शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खरे आव्हान वेगळेच

By admin | Updated: December 27, 2014 19:05 IST

जग म्हटले, की चांगले आणि वाईट या दोन बाजू असायच्याच. या सार्‍यात आपण नक्की काय आणि कसा विचार करतो, हेच शेवटी महत्त्वाचे. त्या सकारात्मकतेच्या दिशेने जाण्याची सुरुवात यानिमित्ताने व्हावी.

 भीष्मराज बाम

 
जग म्हटले, की चांगले आणि वाईट या दोन बाजू असायच्याच. या सार्‍यात आपण नक्की काय आणि कसा विचार करतो, हेच शेवटी महत्त्वाचे. त्या सकारात्मकतेच्या दिशेने जाण्याची सुरुवात यानिमित्ताने व्हावी.
--------------------
सारे धर्म शांततेचा घोष करतात; पण त्यांचे अनुयायी इतकी अशांतता माजवतात त्याचे कारण काय आहे?
जगात चांगले आणि वाईट असे दोन्ही प्रकारचे लोक असतात. त्यामध्ये जे चांगले असतील, त्यांचे राज्य असावे आणि वाईट लोकांना इतरांना त्रास द्यायची संधी मिळू नये, असेच बहुसंख्य माणसांना वाटत असते. चांगले विचार समाजात रुळावेत आणि वाईट विचारांचे दमन व्हावे, यासाठी धर्मसंकल्पना निर्माण झाली आणि चांगली माणसे समाजाचे नियंत्रण करीत राहावीत, यासाठी राजसत्ता निर्माण झाली. आता चांगले आणि वाईट हे ठरवायचे कोणी? याबद्दल प्रत्येकाचे मत हे वेगळे असू शकते. मग ज्याचे बळ जास्त असेल तो आपले मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न करायला लागला. राजसत्ता बलवान होतीच; पण धर्म कोणता स्वीकारायचा तेही राजसत्तेनेच ठरविण्याचा आग्रह धरला आणि या हट्टासाठी सर्वसामान्यांवर इतिहासात अनन्वित अत्याचार झाले आहेत व अजूनही होत आहेत.
राजसत्तेने धर्माच्या नावावर अत्याचार करू नयेत, यासाठी निधर्मी राज्याची संकल्पना निघाली. ईश्‍वराशी तुमचे संबंध कसे असावेत ते तुम्ही ठरवावे आणि इतर लोकांशी तुम्ही कसे वागायचे ते राजसत्ता ठरवील. पण, पहिल्या दोन संकल्पनांप्रमाणेच ही संकल्पनाही प्रत्यक्ष व्यवहारात कधी उतरू शकलेली नाही. लोकशाहीची संकल्पनासुद्धा आपण फोल ठरवून दाखविली आहे. लोकांची मते मिळवून एकदा सत्ता मिळविली, की पुढल्या निवडणुकांपर्यंत लोकांची पर्वा करण्याचे कारण नाही असाच सर्व राजकारण्यांचा दृष्टिकोन असतो. सत्य, अहिंसा आणि शांती यांचा उद्घोष करीत तथाकथित धार्मिक लोकांनी उच्छाद मांडलेला असतो आणि सर्वसामान्य जनता ते सहन करीत राहते. स्वार्थ हा मानवी स्वभावाचा पाया आहे. जराही संधी मिळाली, की तो डोके वर काढून सगळेच काबीज करायला पाहतो. खर्‍या धार्मिक माणसाने असे कधीच होऊ द्यायचे नसते. आपल्या विश्‍वात योग्य ती व्यवस्था निर्माण करण्याची जबाबदारी संपूर्णपणे आपली आहे. तसे जर झाले नाही, तर त्यासाठी इतरांना दोष देण्यात अर्थ नसतो. आपली धर्मतत्त्वांवर श्रद्धा असेल, तर आपण ती पाळायचीच आणि शक्य तितकी इतरांनाही पाळायला लावायची; पण त्यात जोर जबरदस्ती असता कामा नये. महात्मा गांधींचे सत्याग्रहाचे तत्त्व हेच होते. अगदी शत्रूचेसुद्धा मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करायचा; पण ते जमले नाही, तर त्याला त्रास देण्याऐवजी आत्मक्लेशाचा मार्ग पत्करायचा. आता हाच मार्ग सर्वांना पटायला हवा असे नाही; पण काहीही झाले तरी हिंसेचा मार्ग चोखाळायचा नाही, हे तरी सर्वांनी मान्य करायला हवे. दुसर्‍या महायुद्धानंतर युनायटेड नेशन्स ही संकल्पना या प्रयत्नातूनच जन्माला आली; पण त्या प्रयत्नालाही फारसे यश येताना दिसत नाही.
धर्म आणि अध्यात्म यांतला फरक ओळखायला हवा. धर्म हा सर्वांनी पाळण्यावर अवलंबून असतो. काहींनी पाळला आणि इतरांनी नाही, तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणूनच एका संताने म्हटले आहे, की ‘मजहब मरेंगे, दिन रहेगा.’ म्हणजे सारे धर्म नाहीसे होतील; पण अध्यात्म मात्र शिल्लक राहील. इतरांची वागणूक सुधारेल तेव्हा सुधारो, मी स्वत:वर ताबा ठेवीन असा प्रयत्न करीत राहिले तरी पुष्कळ साधता येईल.
इतका अत्याचार का होत आहे, हा प्रश्न मनात उभा राहतो, ही फारच चांगली गोष्ट आहे. पण, हे सुधारण्यासाठी मी काय करायला हवे आहे, ते मी करतो आहे की नाही, याचा विचार करण्याइतकी जागरूकता आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवी. आपली पिढी आणि पुढली पिढी यांच्यावर आपण आपल्या वागण्या-बोलण्याने संस्कार करीत असतो. त्यांच्या दृष्टिकोनावर थोडाफार तरी परिणाम होत असतो. तो संस्कार चांगला व्हावा, हे पाहण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. ती व्यवस्थित पार पाडायला हवी.
परमतसहिष्णुता हाच या समस्येवर उपाय आहे. आपलेच मत बरोबर आणि दुसर्‍याचे ते चुकीचे, हा भाव पोरकटपणाचा आहे. तो विचारवंतांनी आधी टाकून द्यायला हवा म्हणजे मग सामान्य माणसांचीही तीच धारणा होईल. आपले मत इतरांवर लादण्याच्या प्रयत्नामुळेच इतकी अशांतता माजली आहे. यासाठीच अध्यात्माची गरज आहे. अध्यात्म आपल्याला स्वत:वर नियंत्रण राखायला शिकवते. हे नियंत्रण साध्य झाले, की इतरांशी संबंध आपोआपच चांगले राहायला लागतात. आयुष्याला अध्यात्माच्या विचारांचा पक्का पाया असला, तरच मानवजात प्रगती करू शकेल अन्यथा नाही. आपल्या भारताच्या संविधानात सर्व धर्मीयांना सारखेच अधिकार दिले गेले आहेत ते याचसाठी. निदान आपल्या देशात तरी असहिष्णुता नाहीशी करण्याचे प्रयत्न होत राहायला हवेत, असे वाटते. मला वाटते, की जगात सार्‍याच माणसांनी एकाच विचाराचे आणि मताचे असावे, असे साक्षात ईश्‍वरालासुद्धा मान्य नसावे, नाही तर त्याने आपल्या मेंदूमध्येच तशी योजना करून टाकली असती. निरनिराळे विचार आणि मते पचवून प्रगती साधणे, हेच तर मानवजातीपुढील खरे आव्हान आहे. त्याला यशस्वीपणे तोंड दिले तरच भविष्य आहे, नाही तर सर्वनाशच पुढे दिसतो आहे. 
गेले वर्षभर हे सदर लिहिले, याचा मला खूपच फायदा झाला. आपल्याला हवे असेल ते आपण लिखाणामधून मांडतोच; पण ते स्वगत भाषणासारखे असते. प्रश्नोत्तरांमधून जो संवाद साधला जातो, तो अधिक महत्त्वाचा. कारण त्यातून अभ्यासासाठी आणि चिंतनासाठी नवे मुद्दे मिळत जातात. त्यामुळे त्यातून लेखक आणि वाचक या दोघांनाही विचारांच्या प्रगल्भतेकडे जाणे शक्य होते.  
नव्या वर्षांसाठी सर्वांना मनापासून शुभेच्छा..!!!
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)