शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

शेतकरी आंदाेलनाचे १०० दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST

नागपूर : केंद्र शासनाने कृषी कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांच्या विराेधात संयुक्त किसान माेर्चाच्या माध्यमातून दिल्ली येथे सुरू आलेल्या शेतकरी आंदाेलनाला ...

नागपूर : केंद्र शासनाने कृषी कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांच्या विराेधात संयुक्त किसान माेर्चाच्या माध्यमातून दिल्ली येथे सुरू आलेल्या शेतकरी आंदाेलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात शेतकरी आंदाेलनाला व्यापक समर्थनही मिळाले. काही अंशी या आंदाेलनाला अप्रत्यक्षरीत्या विराेधही हाेत आहे. काेराेना संक्रमण काळात बहुतांश उद्याेग आर्थिक अडचणी सापडले असताना शेतीने मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी दिली आहे. देशासह राज्याचे महसुली उत्पन्न घटत असताना अर्थव्यवस्थेतील शेतीचा आर्थिक वाटा मात्र वाढत राहिला आहे. इतर उद्याेगांप्रमाणे शेतीकडे उद्याेगाच्या दृष्टिकाेनातून बघितले जावे, शेती क्षेत्रात सकारात्मक सुधारणा व्हाव्यात, शेतमाल बाजारातील सरकारचा हस्तक्षेप कमी असावा हा एक, तर शेतमाल बाजारातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहावे, शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीला कायद्याचे संरक्षण मिळावे, शेतमाल बाजारातील सरकारचा हस्तक्षेप कमी झाल्यास व्यापारी शेतकऱ्यांना लुटतील हा दुसरा मतप्रवाह या आंदाेलनाच्या निमित्ताने पुढे आला आहे.

राज्यात तत्कालीन काँग्रेस सरकारने करार शेतीला मान्यता दिली आहे. शिवाय, केंद्रातील यूपीए सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीसंदर्भात माॅडेल ॲक्टला मंजुरी दिली आहे. यूपीएचे तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम व एनडीएचे तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा कालबाह्य झाल्याचे वक्तव्य लाेकसभेत केले हाेते. परंतु, या कायद्यात कुणीही सुधारणा घडवून आणल्या नाहीत.

आंदाेलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. आम्ही या कायद्याच्या बाजूने आहाेत. सरकारच्या बाजूने नाही. केंद्र शासनाने या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणा स्व. शरद जाेशी यांनी २००१ साली केंद्र सरकारला सादर केलेल्या टास्क फाेर्स ऑफ ॲग्रिकल्चरच्या शिफारशींवर बव्हंशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांना बाजारासाेबतच तंत्रज्ञान स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. शासनाने सर्व शेतमाल अत्यावश्यक वस्तू कायद्यातून कायम वगळायला हवा. कल्याणकारी राज्य म्हणून शासनाने जनता व शेतकऱ्यांना समजून घ्यायचे की नाही, हा त्यांचा भाग आहे.

- वामनराव चटप,

शेतकरी नेते तथा माजी आमदार, राजुरा, जिल्हा चंद्रपूर.

...

या तिन्ही कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे भले हाेणार नाही. देशात कुठेही शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नाही. केंद्र शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार लाख टन उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतमालाच्या आयातीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. जगात पूर्णपणे बाजार व्यवस्थेवर जगणारा एकही देश नाही. देशातील अन्नसुरक्षा लक्षात घेता व्यापारी शेतमालाला भाव देतील, याबाबत शंका आहे. सरकारने शेतकरी नेत्यांसाेबत एमएसपी कायद्याबाबत चर्चा करायला पाहिजे.

- विजय जावंधिया,

शेतकरी नेते.

...

हे शेतकऱ्यांचे आंदाेलन आहे. शासनाने शेतकऱ्यांना सन्मान देऊन त्यांच्या समस्या सामाेपचाराने साेडवायला पाहिजे. देशभरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांचे उत्पन्न व उत्साह वाढेल, इतर प्रगत देशांप्रमाणे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, यादृष्टीने शासनाने नियाेजन करून धाेरणे राबवायला पाहिजे.

- श्रीधर ठाकरे,

कार्यकारी संचालक, महाऑरेंज.

...

आंदाेलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढायला पाहिजे. मात्र, तशी सरकारची इच्छा दिसत नाही. सरकारकडून अप्रत्यक्षरीत्या शेतकरी आंदाेलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब शेतकरी व लाेकशाहीसाठी घातक आहे.

- सुधीर काेठारी,

संचालक, मुंबई बाजार समिती व कापूस पणन महासंघ.

...

हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. राज्यात २००५-०६ साली करार शेतीला सुरुवात झाली. करार शेतीमुळे शेतमालाचा दर्जा उंचावण्यास मदत हाेते. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही व कुणालाही विकण्याची मुभा असावी. जर कुणी वाजवीपेक्षा अधिक साठेबाजी करीत असेल तर शासनाने कारवाई करावी. शिवाय, शासनाने एमएसपीचा कायदा करावा.

- रमेश जिचकार,

सीईओ, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, वरुड, जिल्हा अमरावती.