शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१० टक्के ज्येष्ठांना ‘स्मृतिभं्रश’

By admin | Updated: September 19, 2014 00:52 IST

साठीनंतर मेंदूच्या कार्याचा हळूहळू ऱ्हास होत जातो. यात प्रामुख्याने मेंदूची महत्त्वाची कार्य स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, हातापायाची हालचाल, रोजची कामे याचा विसर पडत जाणे, या सर्व गोष्टी हळूहळू

२१ सप्टेंबरला जागतिक अल्झायमर दिन : जनजागृतीसाठी निघणार रॅलीनागपूर : साठीनंतर मेंदूच्या कार्याचा हळूहळू ऱ्हास होत जातो. यात प्रामुख्याने मेंदूची महत्त्वाची कार्य स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, हातापायाची हालचाल, रोजची कामे याचा विसर पडत जाणे, या सर्व गोष्टी हळूहळू वाढत जातात. निर्णयक्षमता कमी कमी होणे, कपाळावर असलेला चष्मा बाहेर शोधत बसणे, मेंदूतील पेशी एकदा नाश पावल्या की पुन: त्यामुळे बुद्धीचा ऱ्हास होत जातो. पुढील काळात तर लघवी, संडास यावरील नियंत्रणही जाते. पेशंट स्वत:लाही ओळखत नाही. देवळात जायला निघाल्यास आपणाला कुठे जायचे याचा विसर पडून रस्त्यातच उभा राहतो. ही स्टेज म्हणजे अल्झायमर होय. साधारण १० टक्के ज्येष्ठांमध्ये हा आजार दिसून येतो, अशी माहिती डॉ. अभिषेक सोमानी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.इंडियन सायकियाट्रिक सोसायटी व नागपूर न्यूरो सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ‘अल्झायमर दिन’ २१ सप्टेंबरला साजरा केला जाणार आहे, त्यानिमित्त या आजाराविषयी लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून आयोजित विविध कार्यक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली. डॉ. पवन अडतिया म्हणाले, डिमेन्शिया, अल्झायमर यांच्यासारख्या आजाराबाबत आपल्याकडे फारशी जागृती नाही. म्हतारपण झाले की स्मरण शक्ती कमी होतेच, हे गृहीत धरून सर्व व्यवहार चालतात, पण डिमेन्शिया या आजाराची लक्षणे दिसल्यास मुलांनी ज्येष्ठांना डॉक्टरकडे नेणे गरजेचे आहे. स्मृतिभ्रंश(डिमेन्शिया) या आजारात मेंदूची कार्यक्षमता कमी होते. यात स्मरणशक्ती बुद्धिमत्ता, एकाग्रता, भाषाकौशल्य व स्वत:ची काळजी घेण्याची क्षमता मुख्यत: कमी होते. पेशंटची वर्तणूक व स्वभावातही बरेच बदल दिसतात. यात चिडचिडेपणा, हिंसक प्रवृत्ती, हट्टीपणा, दुर्लक्षिले गेल्याची भावना व त्यातून येणारे नैराश्य, आजाराच्या पुढच्या अवस्थेत किंवा उपचाराअभावी पेशंटला भास होणे, भ्रम होणे, झोपेचे वेळापत्रक बदलणे इत्यादी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसताच कुटुंबातील सदस्यांनी रुग्णाला डॉक्टरांकडे घेऊन जाणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. परिषदेत डॉ. प्रबीर वराडकर उपस्थित होते.(प्रतिनिधी)