शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
4
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
5
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
6
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
7
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
8
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
9
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
10
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
11
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
12
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
13
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
14
Navi Mumbai: तीन मित्रांच्या जीवावर बेतली पावसाळी सहल 
15
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
16
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
17
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
18
IPO: 'स्वप्न विकणारे' आयपीओ ठरले फसवे, रिटर्न्समध्ये गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग !
19
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
20
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली

उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:29 IST

इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

-डॉ. एन. एल. तरवाळइंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

आजच्या दिवशीच ३ फेबु्रवारी १८३२ रोजी इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टोश यांनी उमाजी राजेंना फाशी दिली. अत्यंत राक्षसीपणाने, कू्ररपणे फाशी देऊन त्यांचे पार्थिव पिंपळाच्या झाडाला सलग तीन दिवस लटकविले. लोकांच्या मनात इंग्रजांची व त्यांच्या सत्तेची जरब बसविणे हे त्यामागचे उद्दिष्ट होते. खरं तर इंग्रजांना खूप भीती वाटत होती उमाजी राजेंच्या साहसाची, स्वातंत्र्यलढ्याची, बंडाची.

दि. १५ डिसेंबर १८३१ रोजी उमाजीराजेंना फितुरीने उत्रोळी (ता. भोर, जि. पुणे) येथे पकडले. त्यांना फाशी देणाऱ्या कॅप्टन मॅकिन्टोशने उमाजी राजेंचा खराखुरा इतिहास लिहून ठेवला आहे. २५ आॅक्टोबर १८३३ ला मॅकिन्टोश यांनी त्यावेळचा गर्व्हनर जॉन अर्ल आॅफ क्लेअर यांना ‘अ‍ॅन अकौंट आॅफ ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन दि ट्राईब आॅफ रामोशीज इंक्लुडिंग दि लाईफ आॅफ दि चीफ उमिया नाईक’ असा अहवाल सुपूर्द केला. मॅकिन्टोश यांनी निरपेक्षपणे केलेल्या लिखाणासाठी त्यांचे खूप खूप आभार.

त्याकाळी पूर्ण हिंदुस्थान इंग्रजांनी काबीज केला होता. अशा ह्या राक्षसी इंग्रजांना बंडखोरीने प्रत्युत्तर देणारे व ४१ वर्षे आयुष्यमान लाभलेले उमाजीराजे यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी भिवडी येथे झाला. स्वतंत्र भारताच्या संकल्पनेचे बीज सर्वप्रथम उमाजीराजे यांनी काढलेल्या १६ फेब्रुवारी १८३१ रोजीच्या जाहीरनाम्यात होते. त्यांनी सरकारप्रमाणे खंड, शेतसारा, वसुली आपणाकडे घ्यायला सुरुवात केली. जिथे इंग्रज दिसतील तिथे त्यांना ठार मारण्याचे आवाहन केले. ते स्वत: साकुर्डीमध्ये जमा झालेला खजिना गरजूंना देत. जबरदस्त शरीरयष्टी, धैर्य, शिस्तबद्धता, चिकाटी, मनमिळाऊपणा, तसेच निर्णयक्षमतेच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. त्यामुळेच मॅकिन्टोश म्हणतोय की, जर काळ अनुकूल असता तर उमाजीराजे दुसरे शिवाजीराजे झाले असते.

अशा या आद्यक्रांतिकारकाला राक्षसीवृत्तीने फाशी दिली आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारा एक निश्चयी योद्धा काळाच्या पडद्याआड गेला. उमाजीराजेंनी केलेल्या कार्याला, त्यांच्या शौर्याला, तसेच त्यांना कोटी कोटी अभिवादन.... 

(लेखक शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)

टॅग्स :historyइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज