शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

ओम टी आयवा मारू

By admin | Updated: May 23, 2015 16:48 IST

मराठी साहित्यविश्वात ‘एम. टी.आयवा मारू’चं आगमन झालं ते वर्ष होतं 1989

- मकरंद जोशी

- पुस्तकाचं पान

मोकाट सागरावरून ओसाड किना:यावर भणभणत येणा:या समुद्रवा:याप्रमाणो मराठी साहित्यविश्वात ‘एम. टी.आयवा मारू’चं आगमन झालं ते वर्ष होतं 1989. मराठी साहित्यासाठी त्या कादंबरीचं नाव जेवढं अनवट होतं, तेवढीच त्या कादंबरीची बिनठशाची भाषा, बिनधास्त निवेदन आणि पूर्णपणो अनोळखी अनुभवविश्व. पंचवीस वर्षापूर्वी ते सगळंच एवढं धक्कादायक होतं की, असंख्य बिनधास्त रसिकांनी ती कादंबरी अक्षरश: डोक्यावर घेतली. ‘एम.टी.आयवा मारू’वर कौतुकाची-पुरस्कारांची उधळण केली. दशकातल्या उत्कृष्ट कादंब:यांत तिची निवड झाली. नावासकट तिच्या शैलीची नक्कल करण्याचा प्रयत्न नवी पिढी करू लागली. पण त्या भणभणत्या समुद्रवा:याच्या धक्क्याने जे भेलकांडले त्यांनी गेल्या पंचवीस वर्षात आयवा मारूला अनुल्लेखाने नाकारण्याचा सुरू केलेला प्रयत्न अजूनही सुरूच आहे; मात्र मराठीत प्रकाशित झाल्यानंतर तब्बल पंचवीस वर्षानी, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ‘पेंग्वीन प्रकाशन’ अ्र6ं टं14 इंग्रजीत प्रकाशित करत आहे. 

