शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : टीम इंडियाच्या ५ शतकांवर फेरलं पाणी! हेडिंग्लेचं मैदान मारत इंग्लंडची मालिकेत आघाडी
2
अमेरिका-कतार भूमिकेचे स्वागत, संवादास पर्याय नाही; इराण-इस्रायल युद्धविरामावर भारताचे भाष्य
3
ENG vs IND : टीम इंडिया कुठं कमी पडली? जाणून घ्या हेडिंग्लेच्या मैदानातील पराभवामागची पाच कारणं
4
“शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, शक्तिपीठ महामार्ग आम्ही कदापि होऊ देणार नाही”; राजू शेट्टी ठाम
5
अहमदाबाद विमान अपघातात किती लोकांचा मृत्यू झाला? सरकारने जाहीर केली अधिकृत आकडेवारी
6
“मला शक्य तितक्या लवकर सर्वकाही शांत झालेले पाहायचे आहे”; ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
हल्ला थांबवू शकत नाही, इराणला प्रत्युत्तर देणे गरजेचे..; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर नेतन्याहूंचे उत्तर
8
ENG vs IND : अंपायरसमोर जड्डूचं तेवर! विकेटमागून पंतनही घेतली फिरकी! मैदानात नेमकं काय घडलं?
9
“देशभरात मराठी भाषा लागू करणार का?”; हिंदी सक्तीवरुन मनोज जरांगेंचा सरकारला थेट सवाल
10
ENG vs IND : शार्दुल ठाकूरची कमाल! २ चेंडूत २ विकेट्स घेत टेस्ट मॅचमध्ये आणलं ट्विस्ट
11
Viral Video : एक बाईक अन् १० लोक! दुचाकीस्वाराचा जुगाड बघून डोकं चक्रावेल
12
ENG vs IND : प्रसिद्ध कृष्णानं बॅक टू बॅक ओव्हरमध्ये २ विकेट्स मिळवत टीम इंडियाला दिला मोठा दिलासा
13
शक्तिपीठ महामार्गाला मंजुरी, २० हजार कोटींची तरतूद; GSTत बदल होणार, मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय
14
“वायनाडमध्ये वाढलेले मतदार लोकशाही, महाराष्ट्रात वाढले तर चोरी?”; BJPचा राहुल गांधींना सवाल
15
“झूठ बोले कौवा काटे”; राहुल गांधींच्या आरोपांना CM फडणवीसांचे उत्तर, सगळी आकेडवारीच दिली
16
मुंबईतील बड्या उद्योजकाचे गुप्त ‘महादान’; अयोध्येतील राम मंदिराला तब्बल १७५ किलो सोने अर्पण
17
यशस्वी जैस्वाल पुन्हा चुकला! चौथा कॅच सोडला अन् इंग्लंडला दुसरा शतकवीर मिळाला
18
EPFO ची मोठी घोषणा; आता मिळणार ५ लाख रुपयांपर्यंतचा अ‍ॅडव्हान्स PF, जाणून घ्या...
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इस्रायलने केला इराणवर हल्ला, तेहरान स्फोटांनी हादरले!
20
आधी सेलिब्रेशन! आता 'रेड अलर्ट' Look सह शुबमन गिलमध्ये दिसली विराटची झलक

शेतकरी आंदाेलनाचे १०० दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST

नागपूर : केंद्र शासनाने कृषी कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांच्या विराेधात संयुक्त किसान माेर्चाच्या माध्यमातून दिल्ली येथे सुरू आलेल्या शेतकरी आंदाेलनाला ...

नागपूर : केंद्र शासनाने कृषी कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणांच्या विराेधात संयुक्त किसान माेर्चाच्या माध्यमातून दिल्ली येथे सुरू आलेल्या शेतकरी आंदाेलनाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात शेतकरी आंदाेलनाला व्यापक समर्थनही मिळाले. काही अंशी या आंदाेलनाला अप्रत्यक्षरीत्या विराेधही हाेत आहे. काेराेना संक्रमण काळात बहुतांश उद्याेग आर्थिक अडचणी सापडले असताना शेतीने मात्र देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी दिली आहे. देशासह राज्याचे महसुली उत्पन्न घटत असताना अर्थव्यवस्थेतील शेतीचा आर्थिक वाटा मात्र वाढत राहिला आहे. इतर उद्याेगांप्रमाणे शेतीकडे उद्याेगाच्या दृष्टिकाेनातून बघितले जावे, शेती क्षेत्रात सकारात्मक सुधारणा व्हाव्यात, शेतमाल बाजारातील सरकारचा हस्तक्षेप कमी असावा हा एक, तर शेतमाल बाजारातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अस्तित्व अबाधित राहावे, शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीला कायद्याचे संरक्षण मिळावे, शेतमाल बाजारातील सरकारचा हस्तक्षेप कमी झाल्यास व्यापारी शेतकऱ्यांना लुटतील हा दुसरा मतप्रवाह या आंदाेलनाच्या निमित्ताने पुढे आला आहे.

राज्यात तत्कालीन काँग्रेस सरकारने करार शेतीला मान्यता दिली आहे. शिवाय, केंद्रातील यूपीए सरकारने कृषी उत्पन्न बाजार समितीसंदर्भात माॅडेल ॲक्टला मंजुरी दिली आहे. यूपीएचे तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदंबरम व एनडीएचे तत्कालीन अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी अत्यावश्यक वस्तू कायदा कालबाह्य झाल्याचे वक्तव्य लाेकसभेत केले हाेते. परंतु, या कायद्यात कुणीही सुधारणा घडवून आणल्या नाहीत.

आंदाेलन करणे हा शेतकऱ्यांचा अधिकार आहे. आम्ही या कायद्याच्या बाजूने आहाेत. सरकारच्या बाजूने नाही. केंद्र शासनाने या कायद्यांमध्ये केलेल्या सुधारणा स्व. शरद जाेशी यांनी २००१ साली केंद्र सरकारला सादर केलेल्या टास्क फाेर्स ऑफ ॲग्रिकल्चरच्या शिफारशींवर बव्हंशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांना बाजारासाेबतच तंत्रज्ञान स्वातंत्र्य देणे गरजेचे आहे. शासनाने सर्व शेतमाल अत्यावश्यक वस्तू कायद्यातून कायम वगळायला हवा. कल्याणकारी राज्य म्हणून शासनाने जनता व शेतकऱ्यांना समजून घ्यायचे की नाही, हा त्यांचा भाग आहे.

- वामनराव चटप,

शेतकरी नेते तथा माजी आमदार, राजुरा, जिल्हा चंद्रपूर.

...

या तिन्ही कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे भले हाेणार नाही. देशात कुठेही शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळत नाही. केंद्र शासनाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चार लाख टन उडीद डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. शेतमालाच्या आयातीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडतात. जगात पूर्णपणे बाजार व्यवस्थेवर जगणारा एकही देश नाही. देशातील अन्नसुरक्षा लक्षात घेता व्यापारी शेतमालाला भाव देतील, याबाबत शंका आहे. सरकारने शेतकरी नेत्यांसाेबत एमएसपी कायद्याबाबत चर्चा करायला पाहिजे.

- विजय जावंधिया,

शेतकरी नेते.

...

हे शेतकऱ्यांचे आंदाेलन आहे. शासनाने शेतकऱ्यांना सन्मान देऊन त्यांच्या समस्या सामाेपचाराने साेडवायला पाहिजे. देशभरातील शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यांचे उत्पन्न व उत्साह वाढेल, इतर प्रगत देशांप्रमाणे आपल्या देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल, यादृष्टीने शासनाने नियाेजन करून धाेरणे राबवायला पाहिजे.

- श्रीधर ठाकरे,

कार्यकारी संचालक, महाऑरेंज.

...

आंदाेलन करणे प्रत्येकाचा अधिकार आहे. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करून यातून मार्ग काढायला पाहिजे. मात्र, तशी सरकारची इच्छा दिसत नाही. सरकारकडून अप्रत्यक्षरीत्या शेतकरी आंदाेलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही बाब शेतकरी व लाेकशाहीसाठी घातक आहे.

- सुधीर काेठारी,

संचालक, मुंबई बाजार समिती व कापूस पणन महासंघ.

...

हे कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत. राज्यात २००५-०६ साली करार शेतीला सुरुवात झाली. करार शेतीमुळे शेतमालाचा दर्जा उंचावण्यास मदत हाेते. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही व कुणालाही विकण्याची मुभा असावी. जर कुणी वाजवीपेक्षा अधिक साठेबाजी करीत असेल तर शासनाने कारवाई करावी. शिवाय, शासनाने एमएसपीचा कायदा करावा.

- रमेश जिचकार,

सीईओ, श्रमजीवी नागपुरी संत्रा उत्पादक कंपनी, वरुड, जिल्हा अमरावती.