शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

ओळख भारतरत्नांची - पं. जवाहरलाल नेहरू

By admin | Updated: July 26, 2014 13:00 IST

स्वातंत्र्य लढय़ातील एक सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या जडण-घडणीवर सुमारे चार दशके मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता.

पं. जवाहरलाल नेहरू
(भारतरत्न पुरस्कार सन १९५५)
 
स्वातंत्र्य लढय़ातील एक सेनानी, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रभावी नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पं. जवाहरलाल नेहरू यांचा भारताच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या जडण-घडणीवर सुमारे चार दशके मोठय़ा प्रमाणावर प्रभाव होता.
त्यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ रोजी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण उत्तर भारतीय शाळेत झाले. त्यानंतर ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. इंग्लंडमधून बॅरिस्टर ही पदवी संपादन करून, भारतात येऊन त्यांनी वकिली व्यवसायास सुरुवात केली. पं. नेहरू यांनी या असहकार चळवळीत उडी घेतली. १९२९ मध्ये ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. जवळपास ३0 वर्षे त्यांचा स्वातंत्र्य लढय़ात सहभाग होता. १९४५ मध्ये सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवरील खटला पं. नेहरूंनी चालविला होता.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि पं. नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय, आरोग्य अशा सर्व क्षेत्रात नवनव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसांची नेमणूक केली. शेती, उद्योग, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे या क्षेत्रातील अनेक योजना त्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. त्याचबरोबर विद्युत केंद्रे, पोलाद कारखाने, मोठी धरणे, महामार्ग यांची उभारणी केली. सोविएत रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. १९६१मध्ये ‘युनो’च्या आमसभेत त्यांनी भाषण केले. पं. नेहरूंनी पंचशील तत्त्वांचा अंगीकार केला आणि त्याचा प्रचार संपूर्ण जगात केला. त्यांनी आपल्या कारकिर्दीत भारताला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली.
पं. नेहरू साहित्यप्रेमी होते. वाचनाइतकेच त्यांचे लेखनावरही प्रेम होते. भारताचा शोध, आत्मकथा, जागतिक इतिहासाचे दर्शन असे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या कन्येला म्हणजे, इंदिराला तुरुंगातून लिहिलेली पत्रे पुढे ‘लेटर्स फ्रॉम अ फादर टू डॉटर’ म्हणून प्रसिद्ध झाली. लहान मुले ही राष्ट्राची अनमोल देणगी असते, असे त्यांचे मत होते. मुलांच्या मेळाव्यात ते आनंदाने रंगून जात. मुलांचे ‘चाचा नेहरू’ हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लोभस पैलू होता. पं. नेहरूंचा जन्मदिन १४ नोव्हेंबर ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो.
- सुबोध मुतालिक
(लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे 
कार्यकारिणी सदस्य आहेत.)