शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
2
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
3
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
4
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
5
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
6
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
7
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
8
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
9
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
10
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
12
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या
13
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
14
BCCIचे अध्यक्ष बदलताच आगरकरच्या निवड समितीत मोठा बदल, दोन स्टार क्रिकेटर बनले 'सिलेक्टर्स'
15
"संघाने आता नथुराम आणि मनुस्मृतीला तिलांजली देऊन गांधी विचार आणि संविधान स्वीकारावे’’, काँग्रेसने दिला सल्ला  
16
भारतावर राज्य करण्याचं स्वप्न, ५० लाख हल्लेखोरांची फौज, शेजारील देशात आखला जातोय भयानक कट 
17
“मातोश्रीवर हल्ल्याचा आणि राज ठाकरेंना मारायचा कट होता”; प्रदीप शर्मांनी सांगितला 'एन्काउंटर'चा थरार
18
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
19
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त

जट्रोफा  आणि विनायकराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 07:00 IST

विनायकराव पाटील यांचे जट्रोफाच्या शेतीचे अनुभव गेले दोन रविवार ‘मंथन’मध्ये वाचले आणि एक तळमळीचा, दूरदृष्टीचा, ‘हाडा’चा शेतकरी किती दूरवर पाहू शकतो, हे जाणवून विनायकरावांच्या हिमतीचे विशेष वाटले.

-

विनायकराव पाटील यांचे जट्रोफाच्या शेतीचे अनुभव गेले दोन रविवार  ‘मंथन’मध्ये वाचले आणि एक तळमळीचा, दूरदृष्टीचा, ‘हाडा’चा शेतकरी किती दूरवर पाहू शकतो, हे जाणवून विनायकरावांच्या हिमतीचे विशेष वाटले. असे प्रयोग करण्याला अनुकूल वातावरण नसताना त्यांनी ही यातायात केली होती. आता परिस्थिती फार नसली, तरी थोडी बदलते आहे, असे म्हणावयास वाव आहे.

मुळातच आपल्या सरकारांची वृत्ती जुन्या चाकोरीतून गाडा (कसा का असेना) चालता ठेवण्याकडे असते. त्यात सामाजिक स्तरावरही वातावरण प्रयोगानुकूल नाही. कारण यशाचा उदंड गौरव आणि अपयशाची नुसती भीतीच नाही, तर जणू सामाजिक लांच्छनच! तेव्हा इतरांवेगळे करायला कोणी गेले, की त्याची फार ऊर्जा आधी विरोधी वातावरणात स्वत:ची ऊर्मी जिवंत टिकवून धरण्यातच खर्ची पडते. त्यात शेतीत प्रयोग म्हणजे आणखीच अवघड.

- अशा पार्श्वभूमीवर विनायकरावांनी केलेली धडपड वाचताना खरेच विशेष वाटले.

जट्रोफापासून केलेल्या इंधनावर विमान उड्डाणाची चाचणी यशस्वी झाल्याच्या बातम्या आल्यावर आता पुन्हा एकवार या पिकाकडे शेतकर्‍यांचे लक्ष जाईल असे दिसते.एकूणच इंधन दरांचा भडका उडाल्यावर तरी काही पर्यायी व्यवस्थेचा विचार आपल्या देशात गांभीर्याने सुरू होईल, अशी आशा धरायला जागा दिसते.

शेतीमधली प्रयोगशीलताही आता अन्य पर्याय संपल्याने का असेना, आपल्याकडे मूळ धरू लागली आहे, हेही तसे चांगलेच चिन्ह! मात्र इंधनानुकूल पिकांच्या संबंधात मोठय़ा प्रमाणावर प्रबोधन आणि त्याही आधी माहितीचा पुरेसा प्रसार होणे मला गरजेचे वाटते. सरकारी कृषी खात्यांनीही याबाबतीत ‘एक खिडकी योजना’ सुरू करून तसेच हेल्पलाईन चालवून शेतक-याच्या जिज्ञासेला योग्यवेळी खतपाणी घालण्याची व्यवस्था उभारली पाहिजे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे या दिशेने प्रयत्न चाललेले दिसतात. त्या प्रयत्नांना स्थानिक स्तरावर योग्य ती जोड मिळणे आवश्यक आहे.

- आणि मुख्य म्हणजे त्या प्रयत्नांमध्ये विनायकराव पाटलांसारख्या मातीत पाय आणि हातही असलेल्या प्रयोगशील ज्येष्ठ व्यक्तींनाही सामावून घेतले पाहिजे.

- राजशेखर हिरे, भंडारा 

वाचकांचे विचार, प्रतिक्रिया, वाद आणि प्रतिवादांसाठी : manthan@lokmat.com