शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

झिंगझिंग लापालापा

By admin | Updated: January 9, 2016 15:02 IST

साहित्याच्या प्रांतात आपल्या पाऊलखुणा उमटवणा:या तीन बिनीच्या तरुण साहित्यिकांना चार प्रश्न; त्यांच्या काळाने त्यांच्यापुढे वाढून ठेवलेल्या संधी आणि संकटांबद्दल या अंकात..

- मुलाखती आणि शब्दांकन :सोनाली नवांगुळ
 
आमची पिढी इतकी एक्सपोज्ड आहे सगळ्याच गोष्टींना की स्वत:ची भाषा सापडत नाहीये आम्हाला. जे सगळं पाहतो, वाचतो त्यातून वाटतं की आपल्याला जे वाटतंय ते सगळं होऊन गेलंय, कुणीतरी आधीच करून ठेवलंय, मग आपण नवं काय लिहिणार आहोत? आजची संवेदना मांडण्यासाठी शब्द कुठले हे कळत नाही. मी जी भाषा वाचते, मला आवडते, ती जुनी आहे, मग आमचं आजचं एक्सप्रेशन काय हे कळत नाही. सापडेपर्यंत थांबावं लागतं. कदाचित हा संघर्ष प्रत्येक काळात होत असेल. 
 मोठय़ा मोठय़ा घटना सतत मनावर आदळत राहतात. त्यांचं प्रमाण आणि वेग इतका आहे की प्रत्येक मोठी गोष्ट सतत ऐकून- पाहून ढोबळ होत जाते. त्यावर लिहायला गेलं तर तेही या ढोबळपणामुळं गवसत नाही.
- मनस्विनी लता रवींद्र नाटककार, पटकथा-संवादलेखक
 
कला, साहित्य, भाषा, तत्त्वज्ञान याकडे ज्या समाजाचं लक्ष असतं आणि ते विकसित करावं असं ज्याला वाटतं तो आदर्श समाज. आपल्या शिक्षणव्यवस्थेत कला व भाषेचे शिक्षक सरप्लस होतात. जेमतेम लायकी नसणारेही व्यवस्थेत शिकवण्याच्या, सांगण्याच्या जागेवर येऊन बसलेत आणि जे गांभीर्यानं या गोंधळाबद्दल सांगू, बोलू पाहतात त्यांना व्यवस्था बाजूला नेऊन बसवते. शिक्षणातून कुशल कामगार व आदर्श नागरिक घडावा हा दृष्टिकोन व्यावसायिक आहे. तो चांगला माणूसही व्हावा असा विचार झाला तर नवीन ऊर्जेला संधी आहे. लेखक घडवण्याची गोष्ट फार दूर, आपण अजून चांगला वाचक होऊ किंवा घडवू शकत नाही आहोत. पाश्चात्त्य जगात लेखनव्यवसायावर करोडपती होणारे लोक स्वप्नवतच वाटतात इथे. एखाद्या सजर्काला विद्यापीठ घडवू शकत नाही, फारतर आकार देऊ शकतं.  वाचणारे घडतील तर बदलाला बरीच जागा आहे.
- गणेश विसपुते लेखक, कवी आणि अनुवादक
 
मोजक्याच लाडक्यांना पुढे आणणारी साहित्यपरंपरा केवळ जुनी आहे, म्हणून ती श्रेष्ठ होती असं नव्हे. या परंपरेचं मी कौतुक नाही करू शकत. साहित्यवृद्धीसाठी उपकारक नसणारी ही चाकोरी नव्या समाजमाध्यमांनी मोडली ते बरंच झालं. ठराविकांची पाठराखण, हांजीहांजी, वा्मयीन नियतकालिकात वर्णी, शिफारस यातून काही चांगलं घडलंही असेल; पण ती पोषक संस्कृती नव्हती. आज एक पुस्तकही न येता आपण लिहिलेली कविता फेसबुकच्या वॉलवर पोस्ट केली की तिच्यावर वाचणारे बोलतात, काही सुचवतात, शेअर करतात आणि आवडत राहिलं तर आपण नवं काय करतो याची वाट पाहतात. 
तुम्ही वाईट, बिनबुडाचं लिहिलं की इथे तुम्हाला झोडपूनही काढतात. त्याअर्थी हा आरसाही आहे.
हे मला आवडतं. महत्त्वाचं वाटतं.
 
- वीरा राठोड युवा-साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी