शहरं
Join us  
Trending Stories
1
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
2
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
3
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
4
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
5
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
6
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
7
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
8
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
9
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
10
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
11
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
12
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
13
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?
14
इंडोनेशिया, थायलंड, दुबई... पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांसोबत कोणकोणते देश फिरली Youtuber ज्योती?
15
Viral Video : कांदा कापताना डोळ्यांतून येणार नाही पाणी! सोशल मीडियावरचा व्हायरल देसी जुगाड बघाच
16
'या' अभिनेत्याला डेट करतीये राधिका मदन? रिलेशनशिपवर म्हणाला, "मी खूप चिपकू बॉयफ्रेंड..."
17
रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा ड्रोन हल्ला! एकाच वेळी २७३ ड्रोन्स सोडले अन्...
18
RR vs PBKS : शशांक सिंहचा परफेक्ट फिनिशिंग टच! पंजाब किंग्जनं उभारली विक्रमी धावसंख्या
19
सोलापूर आग दुर्घटना; मृतांचा आकडा पोहचला आठवर; बेडरूममध्ये सापडले पाच जणांचे मृतदेह 
20
Nehal Wadhera नं फिफ्टीसह सावरला डाव; मग प्रीती झिंटानं संघाच्या हिरोला अशी दिली दाद

वाघ वाढले, पण जगवणार कसे?

By admin | Updated: January 24, 2015 15:11 IST

माणसाच्या एका कुटुंबाला जगायला आवश्यक काय? किमान एक घर, जगण्यासाठी लागणारा किमान पैसा, दोन घास पोटात जाऊ शकेल इतकं अन्न, पाणी, वस्त्र वगैरे वगैरे.. भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचे काय? एका नर वाघाला त्याच्या अधिवासासाठी साधारण ४0 ते ५0 किलोमीटरचा परिसर लागतो

- गजानन दिवाण

 
माणसाच्या एका कुटुंबाला जगायला आवश्यक काय? किमान एक घर, जगण्यासाठी लागणारा किमान पैसा, दोन घास पोटात जाऊ शकेल इतकं अन्न, पाणी, वस्त्र वगैरे वगैरे.. भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेल्या वाघाचे काय? एका नर वाघाला त्याच्या अधिवासासाठी साधारण ४0 ते ५0 किलोमीटरचा परिसर लागतो. देशातील वाघांची संख्या आता अडीच हजारांवर गेली आहे. उत्तम, पण या वाघांना जगण्याइतकी-वाढण्याइतकी जागा उपलब्ध आहे का? त्यांचा संसार फुलू शकेल अशी व्यवस्था आम्ही निर्माण करू शकतो का, याचाही विचार करण्याची गरज आता निर्माण झाली आहे. वाघांची संख्या टिकवणे आणि त्यात निरंतर वाढ करणे हे एक मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. 
 
अधिवासाचे काय?
मदुमलाई, बांदीपूर, नागरहोळे, वायनाड या कर्नाटकातील व्याघ्र प्रकल्पांमध्ये ११ हजार चौरस कि.मी.च्या क्षेत्रात ५७0 वाघ आढळले आहेत. वाघांचा जगातील हा सर्वात मोठा अधिवास ठरला आहे. २00६ मध्ये देशातील वाघांची संख्या १४११ होती. २0१0 साली ती १७0६ वर पोहोचली. आता यात ३0 टक्क्यांनी वाढ होऊन ती २२२६ झाली आहे. वाघ वाचविण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकार, पर्यावरण क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्थांनी केलेली जनजागृती आणि जंगलात-जंगलाशेजारी राहणार्‍या लोकांचा या मोहिमेतील सहभाग यामुळेच हे शक्य झाले आहे. १८ राज्यांत ३.१८ लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात वाघांचा हा संसार पसरला आहे.  एका वाघाला जगण्यासाठी लागणारे क्षेत्र आणि आपल्याकडे असलेले सुरक्षित क्षेत्र पाहिले असता वाढलेल्या आणि भविष्यात वाढणार्‍या वाघांना जगविणे तेवढेच मोठे आव्हान ठरणार आहे. अभयारण्यात वाघ वाढू शकतात. त्या अभयारण्याचे क्षेत्र कसे वाढेल? महानगरांत माणसं जशी एकेका खोलीत दाटीवाटीनं राहतात, तसे वाघ कधीच राहत नाहीत. एकतर ते घर सोडून दुसर्‍या घराच्या शोधात बाहेर पडतात किंवा इतरांना संपवून आहे त्याच घराचा ते राजा होतात. बाहेर पडलेल्या वाघाला सुरक्षित अधिवास मिळाला तर ठीक, नाही तर माणसांबरोबरचा संघर्ष ठरलेला. खाणारी तोंडे वाढल्याचाच हा परिणाम. ते रोखण्याचे मोठे आव्हान आपल्यासमोर आहे. 
 
