शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तेव्हा कस्तुरबा समजली...

By admin | Updated: August 30, 2014 15:01 IST

रिचर्ड अँटनबरो यांच्या ‘गांधी’मध्ये कस्तुरबांची भूमिका करणार्‍या अभिनेत्रीने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

 रोहिणी हट्टंगडी

 
'गांधी’ चित्रपटकरण्याची मला संधी मिळाली तो १९८0 चा काळ असावा. भूमिका मिळावी म्हणून रिचर्ड अँटनबरो यांना भेटायला जाताना माझ्यावर दडपण होते. कस्तुरबा गांधींची भूमिका, त्या भूमिकेसाठी तेआपल्याला पडताळून पाहणारेत, एक ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शक आणि तोही ब्रिटिश! मनावर तणाव घेऊनच मी त्यांना सामोरी गेले! ही पहिली भेट कायम लक्षात राहिली. करारी तरीही सौम्य, कर्तबगार तरीही ऋजू, बुद्धिमान तरीही कुठलाही अभिनिवेश नाही असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते! आपल्या ब्रिटिश पार्श्‍वभूमीचे कुठलेही दडपण भारतीय कलाकारावर येऊ नये, या त्यांनी सहज घेतलेल्या दक्षतेमुळे मी भारून गेले! त्यांनी गप्पा मारता-मारता मला बोलतं केलं. मी थिएटर करते हे जाणून ते संतुष्ट झाले असावेत. प्रसन्न वातावरणातून मी बाहेर पडले. मनाशी विचार केला, कस्तुरबांचा रोल मिळो, न मिळो; पण रिचर्ड अँटनबरोंशी अविस्मरणीय भेट तर झाली !
काही दिवसांनी मला त्यांनी लंडनला स्क्रीन टेस्टसाठी भेटायला बोलावल्याचे समजले. माझ्यासाठी हा आश्‍चर्याचा सुखद धक्का होता! एक महिन्याने मी लंडनला पोहोचले. त्यांची स्क्रीन टेस्ट म्हणजेकस्तुरबा गांधीचा पूर्ण गेट-अप करून एका संपूर्ण सीनचे चित्रण होते. तीन मिनिटांच्या दृश्यासाठी त्यांनी इतके परिश्रम घेतले. काम संपल्यानंतर तिसर्‍या दिवशी ते शूट केलेली फिल्म पाहणार होते. त्यांच्याशी भेट झाल्यावर मी विचारलं, Can i see it Sir?  त्यांनी Yes, off- course.. म्हणत संमती दिली. पाहून झाल्यावर मंद स्मित करत त्यांनी म्हटलं, You did well! You don’t have to act! पिसासारखी हलकी-फुलकी होऊन मी आले.
ठरल्या तारखेला त्यांचे युनिट भारतात डेरेदाखल झाले.  माझे शूटिंग २५ आठवडे चालले. त्यांना गांधीजी, त्यांचे चरित्र, त्यांच्याशी निगडित इतिहास, व्यक्ती, सनावळी सगळेच मुखोद्गत होते. सेटवर रिचर्ड सर सगळ्यांशी सौम्यपणे वागत, कुठेही दिग्दर्शकीय तोरा नाही! कलाकार-निर्माता-दिग्दर्शक-तंत्रज्ञ सगळ्यांना सारखी वागणूक! कलाकाराला ते पूर्ण स्वातंत्र्य देत. सूचना नम्रपणे देत असत.मी त्यांना कुणावरही चिडलेले, रागावून बोललेले पाहिले नाही! मनाची श्रीमंती असलेल्या तेजपुंज रिचर्ड सरांना या काळात अनुभवता आलं. कस्तुरबांच्या अखेरच्या दिवसाचे चित्रण करताना माझी अंगकाठी कृश, अशक्त दिसावी, असं त्यांनी सुचवलं. ते काही दिवस मी फक्त चहावर घालवलेत!
 गांधी सिनेमा बनवताना ते कर्जबाजारी झाले; पण गांधींवरील सिनेमास न्याय देण्यासाठी त्यांनी अनेक वर्षे, अनेक पातळ्यांवर संघर्ष केला! प्रसंग असाही घडला, पैशांअभावी त्यांच्या हातातून गांधी अन्य प्रॉडक्शनकडे गेला! आणि अवघं जीवन ज्या सिनेमाच्या ध्यासात गेले, त्या सिनेमाचे स्क्रिप्ट या महानुभावाने पुन्हा दामदुप्पट किमतीने विकत घेतले! स्वत: लिहिलेले स्क्रिप्टचे बाड विकत घेणारे सर रिचर्ड हेच माझ्या दृष्टीने महात्मा ठरलेत!
(लेखिका ज्येष्ठ अभिनेत्री आहेत.)
शब्दांकन-पूजा सामंत