शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
2
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
3
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
4
Dombivli Video: हात सोडला अन् ११व्या मजल्यावरून तरुण कोसळला; डोंबिवलीतील घटनेचा व्हिडीओ
5
'सोनम वांगचुकच्या संपर्कात पाकिस्तानी नागरिक, बांगलादेशातही गेले'; पोलिसांचा धक्कादायक खुलासा
6
संविधान रक्षणासाठी काँग्रेस काढणार दीक्षाभूमी ते सेवाग्राम ‘संविधान सत्याग्रह पदयात्रा’
7
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
8
सुंदर वहिनीला नणंदेने पळवून नेले, घरदार सोडून दोघे झाले गायब, असं फुटलं बिंग   
9
लिव्हिंग रुम, किचन अन् बेडरुम! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील 'सावत्या'ने खूपच सुंदर सजवलंय मुंबईतील आलिशान घर
10
Laxman Hake: दहा-बारा पोलीस असताना लक्ष्मण हाकेंची गाडी फोडली; बांबूने हल्ला, काय घडलं?
11
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
12
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
13
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
14
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
15
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
16
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
17
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
18
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
19
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
20
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल

लेखन हा माझा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:09 IST

पद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य क्षेत्रात भरघोस काम करणाऱ्या संस्थेचा रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाने दि. २९ व दि. ३० डिसेंबरला नागपूरच्या अंधविद्यालय, बी.आर. मुंडले शाळेच्या सभागृहात होत आहे. पद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका श्रीमती शुभांगी भडभडे यांची ७५ पुस्तके प्रकाशित होत असतानाच हा कार्यक्रम होत आहे हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. त्यानिमित्त त्यांची घेतलेली ही मुलाखत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू स्पष्ट करीत आहे.

ठळक मुद्देपद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका श्रीमती शुभांगी भडभडेविशेष मुलाखत

सौ. प्रतिभा कुळकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्कपद्मगंधा प्रतिष्ठान या साहित्य क्षेत्रात भरघोस काम करणाऱ्या संस्थेचा रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाने दि. २९ व दि. ३० डिसेंबरला नागपूरच्या अंधविद्यालय, बी.आर. मुंडले शाळेच्या सभागृहात होत आहे. पद्मगंधा संस्थेच्या संस्थापिका श्रीमती शुभांगी भडभडे यांची ७५ पुस्तके प्रकाशित होत असतानाच हा कार्यक्रम होत आहे हा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. त्यानिमित्त त्यांची घेतलेली ही मुलाखत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू स्पष्ट करीत आहे.प्रश्न : आपण लेखन कधी सुरू केलं?उत्तर : मी १५ वर्षाची असताना आकाशवाणीसाठी लेखन करू लागले होते. १६ वर्षाची असताना तरुण भारत दैनिकात स्वत:ची बालकथा घेऊन गेले होते. तेथे संपादक ग.त्र्यं. माडखोलकर यांची भेट झाली. त्यांनी कथा कशी लिहावी हे समजावून दिले. त्यामुळे माझ्या लेखनात नेमकेपणा आला.प्रश्न : तुझी पाहिली कादंबरी कोणती?उत्तर : ‘समाधी’ ही माझी पहिली कादंबरी. माझ्या एका कथेचा विस्तार करून ती कादंबरी मी लिहिली होती. सोलापूरच्या गुलमोहोर प्रकाशनानं ती प्रसिद्ध केली होती. त्या कादंबरीच्या रूपानं मला प्रथम मानधन मिळाले. सहा महिन्यात त्या कादंबरीची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. त्यानंतर मी कादंबरी लिहिण्याचा सपाटा लावला. कथा असो, कादंबरी असो वाचकांनी माझं लेखन उचलून धरलं. मला प्रकाशकही मिळत गेले. माझ्या माहेरी, सासरी माझ्या लेखनाचं कौतुक झालं. थोडं आर्थिक स्थैर्यही लाभलं.प्रश्न : लेखनाशिवाय आणखी काय काय केलं?उत्तर : तरुण भारत दैनिकाचा बालविभाग सांभाळण्याची संधी मला मिळाली. त्यामुळे माझी ओळख वाढली. जनसंपर्क वाढला. पुढे काही दिवस लोकमत दैनिकाचा ‘सखी’ हा महिलांचा स्तंभ सांभाळला. जनवाद दैनिकात तर मी रविवारच्या साहित्य पुरवणीचे काम पाहात होते. असे विविध अनुभव येत गेले. हे करीत असताना एकीकडे पद्मगंधा प्रतिष्ठान या संस्थेची निर्मिती केली. त्यासाठी माझ्या पतींकडून मोलाचे सहकार्य मिळाले. पद्मगंधाच्या माध्यमातून अनेक साहित्यविषयक कार्यक्रम राबवले. अनेक प्रतिभासंपन्न स्त्रियांना एकत्र ठेवण्याचे काम पद्मगंधा प्रतिष्ठानने केले असे गौरवोद्गार कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी काढले. लोक म्हणतात ‘इतकी वर्षे बायका एकमेकांशी न भांडता कशा काय काम करतात’ आमचा खास महिलांचा नाट्यमहोत्सव ही आमची मोठीच उपलब्धी आहे.प्रश्न : तुझ्या चरित्र कादंबऱ्यांसंबंधी सांग ना?उत्तर : माझ्या सामाजिक कादंबऱ्यांना वाचकांचा खूप प्रतिसाद मिळाला. पण माझ्या चरित्रात्मक कादंबऱ्या या महापुरुषांच्या जीवनावर आधारित असल्याने त्यांना जास्त मानाचं पान मिळालं. माझी पहिली चरित्रात्मक कादंबरी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित ‘कृतार्थ’ ही होती. त्यानंतर गोळवलकरांच्या जीवनावर ‘इदं न मम’ ही लिहिली. आचार्य विनोबा भावे यांच्या जीवनावर ‘भौमर्षी’ ही लिहिली. स्वामी विवेकानंद आणि ‘योगी पावन मनाचा’ ही संत ज्ञानेश्वरांच्या जीवनावर आधारित याही कादंबऱ्या वाचकांना खूप आवडल्या. आता ‘अद्वैताचं उपनिषद’ ही आद्य शंकराचार्य यांच्या जीवनावर कादंबरी लिहिली आहे. या सर्व कादंबऱ्यांनी मला प्रसिद्धी तर माझ्या प्रकाशकांना समृद्धी मिळवून दिली आहे.प्रश्न : संसार करून लिखाण करणं हे कसं साध्य केलं?उत्तर : माझी लेखन करण्याची वेळ सकाळी ४ ते ७ ही असते. माझ्या लेखनासाठी माझे पती आणि मुले यांचे भरपूर सहकार्य लाभले. उरलेला वेळ मी संसारासाठी देते. उत्साहाने सणवार करते. येणारे जाणारे खूप असतात. त्यांचं आदरातिथ्यही आवडीने करते. पण माझ्या लिखाणाचा शुक्रतारा कधी ढळला नाही. ईश्वराने मला शब्दसंपदा दिली आहे. देवी सरस्वतीने माझा हात धरून ठेवला आहे. त्यामुळे मी सातत्याने लेखन करू शकले. लेखन हा माझा श्वास आहे. माझ्या प्रकाशकांनी तो कायम ठेवलाय.प्रश्न : तुझ्या नाटकांबद्दल सांग ना?उत्तर : सरसंघचालक गुरुजी गोळवलकर यांच्या चरित्र कादंबरीचेच ‘इदं न मम’ या नावाने मी नाट्यरूपांतर केले. तसेच स्वामी विवेकानंद या कादंबरीवरही त्याच नावाने नाटक लिहिले. ही दोन्ही नाटके भारतभर गाजली कारण त्यांचे हिंदीतून नाट्यरूपांतर केले होते. इदं न मम या नाटकाला नऊ सन्मान मिळाले तसेच एक लाख रुपयाचा पुरस्कारही मिळाला. स्वामी विवेकानंद या नाटकाचे तर दोन प्रयोग दुबई या मुस्लीम प्रदेशात झाले. हे सर्व आनंदाचे क्षण आहेत.अशी ही अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची शुभांगी भडभडे. पतीच्या निधनानंतर तिने लेखन सोडून तर दिले नाही पण ती अधिक जोमाने लेखन करू लागली आहे. स्वत:च्या बळावर साहित्य संमेलने आणि महिला नाट्यस्पर्धा यासारखे उपक्रम ती जिद्दीने पार पाडते आहे.

टॅग्स :Marathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलनinterviewमुलाखत