शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नाटकवाल्यांच्या कविता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 06:00 IST

राजीव नाईक, रवींद्र लाखे आणि माया पंडित हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी  लिहिलेल्या या कविता आहेत.  त्यात एकटेपण, तुटलेपण जसे आहे, तसे  विस्कटलेपण आणि गवसलेपणही आहे.  मराठी काव्य परंपरेला जोडणार्‍या आणि  नवतेचा शोध घेणार्‍या या कविता आहेत.

ठळक मुद्देया कविता नाट्यपूर्ण आणि नादमय आहेत. या नाट्यमयता असलेल्या कवितांमध्ये काही स्वगतं आहेत, काही संवाद आहेत, विराम आहेत, विविध पात्न आहेत तर काहीवेळा विधानंही आहेत. काही कविता या चक्क नाट्यप्रवेशासारख्या आहेत तर काही नाट्यछटेसारख्यासुद्धा !

- अतुल पेठे

नाटककार राजीव नाईक, नाट्यदिग्दर्शक रवींद्र लाखे आणि लेखिका, अनुवादक तसेच अभिनेत्नी माया पंडित या तिघांच्या कवितांचे स्वतंत्न संग्रह मागील वर्षात आलेले आहेत. त्यांच्या  कविताबिविता, संपर्क क्षेत्नाच्या बाहेर,  अवस्थांतराच्या कविता आणि तल्खली या चारही काव्यसंग्रहांकडे मी समीक्षक या नात्याने पहात नाही हे प्रथम स्पष्ट करतो. तर या तीनही कवींच्या कविता मला कशा आणि का भावल्या ते सांगायचा प्रयत्न करणार आहे. हे तीनही कवी अस्सल नाटकवाले आहेत. 1990च्या पिढीतल्या नाटकवाल्या लोकांनी लिहिलेल्या या कविता आहेत. त्यात जसे एकटेपण, तुटलेपण आणि विस्कटलेपण आहे तसेच गवसलेपणही आहे. या तिघांच्याही कविता मराठी काव्य परंपरेला जोडणार्‍या आणि नवतेचा शोध घेणार्‍या आहेत. हे कवी ज्या विस्कळीत आणि अघटित काळाचे प्रतिनिधी आहेत, ते त्या काळाचे दर्शन मोठय़ा जबाबदारीने आणि ताकदीने त्यांच्या त्यांच्या कवितांतून घडवताना इथे दिसत आहेत. त्यांच्या या कविता नाट्यपूर्ण आणि नादमय आहेत. या नाट्यमयता असलेल्या कवितांमध्ये काही स्वगतं आहेत, काही संवाद आहेत, विराम आहेत, विविध पात्न आहेत तर काहीवेळा विधानंही आहेत. काही कविता या चक्क नाट्यप्रवेशासारख्या आहेत तर काही नाट्यछटेसारख्यासुद्धा ! आता हे तीनही कवी नाटकवाले असल्याने त्यांच्या कवितांवर नाट्यमयता साधण्याचा परिणाम झालेला आढळतो.राक्षस, पर्‍या, देव आणि भुतंखेतं एकाच पंक्तीला जेवायला बसलेली आणि माझ्या हातांत वाढायची भांडी. नव्हत्याचं होतं झालेलं थोडं अप्रूप वाटलेलं (कविताबिविता - राजीव नाईक)

गाढवं ओझं वाहताना   पाहिली आहेस कधी?पाठीवर ओझं पडलं की   चालायला लागतात.. हा त्यांचा गुण   अवगुण ठरवला गेला.. तो कोणी ठरवला तर   माणसांनी. (संपर्क क्षेत्नाच्या बाहेर - रवींद्र लाखे)

आगीनंतर काय होतं? जळलेल्याचं जातं !खाकपण हेच उरतं नसलेल्यांशी नातं.चटका बसलेले हात, धगीत पोळलेली पातवणवलेल्या जंगलावर धुराचे फिरावे हाततसे तुम्ही विचारता, काय बिघडलं आतल्याआत?(तल्खली - माया पंडित)

तसेच राजीव नाईक आणि रवींद्र लाखे यांच्या काही कवितांमध्ये नाटकाची भाषाही आढळते. उदाहरणार्थ -

पहिल्या बॅटनपासून शेवटच्या बॅटनपर्यंतस्पॉट्सची संख्या कशी कमी कमी होत गेलेलीत्यात, पुढे पुढे करणार्‍यालाफुट्स, एफओएचचा भरणा जाऊदे, मागेच बरं प्लॅटफॉर्मचा सहारा आणि कट -लाइट्सची साथ.(कविताबिविता - राजीव नाईक)

अल्झायमर झाल्यावरलेखकाने लिहिली एक संहिता.तरुण रंगकर्मी वाचताहेत ती.भंबेरी उडते आहे वाचताना.दिग्दर्शक नट नेपथ्यकार प्रकाशयोजनाकारयांना कळत नाहीयेकुठले भान ठेवावे जागरूक स्वत:चे की लेखकाचे?(अवस्थांतराच्या कविता - रवींद्र लाखे)

आता हे तीनही संग्रह ज्या क्र माने वाचले त्या क्र माने मी आता त्यांच्यावर लिहीत आहे. प्रथम राजीव नाईक यांच्या कविताबिविता या काव्यसंग्रहाविषयी बोलू. आता कविताबिविता हा शब्द वाचताच मनात येतं की बिविता ही भानगड काय? कविता आपल्याला माहीत असतात; पण बिविता कुठे असतात? तर हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर लक्षात येतं की, कविता आपण वाचतो आणि बिविता आपल्या मनात उमटतात.करताकरविता  करवतो कवितासृष्टीच्या  समष्टीच्या  संचिताच्या.होय - नाही म्हणताहोऊन जातात बिवितात्याच्या  तिच्या  त्यांच्या.(गंमत म्हणजे संपर्कक्षेत्नाच्या बाहेर या रवींद्र लाखेंच्याकाव्यसंग्रहात बिविता याच नावाने कविता आहे.) या  बिवितांमुळे वाचकाला त्याचा स्वत:चा अवकाश मिळतो. नाटक पाहताना प्रेक्षकाने एकरूप होण्यापेक्षा अलिप्त होऊन पहाणे म्हणजे शहाणे होणे, हे जसे मानले जाते तसेच इथे कवितांबाबत होते.आयुष्याचा अवधी एका विचाराएवढाच असतो  खरं तर खोटं तर अशा अनेक क्षणांचं मिळून होतं आयुष्यचांगल्या नाटकाचा आणखी एक गुण म्हणजे जगण्यातील क्षणिक अद्भुततेला ते नाटक स्पर्श करते. हा गुण राजीव नाईक यांच्या कवितेत ठायी ठायी आढळतो. ही अद्भुतता जगण्यातले नवे प्रांत दाखवते. त्यातूनच आयुष्य विस्तारते. वाचक विचार करू लागतो. या संवादात भाषा महत्त्वाचा घटक आहे. मराठी नाटक करताना मराठी नाटकातील भाषा नादमय वजनाने बोलणे आपण कायमच महत्त्वाचे मानत आलो आहोत. राजीव नाईकांच्या कवितेमध्ये हे नादमय भाषेचे भान दिसते. कविताबिविता - मौज प्रकाशन / संपर्क क्षेत्नाच्या बाहेर आणि अवस्थांतराच्या कविता - कॉपर कॉइन प्रकाशन / तल्खली - शब्द प्रकाशन

atulpethe50@gmail.com(लेखक प्रयोगशील रंगकर्मी आहेत.)

(उत्तरार्ध पुढच्या अंकात)