शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

शासकीय सेवेतले यश

By admin | Updated: July 26, 2014 12:36 IST

शासकीय सेवेत असाल, तर फक्त स्वत:च्याच उन्नतीचा नव्हे, तर एकंदर समाजाच्याच उन्नतीचा विचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. फक्त स्वत:चाच विचार करणे कमी करून आपले काम आणि वर्तन हे सर्वांच्याच फायद्याचे कसे होईल, याचा विचार करण्यावर भर द्यावा

- भीष्मराज बाम 

 
मी शासकीय सेवेत आहे. काही महिन्यांपूर्वी माझ्या वरिष्ठांची बदली झाली. नवे अधिकारी विचित्र स्वभावाचे आहेत. तोंडपूज्या लोकांच्या सल्ल्याने वागतात. त्यामुळे फार त्रास होतो. मला अलीकडे राग फार लवकर येतो आणि काहीही बोलले जाते. त्यामुळे संबंध दुरावले आहेत. त्यातून माझ्या एका प्रिय व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. मन निराश राहते. पूर्वी असे नव्हते. काय करावे?
 
- शासकीय सेवेत आपली स्वत:चीच बदली आपल्या हातात नसते, तर वरिष्ठ कोण असावा ते आपल्याला कसे ठरवता येईल? आपले सहकारी, नेमणुकीची जागा, हाताखालचे लोक हेसुद्धा कोण आणि कसे असावेत ते आपण ठरवू शकत नाही. त्यांनी कसे वागावे, हेही आपल्या नियंत्रणाखाली नसते. आपला प्रतिसाद आपण नियंत्रित करायला हवा. तोच फक्त आपल्या हातात असतो. आपला मूड आपणच सांभाळायला हवा. तुमचा स्वत:वरचा ताबा सुटत चालला आहे, असे दिसते. स्वभाव चिडखोर होणे, हे त्याचे प्रमुख लक्षण आहे. पूर्वी असे नव्हते, हे तुम्हीच नमूद केलेले आहे. म्हणजे आपले मूड इतरांवर अवलंबून राहायला नकोत, हे शहाणपण तुमच्यामध्ये आहे. मात्र, बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे तुम्हाला अवघड जात आहे.
संबंध दुरावण्याइतके तुमचे स्वत:वरचे नियंत्रण गेलेले आहे. ही तर धोक्याची घंटा आहे. काहीही बोलले जाते म्हणजे बोलून झाल्यावर आपण असे बोलायला नको होते, याची तुम्हाला जाणीव होत आहे. चांगले आयुष्य जगण्यासाठी इतरांशी संबंध नीट सांभाळता यायला हवेत. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा या बाबीला जास्त महत्त्व दिले गेले पाहिजे. मुळात तुमचे अवधान कशावर असायला हवे ते ठरवण्याची तुमची शक्तीच नाहीशी झाली आहे. तुम्ही जे बोलणार असाल, ते देहबोलीसारखेच आपला आतला भाव प्रकट करायला लागते. आपल्या बोलण्यावर नियंत्रण नसणे म्हणजे नंग्या तलवारी फिरवत गर्दीतून चालण्यासारखे आहे. जिभेचे घाव हे तर तलवारीच्या घावापेक्षाही जास्त खोल जातात. ज्यांना ते झाले असतील, ते लोक तुम्हाला सहजासहजी क्षमा करणार नाहीत. मग ते दुरावणारच.
