शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

सप्तर्षीना कुरुंदकर समजलेच नाहीत

By admin | Updated: October 3, 2015 22:00 IST

‘मंथन’मधील आपल्या लेखात आपण कुरुंदकरांविषयी अनेक विधाने केली आहेत. ‘‘मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणा:या विचारवंतांमध्ये

मा. डॉ. कुमार सप्तर्षी,
‘मंथन’मधील आपल्या लेखात आपण कुरुंदकरांविषयी अनेक विधाने केली आहेत. 
‘‘मराठवाडय़ातील पुरोगामी म्हणविणा:या विचारवंतांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, इस्लामबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता. हा दोष कुरुंदकरांमध्ये सुप्त अवस्थेत होता.’’
- म्हणजे मराठवाडय़ातील विचारवंत स्वत:ला पुरोगामी म्हणत असत. तुम्ही त्यांना पुरोगामी समजता की नाही? तर नाही. त्यांचे पुरोगामित्व त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांवर, केलेल्या, स्वीकारलेल्या कृतीद्वारे सिद्ध होत असते. सगळ्याच मुस्लिमांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता हे खरे नाही. त्यांनी केलेल्या प्रासंगिक कृतिसंबंधाने राग होता. प्रासंगिक राग सा:या समाजाबद्दलचा सार्वत्रिक व व्यापक स्वरूपाचा गृहीत धरून त्यांच्यावर दोषारोप करणो कितपत योग्य आहे? याच काढलेल्या अतार्किक निष्कर्षाद्वारे कुरुंदकरांमध्ये हा दोष सुप्त अवस्थेत होता, असे म्हणणो त्यांच्या मृत्यूनंतर, हे त्यांच्यावर अन्याय करणारे आहे.
आपण म्हणता, ‘‘रझाकारांनी अत्याचार केले, तो इस्लामच्या, धर्मग्रंथाच्या शिकवणीचा भाग नव्हता. याबद्दल मी कुरुंदकरांशी खूप वेळा वाद घातलेला आहे; पण ते भूतकाळातील आठवणी विसरावयास तयार नव्हते. तेवढा भाग सोडला तर कुरुंदकर पुरोगामी विचारांचे होते.’’
- रझाकारांनी अनन्वित व अमानुष अत्याचार केले, ते सगळेच निंदनीय व अमानवी होते. ते ज्यांनी जवळून पाहिले, अनुभवले, भोगले आहेत, त्यांना त्या कृत्याचा राग येणो स्वाभाविक आहे. त्या कृत्याचा विरोध म्हणजे मुस्लिमांचा द्वेष आणि विरोध, असे अनुमान काढणो योग्य ठरेल काय? 
आंबेडकरांच्या विचारांना आणि दलितांच्या विकासाला त्यांचा कधीच विरोध नव्हता. त्यांचा त्या वातावरणात राजकीय उद्दिष्ट बनलेल्या नामांतराच्या प्रश्नासंदर्भात विरोधी पवित्र होता. एस. एम. जोशी यांच्या भूमिकेबाबतही तोच विरोधाचा पवित्र होता. कुरुंदकरांनी कितीतरी दलित विद्याथ्र्याना जीवनात उभे केले आहे, त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण केली आहे. अनेकांना लिहिते-बोलते केले आहे. आपले वेगळेपण जोपासणारे नाटककार दत्ता भगत यांच्याकडे त्यांचे मानसपुत्र म्हणून पाहिले जाते. सुव्र्यासारख्या कवीच्या कवितांना सर्वप्रथम उचलून धरणारे आणि समीक्षक सुधीर रसाळांशी ‘प्रतिष्ठान’मधून वाद घालणारे तेच होते. पुढे तर सुव्र्याना मानमान्यता प्राप्त झाली. हे सारे ते दलितविरोधी होते, याचे पुरावे मानावयाचे 
का? 
ते स्वत:ला समाजवादी, पुरोगामी विचारांचे समजत आणि ख:या अर्थाने होतेही. ते खरे तर मानवतावादी होते. मानवाच्या जीवनातील वेदनेवर फुंकर घालून त्यांना जगणो सुसह्य करण्यासाठी समाजवादी विचार पूरक आहेत, अशी त्यांची धारणा होती. समाजवाद आणि मानवतावाद यात ते मानवतावादाची कास धरीत असत. हे करीत असताना समाजवादी विचारांना छेद जात असेल तर त्यांनी ते स्वीकारले आणि त्याची किंमत मोजली. सारे हार-प्रहार सहन केले. जीवन जगणा:या माणसांवर आणि माणसांच्या जीवनावर त्यांची गाढ निष्ठा होती. हे लक्षात घेतले तर त्यांना समजून घेणो अधिक वास्तववादी ठरेल. 
सहज जाता जाता - आपण लेखामध्ये आक्रमकपणो मांडणी करून मोरे यांच्या वैचारिक भूमिकेचा समाचार घेतला आहे. अध्यक्षीय व्याख्यानातून ‘पुरोगामी दहशतवादी’ अशी जी संज्ञा मोरे यांनी मांडली आहे, ती खून करणो, बॉम्बफेक करणो, आतंकवाद निर्माण करणो, जाळपोळ करणो, निरपराध लोकांचा बळी घेणो या अर्थाने नसावी असे वाटते. समाजवाद्यातील विचारांचा आक्रमकपणा म्हणजेच वैचारिक दहशतवाद अशीच कदाचित त्यांची भूमिका असेल. एखादी वैचारिक भूमिका भावनिक पातळीवरून आवेशपूर्ण पद्धतीने अभिव्यक्त झाली, तर त्याची परिणामकारकता उणावण्याची शक्यता असते. त्यातील जोश आणि आवेशच लक्षवेधी ठरत असतो, हे मी आपणाला सांगणो उचित होणार नाही. आपला लेख वाचून पुरोगाम्यांच्या वैचारिक दादागिरीचे - वैचारिक दहशतवादाचे उत्तम उदाहरण हेच आहे, असे प्रा. मोरे यांना वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणखी काय लिहावे?
 
- आपला स्नेहांकित
प्रा. मधुकर राहेगावकर, 
नांदेड