शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

झिंगझिंग लापालापा

By admin | Updated: January 9, 2016 15:02 IST

साहित्याच्या प्रांतात आपल्या पाऊलखुणा उमटवणा:या तीन बिनीच्या तरुण साहित्यिकांना चार प्रश्न; त्यांच्या काळाने त्यांच्यापुढे वाढून ठेवलेल्या संधी आणि संकटांबद्दल या अंकात..

- मुलाखती आणि शब्दांकन :सोनाली नवांगुळ
 
आमची पिढी इतकी एक्सपोज्ड आहे सगळ्याच गोष्टींना की स्वत:ची भाषा सापडत नाहीये आम्हाला. जे सगळं पाहतो, वाचतो त्यातून वाटतं की आपल्याला जे वाटतंय ते सगळं होऊन गेलंय, कुणीतरी आधीच करून ठेवलंय, मग आपण नवं काय लिहिणार आहोत? आजची संवेदना मांडण्यासाठी शब्द कुठले हे कळत नाही. मी जी भाषा वाचते, मला आवडते, ती जुनी आहे, मग आमचं आजचं एक्सप्रेशन काय हे कळत नाही. सापडेपर्यंत थांबावं लागतं. कदाचित हा संघर्ष प्रत्येक काळात होत असेल. 
 मोठय़ा मोठय़ा घटना सतत मनावर आदळत राहतात. त्यांचं प्रमाण आणि वेग इतका आहे की प्रत्येक मोठी गोष्ट सतत ऐकून- पाहून ढोबळ होत जाते. त्यावर लिहायला गेलं तर तेही या ढोबळपणामुळं गवसत नाही.
- मनस्विनी लता रवींद्र नाटककार, पटकथा-संवादलेखक
 
कला, साहित्य, भाषा, तत्त्वज्ञान याकडे ज्या समाजाचं लक्ष असतं आणि ते विकसित करावं असं ज्याला वाटतं तो आदर्श समाज. आपल्या शिक्षणव्यवस्थेत कला व भाषेचे शिक्षक सरप्लस होतात. जेमतेम लायकी नसणारेही व्यवस्थेत शिकवण्याच्या, सांगण्याच्या जागेवर येऊन बसलेत आणि जे गांभीर्यानं या गोंधळाबद्दल सांगू, बोलू पाहतात त्यांना व्यवस्था बाजूला नेऊन बसवते. शिक्षणातून कुशल कामगार व आदर्श नागरिक घडावा हा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. तो चांगला माणूसही व्हावा असा विचार झाला तर नवीन ऊर्जेला संधी आहे. लेखक घडवण्याची गोष्ट फार दूर, आपण अजून चांगला वाचक होऊ किंवा घडवू शकत नाही आहोत. पाश्चात्त्य जगात लेखनव्यवसायावर करोडपती होणारे लोक स्वप्नवतच वाटतात इथे. एखाद्या सजर्काला विद्यापीठ घडवू शकत नाही, फारतर आकार देऊ शकतं.  वाचणारे घडतील तर बदलाला बरीच जागा आहे.
- गणेश विसपुते लेखक, कवी आणि अनुवादक
 
मोजक्याच लाडक्यांना पुढे आणणारी साहित्यपरंपरा केवळ जुनी आहे, म्हणून ती श्रेष्ठ होती असं नव्हे. या परंपरेचं मी कौतुक नाही करू शकत. साहित्यवृद्धीसाठी उपकारक नसणारी ही चाकोरी नव्या समाजमाध्यमांनी मोडली ते बरंच झालं. ठराविकांची पाठराखण, हांजीहांजी, वा्मयीन नियतकालिकात वर्णी, शिफारस यातून काही चांगलं घडलंही असेल; पण ती पोषक संस्कृती नव्हती. आज एक पुस्तकही न येता आपण लिहिलेली कविता फेसबुकच्या वॉलवर पोस्ट केली की तिच्यावर वाचणारे बोलतात, काही सुचवतात, शेअर करतात आणि आवडत राहिलं तर आपण नवं काय करतो याची वाट पाहतात. 
तुम्ही वाईट, बिनबुडाचं लिहिलं की इथे तुम्हाला झोडपूनही काढतात. त्याअर्थी हा आरसाही आहे.
हे मला आवडतं. महत्त्वाचं वाटतं.
 
- वीरा राठोड युवा-साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी