शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
4
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
5
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
6
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
9
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
10
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
11
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
12
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
13
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
14
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
15
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
16
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
17
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
18
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
19
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
20
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:29 IST

इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

-डॉ. एन. एल. तरवाळइंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

आजच्या दिवशीच ३ फेबु्रवारी १८३२ रोजी इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टोश यांनी उमाजी राजेंना फाशी दिली. अत्यंत राक्षसीपणाने, कू्ररपणे फाशी देऊन त्यांचे पार्थिव पिंपळाच्या झाडाला सलग तीन दिवस लटकविले. लोकांच्या मनात इंग्रजांची व त्यांच्या सत्तेची जरब बसविणे हे त्यामागचे उद्दिष्ट होते. खरं तर इंग्रजांना खूप भीती वाटत होती उमाजी राजेंच्या साहसाची, स्वातंत्र्यलढ्याची, बंडाची.

दि. १५ डिसेंबर १८३१ रोजी उमाजीराजेंना फितुरीने उत्रोळी (ता. भोर, जि. पुणे) येथे पकडले. त्यांना फाशी देणाऱ्या कॅप्टन मॅकिन्टोशने उमाजी राजेंचा खराखुरा इतिहास लिहून ठेवला आहे. २५ आॅक्टोबर १८३३ ला मॅकिन्टोश यांनी त्यावेळचा गर्व्हनर जॉन अर्ल आॅफ क्लेअर यांना ‘अ‍ॅन अकौंट आॅफ ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन दि ट्राईब आॅफ रामोशीज इंक्लुडिंग दि लाईफ आॅफ दि चीफ उमिया नाईक’ असा अहवाल सुपूर्द केला. मॅकिन्टोश यांनी निरपेक्षपणे केलेल्या लिखाणासाठी त्यांचे खूप खूप आभार.

त्याकाळी पूर्ण हिंदुस्थान इंग्रजांनी काबीज केला होता. अशा ह्या राक्षसी इंग्रजांना बंडखोरीने प्रत्युत्तर देणारे व ४१ वर्षे आयुष्यमान लाभलेले उमाजीराजे यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी भिवडी येथे झाला. स्वतंत्र भारताच्या संकल्पनेचे बीज सर्वप्रथम उमाजीराजे यांनी काढलेल्या १६ फेब्रुवारी १८३१ रोजीच्या जाहीरनाम्यात होते. त्यांनी सरकारप्रमाणे खंड, शेतसारा, वसुली आपणाकडे घ्यायला सुरुवात केली. जिथे इंग्रज दिसतील तिथे त्यांना ठार मारण्याचे आवाहन केले. ते स्वत: साकुर्डीमध्ये जमा झालेला खजिना गरजूंना देत. जबरदस्त शरीरयष्टी, धैर्य, शिस्तबद्धता, चिकाटी, मनमिळाऊपणा, तसेच निर्णयक्षमतेच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. त्यामुळेच मॅकिन्टोश म्हणतोय की, जर काळ अनुकूल असता तर उमाजीराजे दुसरे शिवाजीराजे झाले असते.

अशा या आद्यक्रांतिकारकाला राक्षसीवृत्तीने फाशी दिली आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारा एक निश्चयी योद्धा काळाच्या पडद्याआड गेला. उमाजीराजेंनी केलेल्या कार्याला, त्यांच्या शौर्याला, तसेच त्यांना कोटी कोटी अभिवादन.... 

(लेखक शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)

टॅग्स :historyइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज