शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

संघर्ष नकोच!

By admin | Updated: December 12, 2015 16:43 IST

आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते.

 
आपल्या मुलांनी उत्तम शिकावं, चांगली नोकरी मिळवावी, कोणत्याही आई-बाबांची आपल्या मुलांकडून हीच तर अपेक्षा असते. 
एकदा का मुलांचं शिक्षण पूर्ण झालं की आई-बाबांची हीच अपेक्षा मग हट्टामध्ये रुपांतरित होते आणि सतत नोकरीसाठी मुलांच्या मागे लागलं जातं. मुलं लवकर नोकरीला लागली नाही की मुलाचं संपूर्ण भविष्यच मग अंधारात दिसू लागतं. 
पण इकडे मुलांच्या मनात काहीतरी नवं उमलत असतं, त्यांना स्वत:साठी नवी पायवाट दिसत असते याचा अंदाजही त्यांच्या पालकांना नसतो. मग नोकरीचा लकडा, मुलं जे म्हणतात ते उडवून लावणं, सतत मुलांच्या मनात भीती पेरणं नाहीतर इतका पैसा तुमच्या शिक्षणावर खर्च केला तो वसूल तरी होणार का? - यासारखी अपेक्षांची तलवार मुलांच्या डोक्यावर ठेवली जाते.  
पालकांच्या अपेक्षा, मुलांच्या इच्छा यांच्यात संघर्ष इथेच सुरू होतो. असे संघर्ष घरोघरी होत असतात. 
मुलांना नोकरी करायची नसते याचा अर्थ त्यांना काम करायचं नसतं, कमवायचं नसतं, आपल्या जबाबदा:या पूर्ण करायच्या नसतात असं नाही. 
खरंतर त्यांना नवं काही तरी करून बघायचं असतं. 
मनात उमललेल्या इच्छेला मूर्त स्वरूप देण्यासाठीची जमवाजमव करण्यात मुलं गुंतलेली असतात. पण रिझल्ट ओरिएण्टेड झालेल्या पालकांना मुलांच्या इच्छांचा प्रवासच उमगत नाही. अशा वेळेस मग पालक आणि मुलं यांच्या वाटय़ाला येतं काय? तर केवळ झगडा आणि क्लेशच. 
हे सगळं टाळायचं असेल तर काय करावं? याचं उत्तर दिनांक 
22 नोव्हेंबर रोजी ‘मंथन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या रश्मी बन्सल यांच्या ‘आमच्या आई-बाबांचं काय?’ या लेखातून मिळतं. नवा व्यवसाय, स्वत:च्या आवडीचा उद्योग करायला जिगर लागते. ती जर मुलांमध्ये असेल तर आनंद मानायचा सोडून मुलांच्या मनात अपयशाची भीती कोंबणं हे केव्हाही चूकच.
त्यापेक्षा मुलांवर विश्वास ठेवणं, त्यांना जमेल तसं पाठबळ देणं, त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्याशी वैचारिक संघर्ष करण्यापेक्षा त्यांच्याशी पावलोपावली संवाद ठेवून त्यांचं मनोबल वाढवणं हे केव्हाही चांगलं. 
कोणतंही पाठबळ नसताना स्वत:च्या बुद्धीच्या, कौशल्याच्या जोरावर नवं काही तरी सुरू करणा:या उमद्या मुलांना त्यांच्या पालकांकडून सुरुवातीच्या काळात फक्त मनोबल आणि विश्वास मिळाला तर आपल्या देशातही तरुण आणि यशस्वी उद्योजकांची फळी तयार होईल हे नक्की!
- गजेंद्र तराळे
यवतमाळ