शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष नकोच!

By admin | Updated: December 12, 2015 16:43 IST

आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते.

 
आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते. 
एकदा का मुलांचं शिक्षण पूर्ण झालं की आई-बाबांची हीच अपेक्षा मग हट्टामध्ये रुपांतरित होते आणि सतत नोकरीसाठी मुलांच्या मागे लागलं जातं. मुलं लवकर नोकरीला लागली नाही की मुलाचं संपूर्ण भविष्यच मग अंधारात दिसू लागतं. 
पण इकडे मुलांच्या मनात काहीतरी नवं उमलत असतं, त्यांना स्वत:साठी नवी पायवाट दिसत असते याचा अंदाजही त्यांच्या पालकांना नसतो. मग नोकरीचा लकडा, मुलं जे म्हणतात ते उडवून लावणं, सतत मुलांच्या मनात भीती पेरणं नाहीतर इतका पैसा तुमच्या शिक्षणावर खर्च केला तो वसूल तरी होणार का? - यासारखी अपेक्षांची तलवार मुलांच्या डोक्यावर ठेवली जाते.  
पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या इच्छा यांच्यात संघर्ष इथेच सुरू होतो. असे संघर्ष घरोघरी होत असतात. 
मुलांना नोकरी करायची नसते याचा अर्थ त्यांना काम करायचं नसतं, कमवायचं नसतं, आपल्या जबाबदा:या पूर्ण करायच्या नसतात असं नाही. 
खरंतर त्यांना नवं काही तरी करून बघायचं असतं. 
मनात उमललेल्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठीची जमवाजमव करण्यात मुलं गुंतलेली असतात. पण रिझल्ट ओरिएण्टेड झालेल्या पालकांना मुलांच्या इच्छांचा प्रवासच उमगत नाही. अशा वेळेस मग पालक आणि मुलं यांच्या वाटय़ाला येतं काय? तर केवळ झगडा आणि क्लेशच. 
हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं? याचं उत्तर दिनांक 
22 नोव्हेंबर रोजी ‘मंथन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या रश्मी बन्सल यांच्या ‘आमच्या आई-बाबांचं काय?’ या लेखातून मिळतं. नवा व्यवसाय, स्वत:च्या आवडीचा उद्योग करायला जिगर लागते. ती जर मुलांमध्ये असेल तर आनंद मानायचा सोडून मुलांच्या मनात अपयशाची भीती कोंबणं हे केव्हाही चूकच.
त्यापेक्षा मुलांवर विश्वास ठेवणं, त्यांना जमेल तसं पाठबळ देणं, त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी पावलोपावली संवाद ठेवून त्यांचं मनोबल वाढवणं हे केव्हाही चांगलं. 
कोणतंही पाठबळ नसताना स्वत:च्या बुद्धीच्या, कौशल्याच्या जोरावर नवं काही तरी सुरू करणा:या उमद्या मुलांना त्यांच्या पालकांकडून सुरुवातीच्या काळात फक्त मनोबल आणि विश्वास मिळाला तर आपल्या देशातही तरुण आणि यशस्वी उद्योजकांची फळी तयार होईल हे नक्की!
- गजेंद्र तराळे
यवतमाळ