शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

संघर्ष नकोच!

By admin | Updated: December 12, 2015 16:43 IST

आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते.

 
आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते. 
एकदा का मुलांचं शिक्षण पूर्ण झालं की आई-बाबांची हीच अपेक्षा मग हट्टामध्ये रुपांतरित होते आणि सतत नोकरीसाठी मुलांच्या मागे लागलं जातं. मुलं लवकर नोकरीला लागली नाही की मुलाचं संपूर्ण भविष्यच मग अंधारात दिसू लागतं. 
पण इकडे मुलांच्या मनात काहीतरी नवं उमलत असतं, त्यांना स्वत:साठी नवी पायवाट दिसत असते याचा अंदाजही त्यांच्या पालकांना नसतो. मग नोकरीचा लकडा, मुलं जे म्हणतात ते उडवून लावणं, सतत मुलांच्या मनात भीती पेरणं नाहीतर इतका पैसा तुमच्या शिक्षणावर खर्च केला तो वसूल तरी होणार का? - यासारखी अपेक्षांची तलवार मुलांच्या डोक्यावर ठेवली जाते.  
पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या इच्छा यांच्यात संघर्ष इथेच सुरू होतो. असे संघर्ष घरोघरी होत असतात. 
मुलांना नोकरी करायची नसते याचा अर्थ त्यांना काम करायचं नसतं, कमवायचं नसतं, आपल्या जबाबदा:या पूर्ण करायच्या नसतात असं नाही. 
खरंतर त्यांना नवं काही तरी करून बघायचं असतं. 
मनात उमललेल्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठीची जमवाजमव करण्यात मुलं गुंतलेली असतात. पण रिझल्ट ओरिएण्टेड झालेल्या पालकांना मुलांच्या इच्छांचा प्रवासच उमगत नाही. अशा वेळेस मग पालक आणि मुलं यांच्या वाटय़ाला येतं काय? तर केवळ झगडा आणि क्लेशच. 
हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं? याचं उत्तर दिनांक 
22 नोव्हेंबर रोजी ‘मंथन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या रश्मी बन्सल यांच्या ‘आमच्या आई-बाबांचं काय?’ या लेखातून मिळतं. नवा व्यवसाय, स्वत:च्या आवडीचा उद्योग करायला जिगर लागते. ती जर मुलांमध्ये असेल तर आनंद मानायचा सोडून मुलांच्या मनात अपयशाची भीती कोंबणं हे केव्हाही चूकच.
त्यापेक्षा मुलांवर विश्वास ठेवणं, त्यांना जमेल तसं पाठबळ देणं, त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी पावलोपावली संवाद ठेवून त्यांचं मनोबल वाढवणं हे केव्हाही चांगलं. 
कोणतंही पाठबळ नसताना स्वत:च्या बुद्धीच्या, कौशल्याच्या जोरावर नवं काही तरी सुरू करणा:या उमद्या मुलांना त्यांच्या पालकांकडून सुरुवातीच्या काळात फक्त मनोबल आणि विश्वास मिळाला तर आपल्या देशातही तरुण आणि यशस्वी उद्योजकांची फळी तयार होईल हे नक्की!
- गजेंद्र तराळे
यवतमाळ