शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:29 IST

इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

-डॉ. एन. एल. तरवाळइंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

आजच्या दिवशीच ३ फेबु्रवारी १८३२ रोजी इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टोश यांनी उमाजी राजेंना फाशी दिली. अत्यंत राक्षसीपणाने, कू्ररपणे फाशी देऊन त्यांचे पार्थिव पिंपळाच्या झाडाला सलग तीन दिवस लटकविले. लोकांच्या मनात इंग्रजांची व त्यांच्या सत्तेची जरब बसविणे हे त्यामागचे उद्दिष्ट होते. खरं तर इंग्रजांना खूप भीती वाटत होती उमाजी राजेंच्या साहसाची, स्वातंत्र्यलढ्याची, बंडाची.

दि. १५ डिसेंबर १८३१ रोजी उमाजीराजेंना फितुरीने उत्रोळी (ता. भोर, जि. पुणे) येथे पकडले. त्यांना फाशी देणाऱ्या कॅप्टन मॅकिन्टोशने उमाजी राजेंचा खराखुरा इतिहास लिहून ठेवला आहे. २५ आॅक्टोबर १८३३ ला मॅकिन्टोश यांनी त्यावेळचा गर्व्हनर जॉन अर्ल आॅफ क्लेअर यांना ‘अ‍ॅन अकौंट आॅफ ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन दि ट्राईब आॅफ रामोशीज इंक्लुडिंग दि लाईफ आॅफ दि चीफ उमिया नाईक’ असा अहवाल सुपूर्द केला. मॅकिन्टोश यांनी निरपेक्षपणे केलेल्या लिखाणासाठी त्यांचे खूप खूप आभार.

त्याकाळी पूर्ण हिंदुस्थान इंग्रजांनी काबीज केला होता. अशा ह्या राक्षसी इंग्रजांना बंडखोरीने प्रत्युत्तर देणारे व ४१ वर्षे आयुष्यमान लाभलेले उमाजीराजे यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी भिवडी येथे झाला. स्वतंत्र भारताच्या संकल्पनेचे बीज सर्वप्रथम उमाजीराजे यांनी काढलेल्या १६ फेब्रुवारी १८३१ रोजीच्या जाहीरनाम्यात होते. त्यांनी सरकारप्रमाणे खंड, शेतसारा, वसुली आपणाकडे घ्यायला सुरुवात केली. जिथे इंग्रज दिसतील तिथे त्यांना ठार मारण्याचे आवाहन केले. ते स्वत: साकुर्डीमध्ये जमा झालेला खजिना गरजूंना देत. जबरदस्त शरीरयष्टी, धैर्य, शिस्तबद्धता, चिकाटी, मनमिळाऊपणा, तसेच निर्णयक्षमतेच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. त्यामुळेच मॅकिन्टोश म्हणतोय की, जर काळ अनुकूल असता तर उमाजीराजे दुसरे शिवाजीराजे झाले असते.

अशा या आद्यक्रांतिकारकाला राक्षसीवृत्तीने फाशी दिली आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारा एक निश्चयी योद्धा काळाच्या पडद्याआड गेला. उमाजीराजेंनी केलेल्या कार्याला, त्यांच्या शौर्याला, तसेच त्यांना कोटी कोटी अभिवादन.... 

(लेखक शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)

टॅग्स :historyइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज