शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

ओळख भारतरत्नांची - पं. जवाहरलाल नेहरू

By admin | Updated: July 26, 2014 13:00 IST

स्वातंत्र्य लढय़ातील एक सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या जडण-घडणीवर सुमारे चार दशके मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता.

पं. जवाहरलाल नेहरू
(भारतरत्न पुरस्कार सन १९५५)
 
स्वातंत्र्य लढय़ातील एक सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या जडण-घडणीवर सुमारे चार दशके मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता.
त्यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण उत्तर भारतीय शाळेत झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमधून बॅरिस्टर ही पदवी संपादन करून, भारतात येऊन त्यांनी वकिली व्यवसायास सुरुवात केली. पं. नेहरू यांनी या असहकार चळवळीत उडी घेतली. १९२९ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जवळपास ३0 वर्षे त्यांचा स्वातंत्र्य लढय़ात सहभाग होता. १९४५ मध्ये सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवरील खटला पं. नेहरूंनी चालविला होता.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय, आरोग्य अशा सर्व क्षेत्रात नवनव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसांची नेमणूक केली. शेती, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे या क्षेत्रातील अनेक योजना त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्याचबरोबर विद्युत केंद्रे, पोलाद कारखाने, मोठी धरणे, महामार्ग यांची उभारणी केली. सोविएत रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. १९६१मध्ये ‘युनो’च्या आमसभेत त्यांनी भाषण केले. पं. नेहरूंनी पंचशील तत्त्वांचा अंगीकार केला आणि त्याचा प्रचार संपूर्ण जगात केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारताला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली.
पं. नेहरू साहित्यप्रेमी होते. वाचनाइतकेच त्यांचे लेखनावरही प्रेम होते. भारताचा शोध, आत्मकथा, जागतिक इतिहासाचे दर्शन असे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या कन्येला म्हणजे, इंदिराला तुरुंगातून लिहिलेली पत्रे पुढे ‘लेटर्स फ्रॉम अ फादर टू डॉटर’ म्हणून प्रसिद्ध झाली. लहान मुले ही राष्ट्राची अनमोल देणगी असते, असे त्यांचे मत होते. मुलांच्या मेळाव्यात ते आनंदाने रंगून जात. मुलांचे ‘चाचा नेहरू’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लोभस पैलू होता. पं. नेहरूंचा जन्मदिन १४ नोव्हेंबर ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.
- सुबोध मुतालिक
(लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे 
कार्यकारिणी सदस्य आहेत.)