शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

अजिंक्यवीर घडवू या

By admin | Updated: November 29, 2014 14:14 IST

खेळाची आवड मुलांच्या मनात खोल रुजवायची आणि त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला जी शिस्त लागते, ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची, ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. ती त्यांनी जर नीट पार पाडली नाही, तर मुलगा अजिंक्यवीर बनणे अशक्यच आहे.

 भीष्मराज बाम

 
प्रश्न : माझा मुलगा छान टेनिस खेळतो. तो आता फक्त १0 वर्षांचा आहे; पण त्याच्यापेक्षा मोठय़ा मुलांनाही तो सहज हरवतो. त्याच्या प्रशिक्षकांचेही मत त्याच्या खेळाबद्दल फार चांगले आहे. आम्हाला त्याने सवरेत्तम खेळाडू होऊन विम्बल्डनसारख्या मोठय़ा आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकाव्यात, असे वाटते. आमचे नातेवाईक आणि मित्रमंडळी आम्हाला वेड्यात काढतात. तो स्पर्धेमध्ये कधी-कधी ढेपाळतो तेव्हा मग आम्हाला दोघांनाही फार वाईट वाटते. तोही रडत बसतो, चिडतो आणि व्यायाम, सराव वगैरे करायचे नाकारतो. आम्ही त्याच्या स्पर्धा बघायलासुद्धा जाऊ नये, असे प्रशिक्षक म्हणतात. पण, आम्हाला ते पटत नाही. काय करणे योग्य होईल?
उत्तर :- मुलांना खेळाडू घडवावे, असे वाटणारे पालक भेटले, की खूप आनंद होतो. सगळे पालक कितीही सुस्थितीत असले, तरी ते मुलांच्या शाळा-कॉलेजच्या शिक्षणाबद्दलच काळजी करताना दिसतात. तो शिक्षणाचा सर्वांत सोपा भाग आहे. खेळ आणि कला शिकणे हे जास्त अवघड आणि मुलांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. या गोष्टी जर लहान वयात शिकल्या नाहीत, तर त्यांच्या मेंदूची वाढ नीट होत नाही आणि भय जिंकून आव्हानांना तोंड देणे त्यांना कठीण होऊन बसते. आणि जराही मनाविरुद्ध गोष्ट घडली, की निराशा कब्जा घेऊन टाकते व जीवन जगणे असह्य व्हायला लागते. घरी सर्व जण मुलांचे लाडच करीत असतात; पण बाहेरचे जग फार दुष्ट असते. ते सर्वच लोक आपल्याविरुद्ध आहेत, असा मुलांचा समज होत असतो. घरचे लोक म्हणतात तितके आपण खरोखरच चांगले आहोत की नाही, हे खेळाच्या मैदानावरच मुलांना समजते. पालकांची भूमिका ही असायला हवी, की मुलाला आपले कर्तृत्व सिद्ध करूनच बाहेर मानसन्मान मिळणार आहे. त्यासाठी त्याला स्वत:पासून तोडावेच लागते. मुलांना शाळेत घालतो तेव्हा आपण किती दिवस त्यांच्याबरोबर जाऊन बसतो? केव्हा तरी त्यांना हे कळायलाच हवे, की आपण जितके चांगले होऊ, तितकाच मान आपल्याला मिळणार आहे. जे अभ्यासातले कौशल्य मिळविण्यासाठी करायला हवे, तेच खेळाच्या मैदानावरही करायला हवे. आपल्या मुलाला तुम्ही खेळाची आवड लावली ते अतिशय उत्तम केले; पण त्याच्या स्पर्धांच्या वेळीसुद्धा मायेची पाखर घालण्याचा प्रयत्न तुम्ही करणार असाल, तर ते त्याच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत घातक ठरेल. शाळेत जसा शिक्षकाचा अधिकार तुम्ही मान्य करता, तसाच खेळाच्या मैदानावर क्रीडा प्रशिक्षकाचा अधिकार मान्य करायला हवा. तिथे जाऊन तुम्ही लुडबुड करणार असाल, तर तुमचा मुलगा सर्वोत्तम खेळाडू बनणे शक्य नाही.
सरावाच्या, व्यायामाच्या आणि आहाराच्या बाबतीत बहुतेक पालकांची तक्रार असते, की मुले यासंबधीची शिस्त स्वीकारायला तयार नसतात. याला मुख्य कारण असे, की स्वत: पालकच यातील शिस्त पाळत नाहीत; मग त्या शिस्ती चांगल्या आहेत, हे मुलांना पटणार कसे? मुले तोंडाने सांगून कधीच शिकत नाहीत. ती पाहूनच शिकत असतात. जर मुलांना शिस्त लावायची असेल, तर पालकांनी स्वत:ला शिस्त लावून घेतली पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही आणि आपण मुलांचे किती लाड करायचे, यालाही र्मयादा असते. आपल्या आवडीनिवडींना मुरड घालून जे करायला पाहिजे ते करायलाच हवे, हे शिकणे हीच तर विकासाच्या टप्प्यांची पहिली पायरी आहे. त्याला तितिक्षा असे म्हणतात. ही साधना पालकांनी आधी केलेली नसेल, तर आता करायला हवी आणि आपण आता ही शिस्त पाळू या, असा संकल्प करायला हवा. मला माझ्या वडिलांनी सकाळी लवकर उठण्याची सवय लावली आणि मीसुद्धा ती लावून घेतली, याचे मुख्य कारण म्हणजे ते माझ्याआधी उठलेलेच असत. मग मलाही लोळत पडायची लाज वाटायला लागली आणि आता इतक्या वर्षांनंतरही एखाद्या वेळी उठायला उशीर झाला, तर मला फार मोठी चूक केल्यासारखे वाटत राहते.
बालवयातल्या खेळाडूंचे पालक त्यांनी सामने जिंकावेत, यासाठी अधीर झालेले असतात. त्याचेच दडपण या छोट्या  खेळाडूंवर जास्त येते. बालवयातले सामने हे त्यांना अनुभव मिळावा म्हणून आयोजित केलेले असतात. त्यातली सर्व बक्षिसे ही उत्तेजनासाठी असतात. आता हे जर पालकांनाच कळाले नाही, तर बालकांना कसे कळेल? आधीच हार पत्करणे लहान मुलांना मुळीच आवडत नाही आणि पालक जर जिंकण्याला इतके महत्त्व द्यायला लागले, तर ते नाराज होण्याची भीती मुलांच्या मनात घर करून बसते. खेळाची आवड मुलांच्या मनात खोल रुजवायची आणि त्यासाठी लागणारी मेहनत घ्यायला जी शिस्त लागते, ती त्यांच्यामध्ये निर्माण करायची ही पालकांची मुख्य जबाबदारी आहे. ती त्यांनी जर नीट पार पाडली नाही, तर मुलगा अजिंक्यवीर बनणे अशक्यच आहे. असंख्य श्रेष्ठ गुणवत्ता असलेली मुले पालकांच्या दडपणाला कंटाळून थोडी मोठी झाल्याबरोबर खेळच सोडून देताना दिसतात. आपला मुलगा विम्बल्डन चॅम्पियन व्हावा, असे वाटणे ही फार चांगली गोष्ट आहे. पण, आम्ही त्याला विम्बल्डन चॅम्पियन करू, असे म्हणत असाल, तर आपल्याला मुळीच न पेलणारी जबाबदारी तुम्ही घेत आहात, असे वाटते. त्याने काय बनवायचे ते तो ठरवणार आहे. अगदी ईश्‍वरसुद्धा ही जबाबदारी घेत नाही, तोही गुणवत्ता देऊन बाकीचे सारे आपल्यावर सोडत असतो. तुम्ही फक्त उत्तम पालक व्हायचे; मग उत्तम माणूस, उत्तम खेळाडू, यशस्वी कीर्तिमान व्यक्ती होणे या 
सार्‍या जबाबदार्‍या त्याच्या आहेत. त्याने त्या चांगल्या पार पाडाव्यात, यासाठी आपण सर्वांनी फक्त 
आशीर्वाद द्यायचे असतात. कारण, विम्बल्डन जिंकणारा खेळाडू निर्माण झाला, तर तो फक्त तुमचा मुलगा, अशी त्याची ओळख राहिलेलीच नसते. तो संपूर्ण भारताचा एक मानबिंदू झालेला असतो. मग 
सर्व जगाला तुमची ओळख ‘त्याचे पालक’ अशी 
होत असते. यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती 
असू शकेल?
(लेखक ज्येष्ठ क्रीडाप्रशिक्षक व 
सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)