शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

झिंगझिंग लापालापा

By admin | Updated: January 9, 2016 15:02 IST

साहित्याच्या प्रांतात आपल्या पाऊलखुणा उमटवणा:या तीन बिनीच्या तरुण साहित्यिकांना चार प्रश्न; त्यांच्या काळाने त्यांच्यापुढे वाढून ठेवलेल्या संधी आणि संकटांबद्दल या अंकात..

- मुलाखती आणि शब्दांकन :सोनाली नवांगुळ
 
आमची पिढी इतकी एक्सपोज्ड आहे सगळ्याच गोष्टींना की स्वत:ची भाषा सापडत नाहीये आम्हाला. जे सगळं पाहतो, वाचतो त्यातून वाटतं की आपल्याला जे वाटतंय ते सगळं होऊन गेलंय, कुणीतरी आधीच करून ठेवलंय, मग आपण नवं काय लिहिणार आहोत? आजची संवेदना मांडण्यासाठी शब्द कुठले हे कळत नाही. मी जी भाषा वाचते, मला आवडते, ती जुनी आहे, मग आमचं आजचं एक्सप्रेशन काय हे कळत नाही. सापडेपर्यंत थांबावं लागतं. कदाचित हा संघर्ष प्रत्येक काळात होत असेल. 
 मोठय़ा मोठय़ा घटना सतत मनावर आदळत राहतात. त्यांचं प्रमाण आणि वेग इतका आहे की प्रत्येक मोठी गोष्ट सतत ऐकून- पाहून ढोबळ होत जाते. त्यावर लिहायला गेलं तर तेही या ढोबळपणामुळं गवसत नाही.
- मनस्विनी लता रवींद्र नाटककार, पटकथा-संवादलेखक
 
कला, साहित्य, भाषा, तत्त्वज्ञान याकडे ज्या समाजाचं लक्ष असतं आणि ते विकसित करावं असं ज्याला वाटतं तो आदर्श समाज. आपल्या शिक्षणव्यवस्थेत कला व भाषेचे शिक्षक सरप्लस होतात. जेमतेम लायकी नसणारेही व्यवस्थेत शिकवण्याच्या, सांगण्याच्या जागेवर येऊन बसलेत आणि जे गांभीर्यानं या गोंधळाबद्दल सांगू, बोलू पाहतात त्यांना व्यवस्था बाजूला नेऊन बसवते. शिक्षणातून कुशल कामगार व आदर्श नागरिक घडावा हा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. तो चांगला माणूसही व्हावा असा विचार झाला तर नवीन ऊर्जेला संधी आहे. लेखक घडवण्याची गोष्ट फार दूर, आपण अजून चांगला वाचक होऊ किंवा घडवू शकत नाही आहोत. पाश्चात्त्य जगात लेखनव्यवसायावर करोडपती होणारे लोक स्वप्नवतच वाटतात इथे. एखाद्या सजर्काला विद्यापीठ घडवू शकत नाही, फारतर आकार देऊ शकतं.  वाचणारे घडतील तर बदलाला बरीच जागा आहे.
- गणेश विसपुते लेखक, कवी आणि अनुवादक
 
मोजक्याच लाडक्यांना पुढे आणणारी साहित्यपरंपरा केवळ जुनी आहे, म्हणून ती श्रेष्ठ होती असं नव्हे. या परंपरेचं मी कौतुक नाही करू शकत. साहित्यवृद्धीसाठी उपकारक नसणारी ही चाकोरी नव्या समाजमाध्यमांनी मोडली ते बरंच झालं. ठराविकांची पाठराखण, हांजीहांजी, वा्मयीन नियतकालिकात वर्णी, शिफारस यातून काही चांगलं घडलंही असेल; पण ती पोषक संस्कृती नव्हती. आज एक पुस्तकही न येता आपण लिहिलेली कविता फेसबुकच्या वॉलवर पोस्ट केली की तिच्यावर वाचणारे बोलतात, काही सुचवतात, शेअर करतात आणि आवडत राहिलं तर आपण नवं काय करतो याची वाट पाहतात. 
तुम्ही वाईट, बिनबुडाचं लिहिलं की इथे तुम्हाला झोडपूनही काढतात. त्याअर्थी हा आरसाही आहे.
हे मला आवडतं. महत्त्वाचं वाटतं.
 
- वीरा राठोड युवा-साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी