शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात डेंग्यूने घेतला १० वर्षीय चिमुकलीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 10:20 IST

उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या १०० वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. परंतु प्रशासन डेंग्यूला घेऊन गंभीर नसल्याचे चित्र आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही. कमीतकमी आकडेवारी दाखवून प्रशासन काय सिद्ध करू पाहतेय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यूला सर्वाधिक लहान मुले व वृद्ध व्यक्ती बळी पडत आहेत.बहुतांश लहान मुलांच्या इस्पितळांमध्ये याच आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या रुग्णाकडे संशयित डेंग्यूचे रुग्ण म्हणून पाहते. त्यांच्याकडील ‘एलायझा टेस्ट’ पॉझिटिव्ह आल्यावरच अशा रुग्णांची नोंद ठेवते. तर खासगी डॉक्टर ‘रॅपिड टेस्ट’सारख्या प्राथमिक चाचणी करून डेंग्यू म्हणूनच उपचार करतात.परिणामी, अर्धे नागपूर डेंग्यूच्या प्रकोपात असताना मनपाच्या आरोग्य विभागात १०० वर रुग्णांची नोंद आहे तर एकाही मृत्यूची नोंद नाही. काचीपुरा येथील रहिवासी १० वर्षीय वैष्णवी दीपक सोरगे हिचा मृत्यू मेडिकलमध्ये १० सप्टेंबर रोजी झाला. डॉक्टरांनी मृत्यूसाठी डेंग्यू हे कारण लिहिले असतानाही मनपाकडे याची नोंद नाही; असे कितीतरी मृत्यू व रुग्णांची नोंद महापालिका घेत नसल्याचे वास्तव आहे.

चार दिवसांनी मिळतो ‘एलायझा’ चाचणीचा अहवालशहरात डेंग्यूच्या रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही रु ग्णांचा मृत्यूही होत असताना महापालिका डेंग्यूचा प्रकोप नसल्याचा दावा करीत आहे. खासगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रु ग्णांची माहिती मनपाला देणे बंधनकारक आहे. मात्र याविषयी अनेक खासगी इस्पितळे अद्यापही मौन बाळगून आहेत. मनपाच्या ‘एलायझा’चाचणीचा अहवाल साधारण चार-पाच दिवसानंतर येतो. परिणामी रुग्णांवर तत्काळ उपचाराची दिशा स्पष्ट होत नसल्याचे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे घराघरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असतानाही मनपा कारवाई करीत नसल्याने अशा दूषित घरांची संख्या वाढत आहे.

मनपाकडून डेंग्यू रुग्णांची उपेक्षाशहराची लोकसंख्या ३० लाखावर गेली असताना महापालिका फक्त तीन रुग्णालयांतून आरोग्य सेवा देत आहे. त्यांच्या मदतीला असे एकूण २९ बाह्यरुग्ण विभाग आहेत, मात्र कुठेच डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार होत नाही. उपचारासाठी रुग्ण आल्यास त्याला थेट मेयो, मेडिकलकडे पाठविले जाते.

टॅग्स :dengueडेंग्यूGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय