शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

भीती आहे, बंदी नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:05 IST

जपानमध्ये घबराट जरूर आहे;  पण त्याचा धसका कोणी घेतलेला नाही.  लोकांच्या स्वातंत्र्यावरही बंदी आलेली नाही. याचं कारण जपान मुळातच शिस्तशीर आहे. 

ठळक मुद्देआक्रस्ताळेपणा करणं हा मुळातच जपान्यांचा स्वभाव नाही. कायद्याचंही काटेकोर पालन. त्यामुळे निदान आतापर्यंत तरी सरकारनंही लोकांवर फारसे निर्बंध घातलेले नाहीत. 

- रोहित हळबे

जगभर हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसनं आता जपानमध्येही शिरकाव केला आहे. त्याचे परिणाम आता दिसायला लागले आहेत. लोकांच्या मनात घबराट जरूर आहे; पण प्रत्यक्षात त्याचा फार धसका कोणी घेतल्याचं चित्र मात्र दिसत नाही. सरकारनंही स्वत:हून लोकांवर फारसे निर्बंध लादलेले नाहीत. कोणालाही घरात डांबून ठेवलेलं नाही. त्यांच्या स्वातंत्र्यावर बंदी आलेली नाही. लोकांना वाटेल त्यावेळी ते बाहेर पडू शकतात, कामावर जाऊ शकतात. याचा अर्थ संकट दाराशी घोंघावत असतानाही जपानी सरकार किंवा जपानचे लोक अजून जागे झालेले नाहीत, असं म्हणायचं का?तसं कधीच म्हणता येणार नाही, कारण अर्थातच त्यामागे काही कारणं आहेत. ती आपल्याला समजून घ्यावी लागतील.मुळात जपान हा अतिशय शिस्तशीर देश आहे. आपलं कर्तव्य, आपल्या जबाबदार्‍या आणि आपली कामं यांना जपानी लोक सर्वाधिक महत्त्व देतात. त्यामुळे सरकारनं काही निर्बंध लागू करण्याच्या आधी लोकांनी स्वत:हूनच आपल्यावर अनेक निर्बंध लादून घेतले आहेत.दुसरी गोष्ट, जपानची लोकसंख्या अतिशय कमी आहे. वृद्धांची संख्या जास्त आहे. त्यामुळे असंही जपानध्ये रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फार लोकं एकावेळी कधीच दिसत नाहीत. अर्थात टोकिओसारखं राजधानीचं शहर, काही टुरिस्ट स्पॉट्स, रेल्वे स्टेशन. यांसारख्या काही ठिकाणी लोकांची थोडीफार गर्दी असते, दिसते; पण तीही आता कमी झाली आहे.आक्रस्ताळेपणा करणं हा मुळातच जपान्यांचा स्वभाव नाही. कायद्याचंही काटेकोर पालन. त्यामुळे निदान आतापर्यंत तरी सरकारनंही लोकांवर फारसे निर्बंध घातलेले नाहीत. विविध माध्यमांतून आवाहन, विनंती मात्र ते करीत आहेत. जपानमधील लोकांना तेवढं पुरेसं आहे. त्यामुळे समूहाच्या भीतीचं वातावरण इथे दिसत नाही. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी जाणं बंद केलं आहे. आठवडाभर काम केल्यानंतर इथले लोक वीकेण्डला जातात. वीकेण्डसाठी बाहेर पडणं त्यांनी थांबवलं आहे. मोठमोठे इव्हेण्ट्स आधीच कॅन्सल झाले आहेत. बाहेर पडताना मास्कचा वापर केला जात आहे. त्यामुळे मास्क, टिश्यू पेपरचं शॉर्टेज इथे आहे. डिस्नेलॅँडला लोकांची गर्दी असते; पण 29 फेब्रुवारी ते 15 मार्च या काळात ते आधीच बंद ठेवण्यात आले आहेत. कदाचित ही मुदत आणखी वाढवण्यात येईल. स्पोर्ट्स सेंटर्स काही काळासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. कंपन्यांनी कर्मचार्‍यांना घरून काम करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे कंपन्यांतली गर्दी कमी झाली आहे. महत्त्वाच्या मीटिंग्जही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतल्या जात आहेत. सार्वजनिक वाहतुकीसाठी एकाचवेळी सगळ्यांची गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जात आहे. कामाच्या वेळाही बदलण्यात आल्या आहेत. समजा एखाद्या कंपनीतील कर्मचार्‍यांची वेळ सकाळी सातची असेल, तर काही जण सातला, काही जण आठला, काही जण नऊला. अशी बदलण्यात आली आहे. जेणेकरून कुठेही गर्दी होणार नाही.आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे, जपानमध्ये कोरोनामुळे दुर्दैवानं काही जणांचा मृत्यू झाला; पण ते वृद्ध होते. या वृद्धांचीही काळजी घेतली जात आहे. सरकार, कंपन्या आपापल्या पातळीवर लोकांची तपासणी करताहेत. सगळं काही शिस्तशीर सुरू आहे. रस्ते ओस पडलेत, गर्दी कमी झालीय, लोकांनी आधीच किराणा आणि इतर सामान घरात भरून ठेवलंय. भीती आहेच; पण त्यापेक्षाही काळजी अधिक दिसतेय. दुकानं पूर्णत: बंद झालीत, काहीच मिळत नाहीये. अशी स्थिती सध्या तरी नाहीए.(लेखक जपानच्या टोकिओतील रहिवासी आहेत.)

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे)