गावात विषमुक्त भाजीपाला विकला गेला पाहिजे, तरच पुढची युवापिढी सशक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राहीबाई पोपेरे यांचा सत्कार

बीज माता म्हणून देशभर ओळख असलेल्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा इंडियन सायन्स काँग्रेसच्या वतीने अध्यक्षा डॉ. विजयलक्ष्मी सक्सेना यांच्या हस्ते त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

टॅग्स :agricultureशेतीscienceविज्ञान