शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

१० दिवस पाणी संकट

By admin | Updated: November 19, 2014 00:49 IST

गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे.

गोरेवाडा तलाव : पातळी ३१२.५० मीटरवरनागपूर : गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागातील नागरिकांना पुढील दहा दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अकस्मात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.शहराच्या ६५ टक्के भागाला गोरेवाडा तलावातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु तलावाला पुरवठा करणाऱ्या नवेगाव- खैरी प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला आहे. या महिन्यात दोनदा हा कालवा फुटला. कालव्याला वारंवार मोठमोठे भगदाड पडत असल्याने गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट झाली आहे. यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत तलावतील पाणी पातळी ३१२.५० मीटरपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे शहराच्या बहुसंख्य भागाला मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे. गोरेवाडा तलावाची पातळी साधारणपणे ३१३ मीटर असली आणि तलावाला कालव्यावदारे ४३० ते ४४० एमएलडी पाणी पुरवठा झाला तरी शहराला पुरेसा पाणी पुरवठा करता येतो. परंतु पेंच -नवेगाव खैरी धरणाच्या ७ कि.मी.अंतरावर बाभूळखेडा गावाजवळ उजवा कालवा फु टल्याने पाटबंधारे विभागाने कालव्यातील पाणी प्रवाह १३ नोव्हेंबरपासून बंद केला आहे. नवेगाव खैरी धरणावरून आरबीसीमध्ये पाणी वळविण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कालव्याचा प्रवाह थांबल्याने गोरेवाडा तलावातील पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली आहे. १४ नोव्हेंबरला गोरेवाडा तलावाची पाणी पातळी ३१३.१४ मीटर होती. १५ नोव्हेंबरला ती ३१२.८८ मीटर, १६ तारखेला ३१२.४० तर १७ व १८ नोव्हेंबरला ती ३१२.५० मीटरपर्यंत खाली गेली आहे. ३१ आॅक्टोबरला पेंच नवेगाव खैरी प्रकल्पाच्या १९ कि.मी. अंतरावर राईट बॅक कॅनल पाटणसावंगीजवळ एका ठिकाणी फुटला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ३१ आॅक्टोबरच्या संध्याकाळपासून पाण्याचा प्रवाह बंद करावा लागला होता. परिणामी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. सद्यस्थितीत गोरेवाडा तलावातील पाणी पातळी ३१२.५० मीटर आहे. १९ नोव्हेंबरला ती ३१२.६० मीटर होण्याची शक्यता आहे. तरीही पुढील १० दिवस शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागाचा पाणी पुरवठा बाधित राहणार आहे. दुरुस्तीनंतर पाटबंधारे विभाग महादुला येथून दररोज पूर्णक्षमतेने ४५० एमएलडी पाणी उचलून गोरेवाडा तलावाच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतरही तलावाच्या पातळीत जेमतेम ४ ते ५ से.मी. पाण्याची वाढ होत आहे. टंचाईमुळे गैरसोय होत असली तरी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. (प्रतिनिधी)