शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

१०४ आजारी;योजनेत उधारी

By admin | Updated: March 1, 2016 02:41 IST

तातडीने रक्त हवंय... तर १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करा, अन् वाजवी दरात रक्त मिळवा,...

ए, बी व एबी रक्त गटाचा तुटवडा : तातडीने नव्हे १२ तासानंतर मिळते रक्त सुमेध वाघमारे नागपूरतातडीने रक्त हवंय... तर १०४ या टोल फ्री क्रमांकावर फोन करा, अन् वाजवी दरात रक्त मिळवा, ही महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारकडून सुरू करण्यात आली. परंतु रक्ताच्या तुटवड्यामुळे नागपुरात ही योजना संकटात सापडली आहे. कोणत्याही निगेटिह गटाचे रक्त मिळतच नाही. साधे ‘ए’, ‘बी’, व ‘एबी’ पॉझिटिव्ह गटाचेही रक्त मिळेनासे झाले आहे. या क्रमांकावर रक्ताची तातडीने मागणी केल्यास आता नाही, १०-१२ तासानंतर सांगू, असे उत्तर मिळत आहे. महाराष्ट्र राज्य संक्रमण परिषदेतर्फे जीवन अमृत योजना (ब्लड आॅन कॉल) सुरू करण्यात आली. गरजू रुग्णास दर्जेदार, सुरक्षित रक्त वाजवी दरात तातडीने उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ७ जानेवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. १०४ क्रमांकावर दूरध्वनी केल्यानंतर डागा रुग्णालयाच्या रक्तपेढीवर दूरध्वनी हस्तांतरित करण्यात येतो. त्यानंतर ४० कि.मी. किंवा एक तासाच्या अंतरावरील रुग्णालयांना शीतसाखळीतून रक्त उपलब्ध करून दिले जाते. गर्भवती महिला, अपघातग्रस्त रुग्ण यांना तातडीने रक्त उपलब्ध होणे अपेक्षित आहे. परंतु गेल्या दोन वर्षांत १०४ क्रमांकाचा नागपुरात फार कमी वापर होत असतानाही रक्त मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आधीच येथे मर्यादित मनुष्यबळ त्यातही दिलेले मुनष्यबळ तोकडे, जागेची मर्यादा आणि कम्पोनंट सेप्रेटर यंत्राशिवाय ही योजना सुरू असल्याने या योजनेचा मुख्य उद्देशच मागे पडल्याचे चित्र आहे.योजनेचा लाभ मिळत नसल्याची ओरडडागा रक्तपेढीमध्ये २९ फेब्रुवारी दुपारी ३ वाजेपर्यंत पॉझिटिव्ह ‘ए’ गटात १६, ‘बी’ गटात सहा, ‘एबी’ गटात चार तर ‘ओ’ गटात ३१ रक्त पिशव्या तर निगेटिव्ह ‘ए’ गटात एक, ‘बी’ गटात शून्य, ‘एबी’ गटात एक तर ‘ओ’ गटात केवळ तीन रक्त पिशव्या उपलब्ध होत्या. रक्त पिशव्यांची ही संख्या लाजिरवाणी असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे, याच रक्तपेढीमधून डागा रुग्णालयातील रुग्णांनाही रक्त पुरविले जाते. यातीलच प्रत्येक गटातील पाच रक्त पिशव्या राखीव ठेवल्या जातात. परिणामी, या योजनेचा लाभ मिळत नसल्याची तर काही वेळेत मिळत नसल्याची ओरड होत आहे. या रक्तपेढीत फार कमी रक्त जमा होते. यामुळे विविध गटांच्या रक्ताचा तुटवडा नेहमीच पडलेला असतो. गेल्या काही दिवसांपासून या रक्तपेढीत ‘बी’ पॉझिटिव्ह गटाचे रक्तच नव्हते. परिणामी, सोमवारी मेडिकलच्या रक्तपेढीतून उधारीवर या गटाच्या पाच रक्त पिशव्या मागण्याची वेळ आली. त्या आल्यावर रविवारी ज्या रुग्णांनी मागणी केली होती त्यातील काहीच जणांना सोमवारी पुरवठा करण्यात आल्याची माहिती आहे.(प्रतिनिधी)फोन आलेत १२३१, पुरवठा मात्र ८१८ रुग्णांनाच२०१४ मध्ये ६०३ तर २०१५ मध्ये ६२८ असे एकूण १२३१ फोन येऊन विविध गटातील रक्ताची मागणी करण्यात आली. परंतु २०१४ मध्ये ३१३ तर २०१५ मध्ये ५०५ असा एकूण ८१८ रुग्णांनाच रक्ताचा पुरवठा करण्यात आला आहे. योजना सुरळीत सुरूरक्ताचा तुटवडा असला तरी रक्त उपलब्ध करून दिले जात आहे. विशेष म्हणजे, नागपूर आणि ४० किलोमीटरच्या परिसरातून अद्यापही हवी तशी मागणी नाही. यामुळे आहे त्या स्थितीत ही योजना सुरळीत सुरू आहे.-डॉ. सतीश जयस्वालरक्त संक्रमण अधिकारी, १०४ क्रमांक योजना नागपूर