  इंग्रजीत सागरी विश्वावर भाष्य करणा:या शेकडो कादंब:या असताना आयवा मारूमध्ये पेंग्वीनला वेगळं असं काय सापडलं जे अजूनही इंग्रजी साहित्याला गवसलेलं नाही.
गाभ्रीचा पाऊस आणि वळूचे निर्माते प्रशांत पेठे.  शाळेत असताना जहाजावर जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी शिक्षकांनी त्यांना ‘एम. टी. आयवा मारू’ वाचायला दिली आणि ती वाचून त्यांचा जहाजावर जाण्याचा निर्णय पक्का झाला. आज डायनॅमिक पोङिाशनिंग ऑफिसर असलेल्या पेठेंनी ‘आयवा मारू’चे भाषांतर करून पाठवलेल्या पहिल्याच  खडर्य़ावर भाळून पेंग्वीनने ‘आयवा मारू’ स्वीकारली, तेव्हा  पेंग्वीनच्या निवड प्रमुखाला मेलव्हीलच्या ‘मोबी डीक’ची आठवण झाली होती. प्रत्येक संभाषणात  पेंग्वीनच्या प्रत्येक एडिटरने ‘आयवा मारू’ची तोंड भरून स्तुती केली. 
- मराठीतलं हे जहाज इंग्रजी समुद्रात लोटायला पेंग्वीन अतिशय उत्सुक आहे, ते कशामुळे ?
दुर्दैवाने मराठी साहित्यविश्वाचा परिघच फार लहान आहे. मुंबई-नाशिकसारख्या शहरांतही जेमतेम अर्धा डझन विक्री केंद्रे, नाव घ्याव्यात अशा डझनभर प्रकाशन संस्था, डझनभर समीक्षक आणि अक्षरश: शेकडो पुरस्कार आहेत. हे पुरस्कार काही मोजके समीक्षक, प्रकाशन संस्था आणि काही ज्येष्ठ साहित्यिकांच्या वळचणीला बांधलेले. आजच्या मराठी कथा-कादंब:यांचं हे संकुचित, आपापला परिघ न ओलांडता परिघाचेच सोहळे करण्यास सरावलेलं रूप हे आजच्या समीक्षा-पुरस्कार-प्रकाशन संस्था आणि प्रसिद्धी माध्यमांच्या तपश्चर्येचं फलित आहे. 
इतिहासाशी, चारित्र्यपुरुषाशी, संत साहित्याशी, जातीय वादाशी संबंधित नसूनही, समीक्षेने गाजावाजा न करताही पंचवीस वर्षे अधिकाधिक वाचक लाभणा:या ‘आयवा मारू’चं रहस्य काय याचा विचार करताना ठळकपणो जाणवणारी पहिली गोष्ट म्हणजे या कादंबरीचा लेखक अनंत सामंत. मराठी अकरावी करून 1968 साली हॉटेल मॅनेजमेण्ट करायला गेला. ते संपवून हॉटेलात नोकरी करण्याऐवजी याने विश्वभ्रमंती साधण्यासाठी जहाजावर नोकरी धरली. त्यातली भरभराट सोडून मध्येच एक दिवस हा डोंगरमाथ्यावर हॉटेल काढण्यासाठी स्वदेशी परतला. सरकारी लाल फितीच्या गळफासात अडकला. आणि मग मनातला वणवा शमवण्यासाठी याने उरातला समुद्र कागदावर उतरवला. ऊर हलका झाल्यावर हस्तिलिखिताचा गठ्ठा कायमसाठी कपाटात टाकला. तो तीन-चार वर्षानी याच्या आतेभावाच्या हाती लागला. भावाने प्रकाशनाचा हट्ट धरला. तोच ते बाड घेऊन गेला. तीन-चार प्रकाशकांकडून ते साभार परत आल्यावर मॅजेस्टिकच्या हाती आलं. प्रसिद्ध झालं.
या निर्मितीचं वैशिष्टय़ हे की, या लेखकाने कधी विद्यापीठाचं तोंडही पाहिलं नव्हतं. त्याला साहित्याचा गंध नव्हता. समीक्षक-प्रकाशक, वगैरेंचं अस्तित्वही त्याला ठाऊक नव्हतं. प्रकाशित करणं सोडाच, कधी कोणाला हे हस्तलिखित दाखवण्याचीही इच्छा नसल्याने त्याला वाचकाचा विचार करण्याचीही गरज नव्हती. आपण लिहितोय ती कादंबरी आहे याचं भान असण्याएवढी जाण त्याला नव्हती. त्या निर्मितीवर, शैलीवर कोणाचाही कसलाही प्रभाव नव्हता. असलाच तर आभाळाचा, समुद्राचा, पोलादी जहाजाचा, आणि सागरी जीवनाचा प्रभाव होता. जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी परत एकदा त्या जीवनात शिरण्याशिवाय त्याला पर्याय उरला नाही; म्हणून त्याने स्वत:ला निवेदक म्हणून केंद्रस्थानी ठेवून स्वत:भोवती ओळखीच्या जगाच्या भ्रामक विश्वाचा कोष कथानकाच्या धाग्यांनी गुंडाळत इथल्या बरबटलेल्या जगापासून दडायला एक भ्रामक पसारा तयार केला. स्वत:चं वेगळं जग निर्माण केलं. तिचं नाव ‘एम.टी.आयवा मारू’.
‘आयवा मारू’ लिहिणारा अनंत सामंत समीक्षेच्याच नव्हे, तर जातिपातींच्या सापळ्याबाहेरील जगात जगल्यामुळे त्याने फक्त डोक्यात थैमान घालणा:या घटितांचाच विचार केला. तो फक्त कथाविषय कागदावर उतरवत गेला. विषयाने स्वत:च स्वत:ची भाषा, शैली, आकृतिबंध निवडला. त्यामुळे कादंबरीच्या वाचकांना सहसृजनाच्या क्षणी आकृतिबंध, शैली, भाषा वगैरेचे अडसर दूर करण्याचे प्रयास न करता थेट कथाविश्वात समरसतेने मिसळून जाणं सहज शक्य झालं. प्रत्येकाच्या जीवनाला असतो तसा नियतीचाच आकृतिबंध, सागरी शैली आणि खलाशाची भाषा जर स्वीकारता आली; तरच या कादंबरीची समीक्षा करणं शक्य आहे. मेलव्हीलची ‘मोबी डिक’, हेमिंग्वेचं ‘ओल्ड मॅन अॅण्ड द सी’ आणि अनंत सामंतांची ‘आयवा मारू’ यांच्यात असलेली ही साम्यस्थळं याआधीही अनेक जाणकारांनी अधोरेखित केली आहेत.
या तीनही कादंब:यांत रेखाटलेल्या व्यक्तिरेखा, निसर्ग आणि अन्य घटकांचा सामान्यजनांना सापडणारा संघर्ष हा मुळात संघर्षच नाहीये. ते सहजीवन आहे. मानवजगत म्हणजे एक अश्वत्थ. काही मुळं, काही पारंब्या, काही पानं, फुलं, फळं.. सारं अविभक्त, अखंड. त्यांचा कसा असेल एकमेकांत संघर्ष? या कादंबरीतील उज्‍जवला, जिचं परिवर्तन हाच या कादंबरीचा गाभा आहे असं काही जणांना वाटतं; ती या अश्वत्थाच्या रेखाटनातील एक सूक्ष्म घटक आहे. फळाच्या अवस्थेवरून ज्याप्रमाणो वृक्षाच्या मुळांच्या अवस्थेची जाणीव होते, त्याप्रमाणो ीच्या वर्तनावरनं आणि पोषाखावरनं तिची नैतिकता ठरत नाही; तर ती तिच्या भोवतालच्या एकगठ्ठा मानवी कळपाची नैतिकता, संस्कृती आणि सद्विवेकबुद्धी प्रदर्शित करते. उज्‍जवलासकट कादंबरीतील सर्व व्यक्तिरेखा सामावून घेत एक अखंड मानवी शरीर सामंतांनी निर्माण केलं आहे. हे लक्षात आल्यावर जाणवतो तो मानव आणि निसर्गाचा संघर्ष आणि मग जाणवतं की हेही सहजीवनच आहे. सूर्यगोलातून उडालेल्या एका ठिणगीचा सूर्याशी संघर्ष जेवढा अशक्य, तेवढाच मानव आणि निसर्गाचा संघर्ष अशक्य. मेलव्हीलच्या ‘मोबी डिक’मध्ये एकगठ्ठा मानवी कळप, एक जहाज, एक मासा, आणि निसर्ग यांचं संघर्षमय भासणारं सहजीवन आहे. हेमिंग्वेच्या ‘ओल्ड मॅन अॅण्ड द सी’मध्ये एक कोळी, एक होडकं, एक मासा आणि निसर्गाचा एका बालिश मनाला मोहवणारा संघर्ष आणि वृद्ध कोळ्याला मोहवणारं सहजीवन आहे.
सामंतांच्या ‘आयवा मारू’त जगाच्या कानाकोप:यांतून जमलेला एकगठ्ठा मानवी कळप, एक जहाज आणि निसर्ग यांचा संघर्ष भासावा असं सहजीवन आहे. - वेगळं म्हणजे मेलव्हील आणि हेमिंग्वेला भासलेली दृश्य माशाची गरज सामंतांना पडली नाही. सामंतांच्या कादंबरीत माशाची जागा स्वप्नांनी घेतलीय.
भारतीय अध्यात्मातील वैश्विक एकात्मता या कादंबरीत अस्पष्ट, धूसरच जाणवत असली तरी तीच या कादंबरीचा गाभा झाल्यामुळे ही भारतीय कादंबरी सागरी जीवनावरील कुठल्याही इंग्रजी कादंबरीपेक्षा नि:संशय वेगळी  ठरते. मराठीस पूर्णपणो अनोळखी असणारं अनुभवविश्व मराठीत रेखाटणा:या कादंबरीबाबत Gracia marquez च्या शब्दांचा आधार घेत लिहिता येईल, 'Anant Samant only responded to his way of life, the life of the Seaman-- who is solely Indian' 
 - मराठी ‘एम.टी.आयवा मारू’ इंग्रजीत जाण्याच्या निमित्ताने परत एकदा अनंत सामंतांसह अनेकांशी केलेल्या चर्चेतून जाणवलेलं हे काही नव्याने मांडावंसं वाटलं इतकंच !