शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

निमित्त- समतेचा मंत्र देणारा संत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 06:00 IST

आज समाजात विषमता, रूढी, अंधश्रद्घा, परंपरांचे वेड, धार्मिक अहंकार, प्रांतवाद सर्वत्र बोकाळलेला आहे...

- डॉ. राम आबणे- आज समाजात विषमता, रूढी, अंधश्रद्घा, परंपरांचे वेड, धार्मिक अहंकार, प्रांतवाद सर्वत्र बोकाळलेला आहे. अजूनही कित्येकांना घर नाही, निवारा नाही, वस्त्र नाही, पुरेसे अन्न नाही. राज्यकर्ते आपापल्याच राजकारणात गुंग आहेत. म्हणून आजच्या काळात संत रोहिदास (इ.स. १३७६ ते १५२७) यांच्या स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या तत्त्वांच्या विचारांची गरज आहे.जाती-जातींत विभागलेल्या समाजाला एकतेच्या सूत्रात बांधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्याचे कार्य संत रोहिदासांनी केले. त्यांच्या जयंतीनिमित्त.. भक्तीची ध्वजा दक्षिणेतून हाती वागवत आचार्य रामानंद उत्तरेला प्रकटले आणि भेदाभेदांनी भग्न झालेल्या भयग्रस्त समाजमनास भक्तीचा आधार लाभला. रामानंदांच्या उदार वृत्तीत सारा समाज संघटित करण्याचे सामर्थ्य होते. उच्चनीचता, कृत्रिम बंधनांना झुगारून स्वामी रामानंदाचे संत सांगाती आत्मविश्वासाने पुढे सरसावले आणि भक्तीची चळवळ सगळीकडे सुरू झाली. उच्चनीचता या बंधनांना त्यांनी झुगारले. कोष्ट्याचा कबीर दुर्दम्य आत्मबलाने बोलू लागला. कसायाघरचा सदन टाळ-मृदंगाच्या गजरात रंगून गेला. धना जाटाची ब्रह्मानंदी टाळी लागली आणि संत रोहिदास भक्तीची बानी व दोेहे आाणि सारखी गाऊ लागला. या सर्व संतांची भक्ती पाहून सारा समाज त्यांचा जयजयकार करू लागला. शील, कर्तृत्व आणि उच्च प्रतीचा भक्तिभाव यामुळे रोहिदास संतपदाला पोहोचले. त्यांनी आपल्या अमृतवाणीने संपूर्ण भारत जागृत केला. संत कबीर आणि गुरू नानकजी हे गुरू रोहिदासांचे समकालीन होते. गुरू रोहिदासांना कबीर गुरू व मोठे बंधू मानावयाचे गुरू गोरखनाथ व गुरू नानक हे रोहिदासांची कीर्ती ऐकून स्वत: त्याच्या भेटीस आले होते. नानक स्वत: संत रोहिदासांची गीते, भजने म्हणत असत. शीखांचा पवित्र ग्रंथ गुरुसाहिबमध्ये संत रोहिदासांची चाळीस पदे असून, त्यांच्या विचारधारेला या ग्रंथात आदराचे स्थान दिले आहे. सद्गुरू रोहिदासांची वाणी ही ब्रह्मज्ञानाचे विशाल असे भांडार आहे, की जे भारतीय समाजाला प्रकाश देणाºया गोळ्याचे कार्य करते. रोहिदासांचा काळ हा धर्मग्लानीचा होता. बहुतेक हिंदू राज्ये परधर्मीय आक्रमकांनी खालसा झाली होती. यज्ञयाग, व्रतवैकल्ये, जपजाप्य एवढ्यापुरतेच धर्मभावनेचे क्षेत्र आकुंचित बनले होते. कर्मठपणाचे अवास्तव बंड माजल्यामुळे नैतिक मूल्यांची चहाड राहिली नव्हती. उच्चवर्गीय सुखासीनतेची व भोगविलासाची प्रवृत्ती वाढली होती. अशा वेळी रोहिदासांना वाईट वाटले. जनतेच्या दु:खाला आपल्या शांत वाणीने सुखी करण्याचा आयुष्यभर त्यांनी प्रयत्न केला. ते म्हणतात, ऐसा चाहौ राज मैंै, जहां मिलैै सब कौ अन्न।छोटे बडे सभ सम बसैै, रोहिदास रहैै प्रसन्न।।मला या देशात अशी व्यवस्था, असे राज्य हवे आहे, जेथे सर्वांना अन्न मिळाले पाहिजे. लहान-मोठे सगळे एकाच पंक्तीत बसायला पाहिजेत. त्यांच्यामध्ये बंधुभाव निर्माण व्हायला पाहिजे. तेव्हाच मला प्रसन्नता लाभेल, असा समाजवादाचा सिद्घांतच त्यांनी दिला. सद्गुरू रोहिदास यांची महत्ता अशी, की त्यांनी सर्वप्रथम नारीजातीला समान हक्क दिले आणि मानवतेच्या विरुद्घ विचारांना विरोध केला. नारीला भक्ती करण्याचा अधिकार नाही, असा समज त्या वेळेस होता. स्त्री-पुरुष समानता नव्हती. संत रोहिदासांच्या तत्कालीन अनेक राजघराण्यांतील राण्या त्यांच्या शिष्या बनल्या होत्या. यामध्ये मीराबाई, राणी झाला आदींचा समावेश होता. मीराबाईस सती जाण्यापासून परावृत्त करण्याचे कार्य संत रोहिदासांनी केले. थोडक्यात, त्यांचा सतीप्रथेस विरोध होता. संत रोहिदास हिंदू-मुसलमान या दोन्ही धर्मांना समान मानत होते. ते म्हणत-मंदिर मसजिद दोऊ एकं हैै, इन मंह अंतर नाही।रोहिदास राम रहमान का, झगडड कोड नाहि।।संत रोहिदासांच्या विचारधारेवर प्रभावित होऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी संत रोहिदास यांचा अतिशय भक्तिपूर्ण असा पोवाडा लिहिला आहे. अशा वंदनीय संत रोहिदासांच्या सामाजिक विचारांना पुढे नेण्याची गरज आहे. (लेखक संतसाहित्याचे अभ्यासक असून, त्यांनी देशात सर्वप्रथम संत रोहिदासांवर पीएच. डी. मिळवली आहे.)

 

टॅग्स :Puneपुणे