शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
4
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
5
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
6
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
7
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
8
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
9
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
10
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
11
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
12
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
13
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
14
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
15
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
16
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
17
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
18
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
19
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
20
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  

सप्तर्षीना कुरुंदकर समजलेच नाहीत

By admin | Updated: October 3, 2015 22:00 IST

‘मंथन’मधील आपल्या लेखात आपण कुरुंदकरांविषयी अनेक विधाने केली आहेत. ‘‘मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणा:या विचारवंतांमध्ये

मा. डॉ. कुमार सप्तर्षी,
‘मंथन’मधील आपल्या लेखात आपण कुरुंदकरांविषयी अनेक विधाने केली आहेत. 
‘‘मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणा:या विचारवंतांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, इस्लामबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता. हा दोष कुरुंदकरांमध्ये सुप्त अवस्थेत होता.’’
- म्हणजे मराठवाडय़ातील विचारवंत स्वत:ला पुरोगामी म्हणत असत. तुम्ही त्यांना पुरोगामी समजता की नाही? तर नाही. त्यांचे पुरोगामित्व त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांवर, केलेल्या, स्वीकारलेल्या कृतीद्वारे सिद्ध होत असते. सगळ्याच मुस्लिमांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता हे खरे नाही. त्यांनी केलेल्या प्रासंगिक कृतिसंबंधाने राग होता. प्रासंगिक राग सा:या समाजाबद्दलचा सार्वत्रिक व व्यापक स्वरूपाचा गृहीत धरून त्यांच्यावर दोषारोप करणो कितपत योग्य आहे? याच काढलेल्या अतार्किक निष्कर्षाद्वारे कुरुंदकरांमध्ये हा दोष सुप्त अवस्थेत होता, असे म्हणणो त्यांच्या मृत्यूनंतर, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.
आपण म्हणता, ‘‘रझाकारांनी अत्याचार केले, तो इस्लामच्या, धर्मग्रंथाच्या शिकवणीचा भाग नव्हता. याबद्दल मी कुरुंदकरांशी खूप वेळा वाद घातलेला आहे; पण ते भूतकाळातील आठवणी विसरावयास तयार नव्हते. तेवढा भाग सोडला तर कुरुंदकर पुरोगामी विचारांचे होते.’’
- रझाकारांनी अनन्वित व अमानुष अत्याचार केले, ते सगळेच निंदनीय व अमानवी होते. ते ज्यांनी जवळून पाहिले, अनुभवले, भोगले आहेत, त्यांना त्या कृत्याचा राग येणो स्वाभाविक आहे. त्या कृत्याचा विरोध म्हणजे मुस्लिमांचा द्वेष आणि विरोध, असे अनुमान काढणो योग्य ठरेल काय? 
आंबेडकरांच्या विचारांना आणि दलितांच्या विकासाला त्यांचा कधीच विरोध नव्हता. त्यांचा त्या वातावरणात राजकीय उद्दिष्ट बनलेल्या नामांतराच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पवित्र होता. एस. एम. जोशी यांच्या भूमिकेबाबतही तोच विरोधाचा पवित्र होता. कुरुंदकरांनी कितीतरी दलित विद्याथ्र्याना जीवनात उभे केले आहे, त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण केली आहे. अनेकांना लिहिते-बोलते केले आहे. आपले वेगळेपण जोपासणारे नाटककार दत्ता भगत यांच्याकडे त्यांचे मानसपुत्र म्हणून पाहिले जाते. सुव्र्यासारख्या कवीच्या कवितांना सर्वप्रथम उचलून धरणारे आणि समीक्षक सुधीर रसाळांशी ‘प्रतिष्ठान’मधून वाद घालणारे तेच होते. पुढे तर सुव्र्याना मानमान्यता प्राप्त झाली. हे सारे ते दलितविरोधी होते, याचे पुरावे मानावयाचे 
का? 
ते स्वत:ला समाजवादी, पुरोगामी विचारांचे समजत आणि ख:या अर्थाने होतेही. ते खरे तर मानवतावादी होते. मानवाच्या जीवनातील वेदनेवर फुंकर घालून त्यांना जगणो सुसह्य करण्यासाठी समाजवादी विचार पूरक आहेत, अशी त्यांची धारणा होती. समाजवाद आणि मानवतावाद यात ते मानवतावादाची कास धरीत असत. हे करीत असताना समाजवादी विचारांना छेद जात असेल तर त्यांनी ते स्वीकारले आणि त्याची किंमत मोजली. सारे हार-प्रहार सहन केले. जीवन जगणा:या माणसांवर आणि माणसांच्या जीवनावर त्यांची गाढ निष्ठा होती. हे लक्षात घेतले तर त्यांना समजून घेणो अधिक वास्तववादी ठरेल. 
सहज जाता जाता - आपण लेखामध्ये आक्रमकपणो मांडणी करून मोरे यांच्या वैचारिक भूमिकेचा समाचार घेतला आहे. अध्यक्षीय व्याख्यानातून ‘पुरोगामी दहशतवादी’ अशी जी संज्ञा मोरे यांनी मांडली आहे, ती खून करणो, बॉम्बफेक करणो, आतंकवाद निर्माण करणो, जाळपोळ करणो, निरपराध लोकांचा बळी घेणो या अर्थाने नसावी असे वाटते. समाजवाद्यातील विचारांचा आक्रमकपणा म्हणजेच वैचारिक दहशतवाद अशीच कदाचित त्यांची भूमिका असेल. एखादी वैचारिक भूमिका भावनिक पातळीवरून आवेशपूर्ण पद्धतीने अभिव्यक्त झाली, तर त्याची परिणामकारकता उणावण्याची शक्यता असते. त्यातील जोश आणि आवेशच लक्षवेधी ठरत असतो, हे मी आपणाला सांगणो उचित होणार नाही. आपला लेख वाचून पुरोगाम्यांच्या वैचारिक दादागिरीचे - वैचारिक दहशतवादाचे उत्तम उदाहरण हेच आहे, असे प्रा. मोरे यांना वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी काय लिहावे?
 
- आपला स्नेहांकित
प्रा. मधुकर राहेगावकर, 
नांदेड