शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 00:29 IST

इंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

-डॉ. एन. एल. तरवाळइंग्रजांनी लादलेल्या गुलामगिरीच्या काळात हिंदुस्थानातील पहिले क्रांतीचे बंड पुकारणारे, तसेच इंग्रजांना ‘सळो की पळो’ करणारे व १८५७ च्या राष्ट्रीय उठावापूर्वीही स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार करूपाहणारे एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचा आज, रविवारी स्मृतिदिन...

आजच्या दिवशीच ३ फेबु्रवारी १८३२ रोजी इंग्रज अधिकारी कॅप्टन अलेक्झांडर मॅकिन्टोश यांनी उमाजी राजेंना फाशी दिली. अत्यंत राक्षसीपणाने, कू्ररपणे फाशी देऊन त्यांचे पार्थिव पिंपळाच्या झाडाला सलग तीन दिवस लटकविले. लोकांच्या मनात इंग्रजांची व त्यांच्या सत्तेची जरब बसविणे हे त्यामागचे उद्दिष्ट होते. खरं तर इंग्रजांना खूप भीती वाटत होती उमाजी राजेंच्या साहसाची, स्वातंत्र्यलढ्याची, बंडाची.

दि. १५ डिसेंबर १८३१ रोजी उमाजीराजेंना फितुरीने उत्रोळी (ता. भोर, जि. पुणे) येथे पकडले. त्यांना फाशी देणाऱ्या कॅप्टन मॅकिन्टोशने उमाजी राजेंचा खराखुरा इतिहास लिहून ठेवला आहे. २५ आॅक्टोबर १८३३ ला मॅकिन्टोश यांनी त्यावेळचा गर्व्हनर जॉन अर्ल आॅफ क्लेअर यांना ‘अ‍ॅन अकौंट आॅफ ओरिजिन अँड प्रेझेंट कंडिशन दि ट्राईब आॅफ रामोशीज इंक्लुडिंग दि लाईफ आॅफ दि चीफ उमिया नाईक’ असा अहवाल सुपूर्द केला. मॅकिन्टोश यांनी निरपेक्षपणे केलेल्या लिखाणासाठी त्यांचे खूप खूप आभार.

त्याकाळी पूर्ण हिंदुस्थान इंग्रजांनी काबीज केला होता. अशा ह्या राक्षसी इंग्रजांना बंडखोरीने प्रत्युत्तर देणारे व ४१ वर्षे आयुष्यमान लाभलेले उमाजीराजे यांचा जन्म ७ सप्टेंबर १७९१ रोजी भिवडी येथे झाला. स्वतंत्र भारताच्या संकल्पनेचे बीज सर्वप्रथम उमाजीराजे यांनी काढलेल्या १६ फेब्रुवारी १८३१ रोजीच्या जाहीरनाम्यात होते. त्यांनी सरकारप्रमाणे खंड, शेतसारा, वसुली आपणाकडे घ्यायला सुरुवात केली. जिथे इंग्रज दिसतील तिथे त्यांना ठार मारण्याचे आवाहन केले. ते स्वत: साकुर्डीमध्ये जमा झालेला खजिना गरजूंना देत. जबरदस्त शरीरयष्टी, धैर्य, शिस्तबद्धता, चिकाटी, मनमिळाऊपणा, तसेच निर्णयक्षमतेच्या जोरावर त्यांनी इंग्रजांना ‘सळो की पळो’ करून सोडले. त्यामुळेच मॅकिन्टोश म्हणतोय की, जर काळ अनुकूल असता तर उमाजीराजे दुसरे शिवाजीराजे झाले असते.

अशा या आद्यक्रांतिकारकाला राक्षसीवृत्तीने फाशी दिली आणि स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारा एक निश्चयी योद्धा काळाच्या पडद्याआड गेला. उमाजीराजेंनी केलेल्या कार्याला, त्यांच्या शौर्याला, तसेच त्यांना कोटी कोटी अभिवादन.... 

(लेखक शिवाजी विद्यापीठात सहायक प्राध्यापक आहेत.)

टॅग्स :historyइतिहासShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज