शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

राज्य शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’

By admin | Updated: February 2, 2016 02:37 IST

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’ (दावा खर्च) बसवला.

हायकोर्टाचा आदेश : विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरणनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात राज्य शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’ (दावा खर्च) बसवला.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व विनय देशपांडे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. योगेश बगाती असे मृताचे नाव असून तो रामदेवबाबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. योगेशचा अकस्मात मृत्यू झाला नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा करून त्याचे वडील रोशनलाल बगाती यांनी याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला आहे. तपासावर लक्ष ठेवण्यासाठी प्रकरणावर नियमित सुनावणी निश्चित केली जात आहे. याचिकाकर्ते रोशनलाल जम्मू आणि कश्मीर येथील रहिवासी आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्यांचे वकील एम.के. पंडित दिल्लीहून नागपूरला येतात. ७ डिसेंबर २०१५ रोजी त्यांनी हा प्रवास परवडत नसल्याचे न्यायालयाला सांगितले होते. यामुळे न्यायालयाने शासनाला प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी ३० जानेवारी २०१६ पर्यंत १० लाख रुपये न्यायालयात जमा करण्याचे निर्देश देऊन सुनावणी १ फेब्रुवारी रोजी निश्चित केली होती. त्यानुसार हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले असता शासनाच्या वकिलाने १० लाख रुपये जमा करण्यासाठी आणखी एक महिना वेळ मागितला. यामुळे न्यायालयाने संतप्त होऊन शासनावर १० हजार रुपये ‘कॉस्ट’ बसवला आणि रक्कम जमा करण्यासाठी एक महिन्याचा वाढीव वेळ मंजूर केला. ‘सीबीआय’तर्फे अ‍ॅड. एस.बी. अहिरकर यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)अशी आहे पार्श्वभूमीमयत योगेश शिक्षणासाठी नागपुरात रहात होता. १६ नोव्हेंबर २०१२ रोजी एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीतील राय टाऊन येथील एका घराच्या छतावर योगेश मृतावस्थेत आढळून आला होता. आदल्या रात्री त्याने मित्रांसोबत पार्टी केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली. यावर रोशनलाल यांचा आक्षेप आहे. पोलिसांनी गैरप्रकार केला आहे. कोणताही सबळ पुरावा नसताना योगेशचा मृत्यू विषामुळे झाल्याचा चुकीचा निष्कर्ष काढला आहे. योगेशच्या मोबाईलमधील महत्त्वाची माहिती खोडण्यात आली आहे. मित्रांचे बयान नोंदविण्यात आले नाही. पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचे रोशनलाल यांचे म्हणणे आहे.