शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

१० दिवस पाणी संकट

By admin | Updated: November 19, 2014 00:49 IST

गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे.

गोरेवाडा तलाव : पातळी ३१२.५० मीटरवरनागपूर : गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट होऊन ती ३१२.५० मीटरपर्यत खाली आली आहे. १८ नोव्हेंबरला तलावातील पाणी पातळीचा हा नीचांक नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागातील नागरिकांना पुढील दहा दिवस पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. अकस्मात उद्भवलेल्या पाणी टंचाईमुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागणार आहे.शहराच्या ६५ टक्के भागाला गोरेवाडा तलावातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु तलावाला पुरवठा करणाऱ्या नवेगाव- खैरी प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला आहे. या महिन्यात दोनदा हा कालवा फुटला. कालव्याला वारंवार मोठमोठे भगदाड पडत असल्याने गोरेवाडा तलावाच्या पाणी पातळीत विक्रमी घट झाली आहे. यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. सद्यस्थितीत तलावतील पाणी पातळी ३१२.५० मीटरपर्यंत खाली आली आहे. त्यामुळे शहराच्या बहुसंख्य भागाला मर्यादित पाणी पुरवठा होणार आहे. गोरेवाडा तलावाची पातळी साधारणपणे ३१३ मीटर असली आणि तलावाला कालव्यावदारे ४३० ते ४४० एमएलडी पाणी पुरवठा झाला तरी शहराला पुरेसा पाणी पुरवठा करता येतो. परंतु पेंच -नवेगाव खैरी धरणाच्या ७ कि.मी.अंतरावर बाभूळखेडा गावाजवळ उजवा कालवा फु टल्याने पाटबंधारे विभागाने कालव्यातील पाणी प्रवाह १३ नोव्हेंबरपासून बंद केला आहे. नवेगाव खैरी धरणावरून आरबीसीमध्ये पाणी वळविण्यासाठी धरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे कालव्याचा प्रवाह थांबल्याने गोरेवाडा तलावातील पाणी पातळी पूर्णपणे कमी झाली आहे. १४ नोव्हेंबरला गोरेवाडा तलावाची पाणी पातळी ३१३.१४ मीटर होती. १५ नोव्हेंबरला ती ३१२.८८ मीटर, १६ तारखेला ३१२.४० तर १७ व १८ नोव्हेंबरला ती ३१२.५० मीटरपर्यंत खाली गेली आहे. ३१ आॅक्टोबरला पेंच नवेगाव खैरी प्रकल्पाच्या १९ कि.मी. अंतरावर राईट बॅक कॅनल पाटणसावंगीजवळ एका ठिकाणी फुटला होता. त्यामुळे पाटबंधारे विभागाला ३१ आॅक्टोबरच्या संध्याकाळपासून पाण्याचा प्रवाह बंद करावा लागला होता. परिणामी शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता. सद्यस्थितीत गोरेवाडा तलावातील पाणी पातळी ३१२.५० मीटर आहे. १९ नोव्हेंबरला ती ३१२.६० मीटर होण्याची शक्यता आहे. तरीही पुढील १० दिवस शहराच्या पश्चिम, दक्षिण-पश्चिम, दक्षिण आणि मध्य भागाचा पाणी पुरवठा बाधित राहणार आहे. दुरुस्तीनंतर पाटबंधारे विभाग महादुला येथून दररोज पूर्णक्षमतेने ४५० एमएलडी पाणी उचलून गोरेवाडा तलावाच्या पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यानंतरही तलावाच्या पातळीत जेमतेम ४ ते ५ से.मी. पाण्याची वाढ होत आहे. टंचाईमुळे गैरसोय होत असली तरी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन ओसीडब्ल्यूने केले आहे. (प्रतिनिधी)