जंगलांना जोडणारे कॉरिडॉर
अधिवास आणि ‘इनब्रिडिंग’चा (माणसांच्या भाषेत एकच गोत्र) प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दोन जंगलांना जोडणारा कॉरिडॉर निर्माण करणे आणि तो सुरक्षित करणे आवश्यक आहे. देशभरात सध्या केवळ कान्हा ते पेंच याच एकमेव कॉरिडॉरवर अभ्यास झाला आहे. देशातले सारे ४३ व्याघ्र प्रकल्प कॉरिडॉरच्या माध्यमातून जोडणे गरजेचे आहे. असे झाले तर वाघांची संख्या वाढली तरी त्यांना स्वत:चे घर शोधणे कठीण जाणार नाही. असे किती वाघ आम्ही आपल्या जंगलांमध्ये वाढवू शकतो, याचाही विचार करायला हवा. कधीकाळी भारतातील वाघांची संख्या लाखाच्या घरात होती. २0१३ साली इंग्लंडमधील काही संशोधकांनी बंगळुरू येथील नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सच्या मदतीने अभ्यास केला तेव्हा धक्कादायक सत्य समोर आले. वाघांची संख्या झपाट्याने कमी होण्यात शिकार, अधिवास, माणसांबरोबरचा संघर्ष यासोबतच ‘इनब्रिडिंग’ हे त्यातील महत्त्वाचे कारण होते. वेगवेगळ्या क्षेत्रातील वाघिणींशी मेटिंग न झाल्याने १00 वर्षांपूर्वीचे वाघ आणि आत्ताचे वाघ यांच्या डीएनएमध्ये प्रचंड तफावत तर होतीच; शिवाय आत्ताच्या वाघांत जवळपास ९३ टक्के विविधता कमी आढळून आली होती.  
 
जंगलांतील गावांचे पुनर्वसन 
प्राण्यांचे जगणे सुकर होण्यासाठी जंगलातील प्रत्येक गाव बाहेर आणण्याची गरज आहे. केवळ महाराष्ट्राचा विचार केला तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील ११ गावांचे पुनर्वसन पूर्ण झाले आहे, तीन गावांत प्रक्रिया सुरू आहे, तर आठ गावांचे पुनर्वसन बाकी आहे. पुनर्वसन झालेल्या बोरी, कुंड, कोहा, धारगड, नागरतास, अमोना, बारूखेडा येथे आता प्राण्यांचा संसार फुलला आहे. वाघांसारखे प्राणी दिवसाही या भागात भेटतात. पुनर्वसन झाल्याने प्राण्यांचेच भले झाले असे नाही, जंगलातून बाहेर पडलेल्या आदिवासींचेही राहणीमान सुधारले आहे.  
 
 
वाघ
 
महाराष्ट्र 
१९0
 
कर्नाटक
४0६
 
उत्तराखंड
३४0
 
केरळ
१३६
 
तामिळनाडू
२२९
 
भारतातील  
एकूण वाघ    २२२६