शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

राजेंद्रअण्णांचं उद्या काय होणार?

By admin | Updated: February 15, 2017 23:35 IST

जयंत पाटील : आटपाडी परिसरात राष्ट्रवादीच्या प्रचार सभा

आटपाडी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जिल्ह्यात सर्वात जास्त विश्वास राजेंद्रअण्णा देशमुखांवर होता. अजित पवारांचा विश्वास अमरसिंहांवर होता. पण राजेंद्रअण्णांनी का पक्ष सोडला, हे फक्त त्यांनाच माहीत. माझे राजेंद्रअण्णांवर प्रेम आहे. त्यामुळे सत्तेसाठी भाजपत गेलेल्या अण्णांचे, जर उद्या हे सरकार पडले, तर काय होईल, याची मला काळजी असल्याची उपहासात्मक टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी दिघंची येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील चौकात आणि आटपाडीतील बाजार पटांगणात सभा घेतली. ते म्हणाले की, राजेंद्रअण्णांचा शब्द आपण कधी मोडला नाही. पण ज्या भाजपच्या नेत्यांमुळे येथील पाणीप्रश्न सुटू शकला नाही, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांसह विधानसभेत पश्चिम महाराष्ट्र निधी दिला जाऊ नये यासाठी लेखी निवेदन दिले, विरोध केला, त्यामुळे टेंभू, ताकारी योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत, त्या पक्षात जाऊन राजेंद्रअण्णांनी काय साधले? राजेंद्रअण्णांवर माझे मोठ्या भावाप्रमाणे काल प्रेम होते, आज प्रेम आहे आणि उद्याही राहील. पण त्यांनी अचानक पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याने आपल्याला खूप वाईट वाटले, दु:ख झाले आणि आता त्यांची काळजीही वाटते. कारण सत्तेत नाही, म्हणून त्यांनी भाजपत प्रवेश केला. शिवसेनेने जर २३ फेब्रुवारीनंतर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले, तर यांचे काय होईल?तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, राजेंद्रअण्णांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपत प्रवेश करुन विश्वासघात केला आहे. शेवटच्या दिवशी ११ वाजता अचानक त्यांनी पक्षाचे एबी फॉर्म माझ्या हातात दिले. अजिबात वेळ न मिळाल्याने राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार देऊ शकलो नाही. विश्वासघातांचे राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत मतदार चांगलाच धडा शिकवेल. यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, राष्ट्रवादीचे दिघंची जि. प. गटाचे उमेदवार अतुल जावीर, दिघंची पंचायत समिती गणाच्या उमेदवार उषा कलाप्पा कुटे, निंबवडे गणाच्या उमेदवार ज्योती दीपक चाधव, आटपाडी जि. प. गटाचे उमेदवार सादीक खाटीक उपस्थित होते. (वार्ताहर)पडळकरांचं नेतृत्व : कपाळावर मारला हात!‘राजेंद्रअण्णांची गाडी आताच माझ्या गाडीपुढे होती. राष्ट्रवादीत असताना कधी त्यांनी गाडीवर पक्षाचा झेंडा लावला नाही. पण आता भाजपचा झेंडा लावला होता. आता तर गेलाय, कशाला एवढा मोठा झेंडा लावता?’ असे आ. पाटील म्हणताच, एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले, ‘गेलात ते गेलात, वर गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली गेलो म्हणता! काय हे?’ कपाळावर हात मारुन घेत ते पुढे म्हणाले, ‘निदान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेलो, असे तरी म्हणायचे. आता पुन्हा ते पक्षात आले, तर हणमंतराव देशमुख यांचे नेतृत्व त्यांना स्वीकारावे लागेल’.विश्वास गेला, देशमुखांच्या वाड्यात!लोक म्हणतात, विश्वास कुठे गेला? तर पानिपतच्या लढाईत गेला. पण हे आता बदलावे लागेल. आता लोक म्हणतील, विश्वास कुठे गेला? तर विश्वास राजेंद्रअण्णांच्या वाड्यात गेला... असा पक्षाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी केली.