शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

आमदार महोदय, महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे..! अधिवेशनात पायरी सोडणाऱ्या आमदारांना खुलं पत्र

By अतुल कुलकर्णी | Updated: August 28, 2022 06:14 IST

Maharashtra Politics: राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... काय ते अंगावर धावून जाणं... काय त्या घोषणा... एकदम ओक्के...!

- अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई सन्माननीय आमदार महोदय, नमस्कार. राज्याचे पावसाळी अधिवेशन ‘न भूतो न भविष्यती’ झाले. यावेळी ज्या पद्धतीने काही सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर धमाल केली, त्याला तोड नाही. ‘पायरी सोडणे’ हे विशेषण खूप दिवसांनी आपल्यामुळे वापरायला मिळाले... काय ती मारामारी.... काय ते अंगावर धावून जाणं... काय त्या घोषणा... एकदम ओक्के...! या अधिवेशनाने मराठी साहित्यात मोलाची भर घातली. सगळे जण मराठीसाठी भांडत असताना, आपण जे मोलाचे योगदान दिले, त्यासाठी कविवर्य कुसुमाग्रज स्वर्गात आनंदाने मोहरून गेले असतील..! पन्नास खोके - एकदम ओक्के, पन्नास खोके - चिडलेत बोके, गद्दारांना ताटवाटी - चलो चले गुवाहाटी..., गाजर देणं बंद करा - ओला दुष्काळ जाहीर करा..., खड्ड्यांचे खोके - मातोश्री ओके..., लवासाचे खोके - बारामती ओके... एक से बढकर एक यमक जुळवून केलेल्या ओळी मराठी साहित्यात पुढच्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरतील, यात शंका नाही.छोटे-मोठे सगळे नेते अधिवेशन काळात पूर्ण वेळ मराठी साहित्य समृद्ध करण्याच्या मागे लागले होते. (हात धुऊन मागे लागले होते, हे वाक्य वापरायचे की नाही, तेही तुम्हीच सांगा) कोणी म्हणाले, सुरतेवर स्वारी झाली - राज्याची बदनामी झाली... तर काहींनी, ‘थांबवा आता शब्दांचे वार - आमचे मित्र अजित पवार...’, अशी नवी घोषणाही जन्माला घातली. रामदास आठवले यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केल्याचा परिणाम तत्काळ दिसला. मुख्यमंत्र्यांनी देखील ‘देवेंद्र और हम है साथ साथ - मेरा नाम है एकनाथ...’, अशी चारोळी नाही, दुओळी ऐकवली.  पण महाराष्ट्राच्या लक्षात राहिली ती विधानभवनाच्या पायऱ्यांवर झालेली फ्री स्टाईल..! कोण घोषणा देत होतं... कोण कोणाच्या अंगावर धावून गेलं... कोणाच्या गळ्यात गाजराच्या माळा होत्या... हे सगळं पुढचे काही महिने तरी चर्चेत राहील. परवा दारावर भाजीची गाडी आली. गाजरं घ्यायला गेलो तर गाडीवाला म्हणाला, हातात देऊ की माळ करून देऊ...? इतका खोलवर परिणाम आजपर्यंत विधिमंडळातल्या कोणत्या गोष्टीचा झाला असेल... यावर संशोधन करावे, असे वाटत आहे..! कधी नव्हे ते अजितदादा, राजेश टोपे यांनी फिफ्टी - फिफ्टी बिस्किटांचे पुडे हातात धरून जाहिरात केली. तेव्हा त्यांचे माध्यम सल्लागार संजय खोडके यांनी बिस्किटांच्या कंपनीकडे जाहिरातीचे बिल पाठवून दिल्याची चर्चा रंगली...! ही माहिती टोपेंना कळाली तसे त्यांनी मलाही त्यातले पन्नास पुडे पाठवा, अशी गळ खोडकेंना घातल्याची वदंता आहे..!सगळेच आमदार असे नव्हते. काही आमदार सभागृहात बसत होते. कामकाजात भाग घेत होते. प्रश्न विचारत होते.अभ्यासू मंत्री, आपल्या विभागाने किती डास मारले..? त्यांचे शवविच्छेदन कसे केले..? हे खुलासेवार सांगत होते. तर काही अभ्यासू सदस्य, मारले गेलेल्या डासांपैकी किती नर व किती मादी प्रजातीचे होते..? त्यांच्या शवविच्छेदनातून कोण जास्त आक्रमक असल्याचे सिद्ध झाले..? असे प्रश्न विचारून विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करत होते..! काही म्हणा, दोन आठवडे छान गेले. अधिवेशन संपून आपण आपापल्या मतदारसंघात गेलात... पोळ्याचा सण उत्साहात साजरा केला... भविष्यातही आपल्याकडून मराठी साहित्यात आणि विज्ञानात अशीच भर पडावी, ही अपेक्षा..!             -  तुमचाच, बाबूराव

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVidhan Bhavanविधान भवनPoliticsराजकारण