शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

कळमना धान्य बाजारात १० कोटींचा व्यापार ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

नागपूर : डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या स्टॉक मर्यादेच्या अध्यादेशाविरुद्ध कळमना धान्य बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांनी ...

नागपूर : डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या स्टॉक मर्यादेच्या अध्यादेशाविरुद्ध कळमना धान्य बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन पुकारले असून चार दिवस जवळपास १० कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे.

गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अडतिया आणि व्यापाऱ्यांनी कळमना धान्य बाजारात नारे-निदर्शने केली. धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा लावली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. साठवणूक मर्यादेविरुद्ध कळमना धान्य बाजार सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय धान्यगंज अडतिया मंडळाने घेतला आहे. जवळपास ३०० पेक्षा जास्त अडतिया आणि व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी खरेदी-विक्री बंद केली आहे. अडतिये आणि व्यापारी मंडळाच्या कार्यालयासमोर प्रदर्शन करीत आहेत.

केंद्र सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट लावली, पण काही राज्यांनी अंमलबजावणी केली नाही. त्याप्रमाणे राज्य शासनाने लागू करू नये. या संदर्भात शासनासोबत बोलणी सुरू आहे. स्टॉक लिमिट हटविण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. सेनाड म्हणाले, केंद्र सरकारच्या अध्यादेशात घाऊक व्यापाऱ्यांना २० क्विंटल अर्थात २ हजार क्विंटल स्टॉकची मर्यादा आहे. परंतु व्यापारी कोणत्याही एका प्रकारच्या डाळीचा साठा एक हजार क्विंटलपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे बंद केले आहे. त्याचप्रमाणे चिल्लर व्यापाऱ्यांना ५ टन अर्थात ५०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा ठेवता येणार नाही. याशिवाय दाल मिलर्सला गेल्या तीन महिन्यांचे उत्पादन वा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के म्हणजेच यापैकी जे जास्त असेल ती डाळींची मर्यादा राहणार आहे. सरकारने धान्याच्या साठवणुकीवर कोणताही मर्यादा लावलेली नाही.

आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळ कळमकर, कमलाकर घाटोळे, रामेश्वर हिरुळकर, नरेश जिभकाटे, राजेश सातपुते, सारंग वानखेडे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्लाईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर, महेंद्र अग्रवाल, शेखर अग्रवाल यांच्यासह अनेक अडतिया व व्यापारी उपस्थित होते.