शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे ०.२४ टीएमसी पाणी उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:10 IST

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी ...

नागपूर : वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा नाला जलसंवर्धन प्रकल्पाचे वरिष्ठ भूवैज्ञानिकांकडून परीक्षण करण्यात आले. या प्रकल्पात पावसाचे ०.२४ टीएमसी पाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले असून, भूजल पुनर्भरणानंतर यंदा ०.०७ टीएमसी पाण्याची वाढ झाली असल्याचे आढळून आले आहे. या परीक्षणाचा अहवाल संबंधित चमूने केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना सादर केला.

पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेमार्फत संबंधित प्रकल्प राबविण्यात आला. पावसाच्या पाण्याचे संवर्धन हा याचा मुख्य उद्देश होता. तामसवाडा प्रकल्पात भूजल पुनर्भरण प्रक्रियेद्वारा ०.१७ टीएमसी पाणी दरवर्षी उपलब्ध होत होते. प्रकल्पाचे काम झाल्यानंतर हा आकडा ०.२४ टीएमसीवर गेला आहे. ग्रामीण भागातील विविध कामे, शेतकरी यांच्यासाठी आवश्यक पाणी मिळत आहे. तसेच भूगर्भातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीदेखील हा प्रकल्प महत्त्वाचा ठरला आहे. परीक्षण समितीत स्व. भूवैज्ञानिक रवींद्र काळी, ज्ञानेश्वर चन्ने, राजेंद्र देशकर, शिरीष कुलकर्णी, नितीन महाजन, डॉ. पी. के. जैन, दत्ता जामदार, सत्यजित जांभूळकर, माधव कोटस्थाने, मिलिंद भगत, डॉ. विजय घुगे, विजय घाटोळे यांचा समावेश होता.