शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संघर्ष नकोच!

By admin | Updated: December 12, 2015 16:43 IST

आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते.

 
आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते. 
एकदा का मुलांचं शिक्षण पूर्ण झालं की आई-बाबांची हीच अपेक्षा मग हट्टामध्ये रुपांतरित होते आणि सतत नोकरीसाठी मुलांच्या मागे लागलं जातं. मुलं लवकर नोकरीला लागली नाही की मुलाचं संपूर्ण भविष्यच मग अंधारात दिसू लागतं. 
पण इकडे मुलांच्या मनात काहीतरी नवं उमलत असतं, त्यांना स्वत:साठी नवी पायवाट दिसत असते याचा अंदाजही त्यांच्या पालकांना नसतो. मग नोकरीचा लकडा, मुलं जे म्हणतात ते उडवून लावणं, सतत मुलांच्या मनात भीती पेरणं नाहीतर इतका पैसा तुमच्या शिक्षणावर खर्च केला तो वसूल तरी होणार का? - यासारखी अपेक्षांची तलवार मुलांच्या डोक्यावर ठेवली जाते.  
पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या इच्छा यांच्यात संघर्ष इथेच सुरू होतो. असे संघर्ष घरोघरी होत असतात. 
मुलांना नोकरी करायची नसते याचा अर्थ त्यांना काम करायचं नसतं, कमवायचं नसतं, आपल्या जबाबदा:या पूर्ण करायच्या नसतात असं नाही. 
खरंतर त्यांना नवं काही तरी करून बघायचं असतं. 
मनात उमललेल्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठीची जमवाजमव करण्यात मुलं गुंतलेली असतात. पण रिझल्ट ओरिएण्टेड झालेल्या पालकांना मुलांच्या इच्छांचा प्रवासच उमगत नाही. अशा वेळेस मग पालक आणि मुलं यांच्या वाटय़ाला येतं काय? तर केवळ झगडा आणि क्लेशच. 
हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं? याचं उत्तर दिनांक 
22 नोव्हेंबर रोजी ‘मंथन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या रश्मी बन्सल यांच्या ‘आमच्या आई-बाबांचं काय?’ या लेखातून मिळतं. नवा व्यवसाय, स्वत:च्या आवडीचा उद्योग करायला जिगर लागते. ती जर मुलांमध्ये असेल तर आनंद मानायचा सोडून मुलांच्या मनात अपयशाची भीती कोंबणं हे केव्हाही चूकच.
त्यापेक्षा मुलांवर विश्वास ठेवणं, त्यांना जमेल तसं पाठबळ देणं, त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी पावलोपावली संवाद ठेवून त्यांचं मनोबल वाढवणं हे केव्हाही चांगलं. 
कोणतंही पाठबळ नसताना स्वत:च्या बुद्धीच्या, कौशल्याच्या जोरावर नवं काही तरी सुरू करणा:या उमद्या मुलांना त्यांच्या पालकांकडून सुरुवातीच्या काळात फक्त मनोबल आणि विश्वास मिळाला तर आपल्या देशातही तरुण आणि यशस्वी उद्योजकांची फळी तयार होईल हे नक्की!
- गजेंद्र तराळे
यवतमाळ