शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वचनपूर्ती

By admin | Updated: May 31, 2014 16:24 IST

क्रिकेटविश्‍वात माधव मंत्री यांचा सर्वदूर जिव्हाळ्याचा, प्रेमाचा संपर्क होता. त्यामुळेच त्यांच्या निधनाने सारेच हळहळले. त्यांची कडवी शिस्त आणि खेळातील शास्त्रशुद्धताही लक्षणीय होती. त्यापलीकडे एक माणूस म्हणून ते अतिशय चांगले होते. त्यांच्या चाहत्यांनी वाहिलेली शब्दांजली.

 संजय कर्‍हाडे

माधवराव मंत्रींना फलंदाजी करताना किंवा यष्टीरक्षण करताना मी पाहिलेलं नाही. मात्र, त्यांच्याकडून अमूल्य असं मार्गदर्शन मात्र मला वेळोवेळी मिळालेलं आहे. ‘क्रिकेटचे सामने पाहून, खेळाडूंचं निरीक्षण करून, ऐंशी यार्डावरून त्यांची मनं जोखून जो सामन्याचे अवलोकन करू शकतो, तो खरा पत्रकार,’ असं माधवराव नेहमी म्हणायचे. माधवराव हजर असोत किंवा नसोत, वानखेडे स्टेडियममध्ये समिती कक्षातील पहिल्या रांगेतील डावीकडच्या पहिल्या खुर्चीवर कुणी कधी बसलं नाही. हा त्यांचा दरारा नव्हता. त्यांच्याबद्दलचा आदर होता. दिलखुलास हसणारे, दातांची कवळी जिभेने रेटत पाठीवर थापा मारणारे माधवराव एखाद्या दिवशी भेटले नाहीत, तर चुकल्या-चुकल्यासारखं वाटायचं. खेळाडूच्या कामगिरीचे कौतुक करण्याची माधवरावांची विशिष्ट पद्धत होती. दोन्ही ओठ मुडपून आपल्या उजव्या हाताची चार बोटं डाव्या तळव्यावर ते घाईघाईने आणि जोरजोरात वाजवत असत. पु. लं.च्याच भाषेत सांगायचं, तर माधवरावांची दाद अशी काही आगळी होती, की तिला जवाब नव्हता! भारतीय क्रिकेटचे एक जाणकार आणि बुजुर्ग म्हणून त्यांची ख्याती होती. विलक्षण स्मरणशक्ती, चकित करून सोडणारी निरीक्षण शक्ती आणि पदरी असलेली अफाट माहिती त्यांच्याकडे होती. एखाद्या बुजुर्ग क्रिकेटपटूचं निधन झाल्यानंतर त्याच्यावर मृत्युलेख लिहिण्याचीही गळ मी त्यांना घातलेली आहे. त्यांचं लिखाण एकटाकी असे. माधवरावांची शब्दांवर हुकमत होती.
आज मला वीस-एक वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवतोय. त्या दिवशीसुद्धा मला त्यांच्याकडून एका क्रिकेटपटूवर मृत्युलेख लिहून हवा होता. ते म्हणाले होते, ‘‘हो, प्रो. देवधर गेल्याचं कळलं मला; पण संध्याकाळी लेख घेण्यासाठी कुणाला पाठवू नकोस, तूच ये.’’ माझ्या हातात माधवरावांनी लेख ठेवला व माझ्या पाठीवर थोपटत ते म्हणाले, ‘‘काय रे, बहुतेक सर्व क्रिकेटपटूंचे मृत्युलेख मी लिहितो. माझ्या मृत्यूनंतर कुणी लिहील का रे लेख?’’ त्यांच्या प्रश्नावर मी तत्क्षणी आणि जोरात हसलो. मला वाटलं, माधवराव विनोद करीत होते; पण त्यांचा प्रश्न गंभीर होता. मी वरमलो, शरमलो. त्यांच्या घरातून खालमानेने बाहेर पडत असताना मला ते म्हणाले होते, ‘‘माझ्यावरील मृत्युलेख तू लिहिशील, असं मला वचन दे.’’ अधूनमधून माधवरावांची भेट झाली, की ते हमखास विचारत, ‘‘काय रे वचनपूर्ती करणार ना?’’ आणि प्रत्येक वेळी आम्ही दोघंही दिलखुलासपणे हसत असू. जणू वचनपूर्ती करण्याची वेळ कधी येणारच नव्हती.. 
(लेखक ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आहेत.)