शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

रन फॉर पीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 03:09 IST

संवादी बदलांसाठी एक पाऊल पुढे..

-  संजय नहार

खेळांसाठी मैदानं नाहीत, करमणुकीसाठी चित्रपटगृहे नाहीत. अशांततेचं प्रतीक असलेला कर्फ्यू मात्र कायमच सोबतीला. सततच्या नकारात्मक वातावरणाचा परिणाम मुलांच्या मनावर होतोच. त्यात देशाच्या दोन्ही भागांत कायम संशयाचं वातावरण. ही दरी दूर व्हावी म्हणून पुण्याच्या ‘सरहद’ या संस्थेनं कारगिलमध्ये नुकतीच एक अनोखी संकल्पना राबवली..

कारगिल फक्त युद्धभूमी नव्हे. कारगिल म्हटलं की आपल्याला आठवते ती हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेली तिथली युद्धभूमी. १९९९ मध्ये पाकिस्तानच्या हल्ल्याला सडतोड उत्तर देत कारगिलचं युद्ध भारतीय जवानांनी जिंकलं होतं. परंतु यापलीकडे कारगिलविषयीची माहिती आपल्याला नसते.कारगिल ही केवळ युद्धभूमी नाही. तिथंही आपल्यासारखीच माणसं राहतात. त्यांचंही म्हणून एक जनजीवन सुरू असतं. रोजची जगण्याची मारामारी सुरू असते हे आपल्या गावीच नसतं. कारण आपण तिथवर पोहचत नाही.एकूणच जम्मू-काश्मीरबाबत आपल्याला माहीत असतं, ते केवळ बातम्यांतून. त्याव्यतिरिक्त ना आपला त्यांच्याशी काही कनेक्ट असतो ना त्यांचा आपल्याशी.इथल्या मुलांचा जन्म हिंसाचाराच्या बातम्या ऐकण्या-पाहण्यात, गोळीबाराचा आवाज ऐकण्यात होतो. ती वाढतातही ‘कर्फ्यू’च्या साथीनं. सततचं कोंडलेपण, दबलेपण आणि विस्कटलेपण अशा वातावरणात मुलं वाढत राहिली तर त्यांच्या सळसळत्या ऊर्जेचं काय करायचं? वयात येणारी मुलं कुठल्या ना कुठल्या कामात गुंतून राहिली नाही तर ती भरकटणार, विस्कटणार आणि स्वत:ला हरवून बसणार.इथं खेळांसाठी मैदानं नाहीत, करमणुकीसाठी चित्रपटगृहे नाहीत. पाचवीला पुजलेला कर्फ्यू मात्र असतो. मग घरात बसून सतत टीव्ही आणि त्यावरच्या बातम्या. सामाजिक-राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असणारा हा भूप्रदेश. सततच्या नकारात्मक बातम्यांचा परिणाम या मुलांवर होतोच. नैराश्यात जातात. अशा मुलांच्या ऊर्जेचा वापर आपण कसा करून घेऊ शकतो, तिथल्या स्थानिक मुला-मुलींसाठी काय करता येईल असा विचार आमच्या मनात सुरू होता. त्यातूनच आकाराला आली, ‘कारगिल इंटरनॅशनल मॅरेथॉन’ ही संकल्पना. ‘रन फॉर पीस’, ‘रन फॉर सरहद’ म्हणत स्थानिक मुले, तरुण-तरुणींसह शांततेच्या भावनेसाठी धावायचं असं ठरलं.कारगिलचा प्रदेश लडाख या भूभागात येतो. कारगिल प्रदेशात बहुसंख्य मुस्लीम. कारगिलचं वैशिष्ट्य म्हणजे इथली माणसं मुळातच भारतीयत्वाशी बंध सांगणारी आहेत. पुण्यातील ‘सरहद’ या आमच्या संस्थेतही काश्मीरमधील १५० मुले-मुली शिकण्यासाठी दत्तक घेतलेली आहेत. त्यापैकी ३९ मुले कारगिलमधील आहेत.या सर्व मुलांच्या मनात आपल्या भूप्रदेशाविषयीच्या चांगल्या आठवणी रुजणे आवश्यक आहे. शिक्षण घेऊन झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्यांच्या प्रदेशात जाऊन काम करण्याची प्रेरणा मिळायला हवी, अशी आस ठेवून सरहदमधील आम्ही साथी कामाला लागलो. खरंतर हा उपक्र म मागील वर्षी म्हणजे २०१६ मध्येच करायचा होता. पण बुरहान वाणीच्या खुनामुळे परिस्थिती चिघळली आणि आम्हाला आमची सर्व तयारी गुंडाळावी लागली. याही वर्षी अमरनाथ यात्रेच्या हल्ल्याची पार्श्वभूमी होतीच. तरीही आमचा निश्चय पक्का होता. मागील काही महिन्यांपासून आम्ही याबाबत तयारी करत होतो. ‘सरहद’ने काश्मीरमध्ये प्रत्यक्ष काम केल्याने आमच्याविषयी तिथे एक विश्वासार्हता निर्माण झाली आहे. शांतता प्रत्येकालाच हवी आहे. मुख्य म्हणजे आत्तापर्यंत कारगिलमधल्या नागरिकांसाठी कधीही, कुठलीही कृती, कार्यक्र म झालेला नव्हता. त्यांच्यासाठीही हे विशेषच होते. पर्यटक आले तरी ते कारगिल युद्धाच्या जागा पाहून लगेच निघतात. श्रीनगर ते लेह या दरम्यानच्या प्रवासाचा ‘एक थांबा’ इतकाच काय तो कारगिलचा संबंध. इथल्या नागरिकांशी संपर्क, संवाद, नवनवीन जागांचा पर्यटनासाठी उपयोग असं काहीही घडत नव्हतं. या संवादाचा पहिला टप्पा म्हणून आम्ही मॅरेथॉनचा विचार करत होतो. मॅरेथॉनच का तर हा एक खेळप्रकार आहे. यात भरपूर ऊर्जा लागते. कुठलेही छुपे हेतू नसल्यानं माणसं एकत्रित येण्याचा हा सोपा मार्ग आहे, ज्यामुळे संवादही शक्य होतो. पुण्यातील सरहदचे सोबती संजीव शहा यांनी पुढाकार घेऊन दीडशे जणांची फळी तयार केली. पुणे, मुंबई, दिल्ली, देशातील इतर अनेक ठिकाणांहून काही सोबती बरोबर घेतले. या उपक्र मात स्वानंद अ‍ॅडव्हेंचर्स, रनबडी आणि कारगिलमधील काही संस्थाही सहभागी झाल्या होत्या.सुरुवातीला आमच्याही मनात शंका होती की लोकांचा प्रतिसाद कसा असेल, पण हळूहळू कारगिलवासीयांतला उत्साह वाढू लागला. युद्ध, घोषणा आणि भाषणबाजीच्या पलीकडे नेणारा, त्यांना त्यांचा वाटणारा, सहभागी होता येणारा कार्यक्र म त्यांना हवा होता. तिथल्या हॉटेलवाल्यांनीही अगदी उत्साहाने कारगिलबाहेरून आलेल्यांसाठी राहण्याची सोय केली. काश्मिरीयत-सुफी/बुद्धिजम आणि एकूण मानवतावादाचं दर्शन दिलं.आमच्यासोबत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे होते. एक केंद्रीय मंत्री असा कारगिलवासी पर्यायाने काश्मीरवासीयांशी थेट संवाद साधायला त्यांच्यात मिसळतोय अशी ही पहिलीच घटना होती. त्याचा प्रतिसाद जनतेतून उमटत होता. आॅलिम्पिकमधील राम यादव, संजय चिकार, याशिवाय कारगिल युद्धात लढलेले डी. पी. सिंग हेही या मॅरेथॉनमध्ये धावले. सिंग यांना तर कारगिल युद्धाच्या वेळी मृत घोषित करण्यात आलं होतं. पण काही दिवसांनी कळलं, या युद्धात त्यांनी पराक्रमही गाजवला आणि ते जिवंतही आहेत! त्यामुळे सिंग दरवर्षी त्यांचा ‘स्मृतिदिन’ साजरा करायला कारगिलला जातात. यंदा ते ‘रन फॉर पीस’ मध्ये आमच्यासोबत धावले.या मॅरेथॉनमध्ये २० ते २५ टक्के मुलीही सहभागी होत्या. आपल्या मनात काश्मिरी मुस्लीम मुली म्हणजे अतिशय परंपरावादी असतील अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. पण या मुली अत्यंत आनंदाने यात सहभागी झाल्या होत्या. मॅरेथॉनच्या दिवशी प्रत्यक्षात १२ वर्षांच्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेक जण रस्त्यावर धावले. त्यांच्याशी बोलताना जाणवत होतं, त्यांना संवाद हवाय. कारगिलमध्ये साधारण लाख- सव्वा लाख नागरिक आहेत. मात्र त्यांच्याशी संवाद साधायला, त्यांचं म्हणणं समजून घ्यायला कोणीही जात नाही. त्यांच्या मनात अढी आहे की, आम्हाला समान वागणूक दिली जात नाही. सर्वांसोबत सामावून घेतलं जात नाही. काही स्थानिक लोक सांगत होते, ‘पोलीस भरती, लष्कर भरती’त आम्हाला घेतले जात नाही. आमच्या देशभक्तीविषयी शंका का? उलट इथल्या लष्करांना तर आम्ही सर्वाधिक मदत करतो. त्यांच्या हाकेला प्रतिसाद देतो. तरीही आम्हाला संधी दिली जात नाही. राज्य संरक्षणमंत्र्यांना ते गळ घालत होते, ‘आम्हाला लष्करात घ्या, शत्रूविरुद्ध लढण्याची संधी द्या’. आपली सगळी खदखद हे तरुण व्यक्त करीत होते. तरुण दगडफेक करतात असं म्हणणाºयांनी इथली ऊर्जा पाहायला हवी होती. त्यांच्या हातात चांगलं काही नसेल तर ते दगड घेणारच. पण खरंतर दगड घेणाºयांची संख्या खूप तुरळक आहे. त्यांना संवादी कार्यक्र म दिल्यास नक्कीच चांगला बदल होईल. नकारात्मक शक्तींना वेगळं पाडण्याचा प्रयत्न करण्याकरिता इथल्या नागरिकांसाठी अशा कृतिशील कार्यक्र मांची गरज आहे. या गोष्टींचा लष्करालाही फायदाच होणार हे लष्कराच्याही लक्षात आले आहे.नागरिक जर भारतीय लष्करासोबत उभे नसले तर त्याचा फायदा अतिरेक्यांना होतो. तरुणांना हा देश आपला वाटावा अशा उपक्रमांची येथे गरज आहे.इथल्या नागरिकांना संवाद हवाय, लोकांची सोबत, साथ हवीय. रोजगार हवाय. ते इथं निर्माण होऊ शकतं आणि स्थानिकांच्या हातांना काम मिळू शकतं ही शक्यता या कार्यक्र माने करून दाखवली आहे.पुढच्या वर्षीची तयारीही आत्तापासूनच सुरू झाली आहे. संवादाची, समजून घेण्याची आणि बदलाची प्रक्रिया एका दिवसाची नाही.. ती सतत होणं आवश्यक आहे. स्थानिक कारगिलवासीयांना शांततापूर्ण जगण्याची आस आहे, तर त्यांच्या गोळीबाराच्या आवाजातून ही उसंत काढून देणं आम्हाला आमची गरज वाटतेय..

(लेखक ‘सरहद’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.) शब्दांकन- हिनाकौसर खान-पिंजार