शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्म; आजच्या शिक्षणाचे परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 13:14 IST

खरे म्हणजे आजच्या शिक्षणावर आणि शिक्षण पद्धतीवरच माझा विश्वास नाही. आपल्या शिक्षणातून मुले कामचुकार निपजतात अशी स्थिती आहे. पण ही व्याख्या शक्य तितक्या लवकर बदलली पाहिजे.

ठळक मुद्दे‘‘तूू राणी मी राणी मग पाणी कोण आणी’’

संकलन-बाबा मोहोडखरे म्हणजे आजच्या शिक्षणावर आणि शिक्षण पद्धतीवरच माझा विश्वास नाही. आपल्या शिक्षणातून मुले कामचुकार निपजतात अशी स्थिती आहे. पण ही व्याख्या शक्य तितक्या लवकर बदलली पाहिजे. ज्या शिक्षणाचा कामाशी, जीवनाशी संबंध राहत नाही ते शिक्षण एका रात्रीत बदलले तरी आपल्याला आनंद झाला पाहिजे, नव्हे तसे क्रांतिकारी विचार आपण करायला लागले पाहिजे.आजची स्थिती मोठी विचित्र आहे.‘‘तूू राणी मी राणीमग पाणी कोण आणी’’अशी सगळीकडे अवस्था झाली आहे. आज शिकलेला प्रत्येक माणूस कारकून होतो, चपराशी होतो, साहेब होतो, पण चांगला शेतकरी होत नाही, चांगला कामगार होत नाही. त्याला आपले कपडे धुता येत नाहीत. बाईने शिक्षण घेतले की स्वयंपाकाची तिला लाज वाटू लागते. वास्तविक या परावलंबनात्मक वस्तुस्थितीची प्रत्येक शिक्षित माणसाला लाज वाटली पाहिजे. त्याला अत्यंत अभिमानाने सांगता आले पाहिजे की अमुक अमुक गोष्टी माझ्या श्रमातून निर्माण झाल्या. जीवनाच्या, देशाच्या उणिवा भरून काढण्याची शक्ती आणि युक्ती अंगात येणे याला मी शिक्षण समजतो.एखाद्या सुंदर बगिच्यात नाना रंगाची, नाना आकाराची फुले असतात. त्या फुलांमुळे त्या बागेला शोभा येते. तसेच या देशाचेही आहे. या देशात नाना धर्मपंथाचे पन्नास कोटी लोक राहतात. त्या सर्वांना परस्परांशी प्रेमाने वागता, राहता आले पाहिजे. शिक्षणामुळे ही गोष्ट सहज साध्य झाली पाहिजे. शिक्षणामुळे जर जातीजातीत, धर्माधर्मात सुरू असलेल्या भांडणांची गंमत पाहण्याची अक्कल येत असेल तर त्याला मी तरी शिक्षण मानायला तयार नाही.धर्म म्हणजे इमानदारी :-शिक्षणामुळे जीवनाची मूल्ये बदलली पाहिजेत. म्हणजे ती अधिक चांगली, अधिक उजळ झाली पाहिजेत. आता आपण स्वतंत्र आहोत. स्वतंत्र देशाचे नागरिक आहोत. आता आपल्याला नुसते कारकून तयार करणारे शिक्षण स्वीकारून चालणार नाही. माझी धर्माची व्याख्या इमानदारी ही आहे. हिंदू की मुसलमान हा नंतरचा प्रश्न आहे. इमानदारीने शेतात काम करणारा माणूस सहजपणे देवाला प्राप्त करून घेऊ शकेल, परंतु वर्षोगणती देवापुढे बसला, त्याने रोज नाकापासून शेंडीपर्यंत गंध लावले, देवापुढे लोटांगणे घातली तरी त्याला देव मिळू शकणार नाही.ही गोष्ट आपल्या संत-परंपरेने अधिक स्पष्ट केली आहे. गोरोबा कुंभार, सावता माळी, नामदेव शिंपी, रोहिदास चांभार, भक्त पुंडलिक हे सारे आधी इमानदार माणसे होती. त्यानंतर मग ते संत, भक्त वगैरे होते. त्यांनी जीवनभर आपापले व्यवसाय इमानदारीने केले आणि जनता जनार्दनाची सेवा करून देव जोडला. असे नसते तर तेही एखाद्या मंदिरात टाळ कुटत बसले असते !शाळांचे कर्तव्यईश्वरप्राप्तीचा हा असा इतिहास आहे. काम सोडून सोंग घेण्याने देव प्राप्त होत नाही. एखाद्या शाळेत याउलट शिकविले जात असेल तर ती शाळा नाही. शिक्षकाने विद्यार्थ्याला घडविण्याचा विचार ईश्वरभक्ती समजून केला पाहिजे. असे झाले तर आपल्या एका एका शाळेतून कितीतरी गांधी, कितीतरी टिळक आणि कितीतरी जवाहरलाल निर्माण होतील आणि स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी एक जबाबदार पिढी निर्माण केल्याचे श्रेय आपणा सर्वांस मिळेल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक