शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

वक्त ने किया...

By admin | Updated: October 25, 2014 14:47 IST

चित्रपटसृष्टीतील एक मातब्बर व्यक्तिमत्त्व म्हणजे बी. आर. चोप्रा. त्यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने चोप्रांची चित्रपटसृष्टीतील वाटचाल आणि त्यांच्या चित्रपटविश्‍वाशी संबंधित आठवणींना दिलेला हा उजाळा.

 अशोक उजळंबकर 

 
बी. आर. चोप्रा यांचा १९६५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘वक्त’ हा चित्रपट त्या काळी मल्टिस्टार चित्रपट म्हणून गाजला. या चित्रपटाची गाणी साहिर लुधियानवी यांची होती, तर संगीतकार होते ‘रवी’. या चित्रपटाचे निर्माता बी. आर. चोप्रा यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. त्यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. १९५0नंतर त्यांनी चित्रपटाच्या दुनियेत पाऊल ठेवले. अनेक नामवंत निर्माता-दिग्दर्शक मंडळींकडे सहायक म्हणून उमेदवारी केल्यावर त्यांना गोपाल पिक्चर्सच्या ‘अफसाना’ चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी मिळाली. या चित्रपटातील एक गीत होते, 
‘‘खुशियों के दिन मनाये जा, दिल के तराने गाये जा, 
तुझको जवानी की कसम, दिल की लगी बुझाये जा, 
दुनिया मेरी बसाये जा, आजा पिया-आजा पिया, 
अभी तो मै जवान हूँ, अभी तो मै जवान हूँ’’
बी. आर. चोप्रा यांनी त्यानंतर शोले, चांदनी चौक या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘चांदनी चौक’ची नायिका मीनाकुमारी होती. यानंतर चोप्रा निर्माते झाले. बी. आर. फिल्म्स या बॅनरखाली त्यांनी ‘एक ही रास्ता’ची घोषणा केली. नंतर आलेल्या ‘नया दौर’ या चित्रपटाला घवघवीत यश मिळाले व बी. आर. फिल्म्स हा बॅनर प्रस्थापित झाला. नया दौर’ नंतर ‘साधना’, ‘धूल का फूल’, ‘कानून’, ‘धरम पुत्र’, ‘गुमराह’ या चित्रपटांना दणदणीत यश मिळाले. त्यानंतर आलेला ‘वक्त’ हा चित्रपट यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अभिमानी व स्वकर्तृत्वावर विश्‍वास असलेल्या माणसाच्या संसाराची भूकंपाच्या एका हादर्‍यामुळे कशी वाताहत होते, याची ही कथा. या चित्रपटाकरिता रफी यांनी गायलेले साहिर लुधियानवी यांचे गीत प्रत्यक्ष जीवनात बी. आर. चोप्रा यांचीच शोकांतिका ठरली. गीताचे बोल अप्रतिम होते, 
‘कल जहाँ बजती थी खुशियाँ, आज है मातम वहाँ, वक्त लाया था बहारें, वक्त लाया है फिजा’
साहिर लुधियानवी यांनी लिहिलेल्या या गीतात खूपच अर्थ दडला आहे. प्रत्येक माणसाने आपल्या जीवनात प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाताना या गीतातील प्रत्येक ओळी आठवणीत ठेवाव्यात, अशाच आहेत. ‘आदमी को चाहिए, वक्त से डरकर रहे कौन जाने किस घडी वक्त का बदले मिजाज,’ बी. आर. चोप्रा यांच्या यशाचा झेंडा ‘नया दौर’पासून सुरू झाला. तो ‘निकाह’पर्यंत थोड्या फार प्रमाणात यशस्वी होताच; परंतु एकदा उतरती कळा लागली, की सावरणे कठीण. ‘निकाह’नंतर दूरदर्शनवरील ‘महाभारत’ या मालिकेला यश मिळाले. रामानंद सागर यांची ‘रामायण व बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत या मालिका एके काळी दूरदर्शनचे खास आकर्षण होते. नंतरच्या काळात या बॅनरला प्रचंड अपयशाचा सामना करावा लागला. हे बॅनर कर्जात बुडाले. चोप्रा यांच्या संपत्तीचा मध्यंतरी लिलाव झाला व त्या कर्जाची रक्कम चुकती करण्यात आली. यश चोप्रा यांच्या निधनानंतर रवी चोप्रा यांची प्रकृती खालावली. आजही हे कुटुंब या धक्क्यातून सावरलेले नाही. रवी चोप्रा यांनी या बॅनरच्या पुर्नउभारणीकरिता बरेच प्रयत्न केले; परंतु अपयश आले. यशाचे शिखर पादाक्रांत करणार्‍या चोप्रा कुटुंबाला हा फार मोठा धक्का होता. बी. आर. चोप्रा यांच्या जीवनावर बेतलेली ही घटना समोर आल्यावर असाच प्रसंग एका गायिकेवर आल्याची आठवण झाली. गीता रॉय या गायिकेचा गुरुदत्तसोबत विवाह झाला. गुरुदत्त यांच्या बॅनरखाली तयार झालेल्या चित्रपटात ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘साहिब, बीबी और गुलाम’, ‘चौदहवी का चाँद’ या चित्रपटांना कलात्मक चित्रपटनिर्मिती म्हणून लोकप्रियता मिळाली. भारतीय चित्रपटसृष्टीत तयार झालेला हा पहिलावहिला सिनेमास्कोप चित्रपट. गुरुदत्तने स्वत:चीच कथा लिहीली होती. 
वक्त ने किया, क्या हँसी सितम
तुम रहे न तुम, हम रहे ना हम
आपणच गायलेलं गीत आपल्याच जीवनाची शोकांतिका ठरेल, असे गीता दत्तला त्या वेळी वाटले असेल का? इतकेच काय, गायन क्षेत्रात जेव्हा ती दाखल झाली, ते ‘दो भाई’ चित्रपटातील गीत तिचीच व्यथा सांगून जाते,
मेरा सुंदर सपना बीत गया
मै प्रेम में सब कुछ हार गई
बेदर्द जमाना जीत गया
 अशी असंख्य गाणी आहेत ज्यांमधून त्या कलावंताच्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकला जातो. अर्थातच हा केवळ योगायोग होय. आपण सामान्य माणसांनी वेळेच भान ठेवूनच जीवनाचा प्रवास करावा. आपल्यावर कोणती वेळ केव्हा येणार आहे, याचा काही नेम नाही. 
वक्त की गर्दिश में है, चाँद तारों का निजाम, 
वक्त की ठोकर में है क्या हुकुमत क्या समाज. 
वक्त से दिन और रात 
वक्त की पाबन्द है ये आती-जाती रौनके
वक्त है फुलों की सेज, वक्त है काटों का ताज
खरोखरच शेवटी म्हणावे लागते,
वक्त से दिन और रात
वक्त से कल और आज..
साहिर लुधियानवी यांची ही रचना सर्वच पिढय़ांतील लोकांना संदेश देणारी आहे. 
(लेखक हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ अभ्यासक आहेत.)