फक्त शासकीय सेवेतच नव्हे, तर कोणत्याही व्यवसायात असलात, तरी तुम्हाला अशा प्रसंगांना तोंड द्यावेच लागणार. मलाही माणुसकी जागी ठेवून काम करणारे फार थोडे अधिकारी भेटले. त्यांच्यापैकी एकाने दिलेला सल्ला मला माझ्या आयुष्यात खूप उपयोगी पडला. तोच कदाचित तुम्हालाही उपयोगी पडेल, असे वाटते. त्यांनी मला सांगितले होते, जगात माणसे अशीच असतात. सर्व जग सुधारेल तेव्हाच मीही चांगले काम करून दाखवीन, हा अत्यंत चुकीचा दृष्टिकोन आहे. इतर सारे कसेही असले, तरी मी कसे असावे आणि कसे व्हावे ते मीच ठरवायचे आहे. आपल्या वाट्याला आलेले काम उत्तम कसे करता येईल, आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात सुधारणा कशी होत जाईल, आपण समाजाच्या जास्तीत जास्त उपयोगी कसे पडू या सर्व मुद्दय़ांचा विचार होत राहायला हवा. आपली जबाबदारी आपणच संभाळायला हवी. आपले काम चोखपणे करीत राहिले, तर आपल्याविरुद्ध असलेले लोकही आपल्याला अनुकूल व्हायला लागतात असा माझा तरी अनुभव आहे.
मन निराश आणि उद्विग्न राहू दिले, तर अडचणी सहन करण्याची आपली शक्ती कमी होत जाते. प्रिय व्यक्तींच्या मृत्यूसारखे आघात होतच राहणार आहेत. ते सहन करण्यापलीकडे आपल्याला दुसरे काय शक्य आहे? आपला दृष्टिकोन नकारात्मक झाल्यास आपल्याच व्यक्तिमत्त्वात खोट येते. तसे होऊ देता कामा नये. आपले शरीर आणि मन कणखर असावे, हे पाहण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे. जेवढा वेळ मिळेल, तेवढा योगासाठी, व्यायामासाठी काढावा. मित्र जोडावेत, आपले छंद जोपासावेत. अध्यात्म हाही एक उत्तम छंद आहे. वाचावे, लिहावे, ज्ञानाची आणि अनुभवाची देवाणघेवाण हा मनुष्यजातीला मिळालेला सर्वांत उत्कृष्ट ठेवा आहे.
आठवड्यातून काही वेळ तरी डायरी लिहिण्यासाठी दिला पाहिजे. आपले चांगले अनुभव स्मरणातून निसटून जातात. ते लिहून काढण्यावर कटाक्ष ठेवावा. आपल्या संपर्कात येणार्‍या व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि वागणूक यांचा अलिप्तपणे अभ्यास करण्याचा छंद लावून घ्यावा. तुमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचा विचित्र स्वभाव आणि त्यांच्या जवळ असणार्‍या लोकांचा तोंडपुजेपणा तुमच्या लक्षात आला आहे; पण त्यासाठी त्यांना कंडम करून टाकून त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठीच नुकसानीचे ठरेल. प्रत्येक माणसामध्ये गुण आणि दोष हे दोन्ही असतातच. इतरांच्या गुणांवर अवधान ठेवता येणे हे संबंध चांगले ठेवण्याच्या दृष्टीने फार गरजेचे आहे. मला आठवते, बर्‍याच वरिष्ठ अधिकार्‍यांशी माझे मुळीच पटले नाही; पण मी प्रयत्नाने गुणांवर अवधान ठेवण्याची सवय लावून घेतली होती. त्यामुळे त्या बहुतेकांकडून मला बरेच काही शिकता आले.
तुम्ही शासकीय सेवेत आहात. फक्त स्वत:च्याच उन्नतीचा नव्हे, तर एकंदर समाजाच्याच उन्नतीचा विचार करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. ती साधण्यासाठी आपले चित्त उद्विग्न होऊ न देता उत्तम कार्य करण्याचा उत्साह तुमच्यामध्ये असायला हवा. तो जर नसला, तर तुम्ही चांगले शासकीय अधिकारी होण्याची शक्यता कमीच असेल. फक्त स्वत:चाच विचार करणे कमी करून आपले काम आणि वर्तन हे सर्वांच्याच फायद्याचे कसे होईल, याचा विचार करण्यावर भर द्यावा. 
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)