शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

नागपुरात डेंग्यूने घेतला १० वर्षीय चिमुकलीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 10:20 IST

उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही.

ठळक मुद्देरुग्णांची संख्या १०० वर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत घराघरांमध्ये डेंग्यूसंशयित रुग्ण आढळून येत आहेत. शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये या आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. परंतु प्रशासन डेंग्यूला घेऊन गंभीर नसल्याचे चित्र आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या १० वर्षीय चिमुकलीचा बळी गेला तरी या मृत्यूची नोंद शासनदरबारी नाही. कमीतकमी आकडेवारी दाखवून प्रशासन काय सिद्ध करू पाहतेय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.एकीकडे सण उत्सवाचे वातावरण असताना दुसरीकडे डेंग्यू गंभीर रूप धारण करीत आहे. डेंग्यूला सर्वाधिक लहान मुले व वृद्ध व्यक्ती बळी पडत आहेत.बहुतांश लहान मुलांच्या इस्पितळांमध्ये याच आजाराचे सर्वाधिक रुग्ण आहेत. महानगरपालिकेचा आरोग्य विभाग या रुग्णाकडे संशयित डेंग्यूचे रुग्ण म्हणून पाहते. त्यांच्याकडील ‘एलायझा टेस्ट’ पॉझिटिव्ह आल्यावरच अशा रुग्णांची नोंद ठेवते. तर खासगी डॉक्टर ‘रॅपिड टेस्ट’सारख्या प्राथमिक चाचणी करून डेंग्यू म्हणूनच उपचार करतात.परिणामी, अर्धे नागपूर डेंग्यूच्या प्रकोपात असताना मनपाच्या आरोग्य विभागात १०० वर रुग्णांची नोंद आहे तर एकाही मृत्यूची नोंद नाही. काचीपुरा येथील रहिवासी १० वर्षीय वैष्णवी दीपक सोरगे हिचा मृत्यू मेडिकलमध्ये १० सप्टेंबर रोजी झाला. डॉक्टरांनी मृत्यूसाठी डेंग्यू हे कारण लिहिले असतानाही मनपाकडे याची नोंद नाही; असे कितीतरी मृत्यू व रुग्णांची नोंद महापालिका घेत नसल्याचे वास्तव आहे.

चार दिवसांनी मिळतो ‘एलायझा’ चाचणीचा अहवालशहरात डेंग्यूच्या रु ग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही रु ग्णांचा मृत्यूही होत असताना महापालिका डेंग्यूचा प्रकोप नसल्याचा दावा करीत आहे. खासगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रु ग्णांची माहिती मनपाला देणे बंधनकारक आहे. मात्र याविषयी अनेक खासगी इस्पितळे अद्यापही मौन बाळगून आहेत. मनपाच्या ‘एलायझा’चाचणीचा अहवाल साधारण चार-पाच दिवसानंतर येतो. परिणामी रुग्णांवर तत्काळ उपचाराची दिशा स्पष्ट होत नसल्याचे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. दुसरीकडे घराघरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असतानाही मनपा कारवाई करीत नसल्याने अशा दूषित घरांची संख्या वाढत आहे.

मनपाकडून डेंग्यू रुग्णांची उपेक्षाशहराची लोकसंख्या ३० लाखावर गेली असताना महापालिका फक्त तीन रुग्णालयांतून आरोग्य सेवा देत आहे. त्यांच्या मदतीला असे एकूण २९ बाह्यरुग्ण विभाग आहेत, मात्र कुठेच डेंग्यूच्या रुग्णांवर उपचार होत नाही. उपचारासाठी रुग्ण आल्यास त्याला थेट मेयो, मेडिकलकडे पाठविले जाते.

टॅग्स :dengueडेंग्यूGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय