शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कळमना धान्य बाजारात १० कोटींचा व्यापार ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

नागपूर : डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या स्टॉक मर्यादेच्या अध्यादेशाविरुद्ध कळमना धान्य बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांनी ...

नागपूर : डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या स्टॉक मर्यादेच्या अध्यादेशाविरुद्ध कळमना धान्य बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन पुकारले असून चार दिवस जवळपास १० कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे.

गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अडतिया आणि व्यापाऱ्यांनी कळमना धान्य बाजारात नारे-निदर्शने केली. धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा लावली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. साठवणूक मर्यादेविरुद्ध कळमना धान्य बाजार सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय धान्यगंज अडतिया मंडळाने घेतला आहे. जवळपास ३०० पेक्षा जास्त अडतिया आणि व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी खरेदी-विक्री बंद केली आहे. अडतिये आणि व्यापारी मंडळाच्या कार्यालयासमोर प्रदर्शन करीत आहेत.

केंद्र सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट लावली, पण काही राज्यांनी अंमलबजावणी केली नाही. त्याप्रमाणे राज्य शासनाने लागू करू नये. या संदर्भात शासनासोबत बोलणी सुरू आहे. स्टॉक लिमिट हटविण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. सेनाड म्हणाले, केंद्र सरकारच्या अध्यादेशात घाऊक व्यापाऱ्यांना २० क्विंटल अर्थात २ हजार क्विंटल स्टॉकची मर्यादा आहे. परंतु व्यापारी कोणत्याही एका प्रकारच्या डाळीचा साठा एक हजार क्विंटलपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे बंद केले आहे. त्याचप्रमाणे चिल्लर व्यापाऱ्यांना ५ टन अर्थात ५०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा ठेवता येणार नाही. याशिवाय दाल मिलर्सला गेल्या तीन महिन्यांचे उत्पादन वा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के म्हणजेच यापैकी जे जास्त असेल ती डाळींची मर्यादा राहणार आहे. सरकारने धान्याच्या साठवणुकीवर कोणताही मर्यादा लावलेली नाही.

आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळ कळमकर, कमलाकर घाटोळे, रामेश्वर हिरुळकर, नरेश जिभकाटे, राजेश सातपुते, सारंग वानखेडे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्लाईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर, महेंद्र अग्रवाल, शेखर अग्रवाल यांच्यासह अनेक अडतिया व व्यापारी उपस्थित होते.