शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कळमना धान्य बाजारात १० कोटींचा व्यापार ठप्प ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:06 IST

नागपूर : डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या स्टॉक मर्यादेच्या अध्यादेशाविरुद्ध कळमना धान्य बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांनी ...

नागपूर : डाळींच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारने काढलेल्या स्टॉक मर्यादेच्या अध्यादेशाविरुद्ध कळमना धान्य बाजारातील अडतिया आणि व्यापाऱ्यांनी बंद आंदोलन पुकारले असून चार दिवस जवळपास १० कोटींचा व्यापार ठप्प झाला आहे.

गुरुवारी आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अडतिया आणि व्यापाऱ्यांनी कळमना धान्य बाजारात नारे-निदर्शने केली. धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, केंद्र सरकारने डाळींच्या साठवणुकीवर मर्यादा लावली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये रोष आहे. साठवणूक मर्यादेविरुद्ध कळमना धान्य बाजार सोमवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय धान्यगंज अडतिया मंडळाने घेतला आहे. जवळपास ३०० पेक्षा जास्त अडतिया आणि व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले आहेत. त्यांनी खरेदी-विक्री बंद केली आहे. अडतिये आणि व्यापारी मंडळाच्या कार्यालयासमोर प्रदर्शन करीत आहेत.

केंद्र सरकारने डाळींवर स्टॉक लिमिट लावली, पण काही राज्यांनी अंमलबजावणी केली नाही. त्याप्रमाणे राज्य शासनाने लागू करू नये. या संदर्भात शासनासोबत बोलणी सुरू आहे. स्टॉक लिमिट हटविण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. सेनाड म्हणाले, केंद्र सरकारच्या अध्यादेशात घाऊक व्यापाऱ्यांना २० क्विंटल अर्थात २ हजार क्विंटल स्टॉकची मर्यादा आहे. परंतु व्यापारी कोणत्याही एका प्रकारच्या डाळीचा साठा एक हजार क्विंटलपेक्षा जास्त ठेवू शकत नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा माल खरेदी करणे बंद केले आहे. त्याचप्रमाणे चिल्लर व्यापाऱ्यांना ५ टन अर्थात ५०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा ठेवता येणार नाही. याशिवाय दाल मिलर्सला गेल्या तीन महिन्यांचे उत्पादन वा वार्षिक क्षमतेच्या २५ टक्के म्हणजेच यापैकी जे जास्त असेल ती डाळींची मर्यादा राहणार आहे. सरकारने धान्याच्या साठवणुकीवर कोणताही मर्यादा लावलेली नाही.

आंदोलनात मंडळाचे पदाधिकारी गोपाळ कळमकर, कमलाकर घाटोळे, रामेश्वर हिरुळकर, नरेश जिभकाटे, राजेश सातपुते, सारंग वानखेडे, नीळकंठ हटवार, राजू उमाठे, रहमान शेख, स्वप्निल वैरागडे, भूषण क्षीरसागर, पंढरीनाथ मुंडले, चिंटू पुरोहित, रामदास गजापुरे, रमेश नाकाडे, उदय आकरे, विनोद कातुरे, भीमराव मुटे, मनोज भालोटिया, मनोहर हजारे, सुरेश बारई, इस्लाईल शेख, ज्ञानेश्वर गजभिये, गंगाधर बोरकर, दिनेश चांडक, शंकर शेंडे, सुनील गवते, राजू ठवकर, महेंद्र अग्रवाल, शेखर अग्रवाल यांच्यासह अनेक अडतिया व व्यापारी उपस्थित होते.