शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

गर्भवतींना हक्काचे ‘माहेर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:05 IST

जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.

ठळक मुद्देगरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

सुनील दुसाने (उपमुख्य कार्यकारी आधिकारी, एकात्मिक बालविकास योजना) ठिकाण : नाशिक शहरी विभाग (पूर्वी जळगाव)

काय केले?1. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.2. गरोदर मातांना जर त्या गर्भवती असताना योग्य पोषण आहार मिळाला आणि गर्भातच तो बालकाला मिळाला तर जन्मणार्‍या बाळाचे वजन वाढू शकते, त्यामुळे त्यावर भर दिला.3. त्यासाठी गर्भवतींना प्रशिक्षण दिले. नियमित आहार; विशेषत: दुपारच्या वेळी महिलांनी दुपारी आहार घेतल्यानंतर दोन तास डाव्या कुशीवर झोपल्यास नाळेतून गर्भातील बाळाला थेट आहार मिळतो, याबद्दल त्यांच्यात जागृती निर्माण केली.4. योजना चांगल्या पद्धतीने राबविण्याचे ठरविल्यानंतर महिलांना घरात विर्शांती घेणे काहीसे अडचणीचे होते. त्यामुळे त्यांना अंगणवाडीतील काम संपल्यानंतर दोन तास ही वेळ निश्चित करण्यात आली.5. गरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

काय घडले?1. या योजनेसाठी एक हजार गरोदर मातांची निवड करण्यात आली त्या त्या अंगणवाड्यांमध्ये त्यांची सोय करण्यात आली.2. महिलांना घरून आहाराचे डबे आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महिलांना एक अतिरिक्त आहार मिळाला.3. ज्या महिलांची आहार आणण्याची स्थिती नव्हती त्यांना लोकवर्गणीतून आहार उपलब्ध करून देण्यात आला.4. कुटुंबातील सासूसासरे, ज्येष्ठ सदस्यांमुळे तसेच कामामुळे महिलांना दुपारी विर्शांती मिळत नव्हती ती मिळाली.5. या योजनेमुळे 58 टक्के मुलांचे वजन 3 किलो आणि त्यापेक्षा अधिक झाले.6. 30 ते 35 टक्के मुले अडीच ते तीन किलो वजनाची जन्मली7. याच योजनेच्या यशस्वीतेमुळे राज्य सरकारने योजनेला विस्तृत स्वरूप दिले आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना आणली

..तर जन्माआधीच कुपोषण आटोक्यात!महिलांचे, विशेषत: गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले असले, त्यांना वेळेवर मार्गदर्शन, पोषक आहार, विर्शांती मिळाली, तर जन्माला येणारे बालक सुदृढ असते. ग्रामीण आणि आदिवासी भागात नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे अनेक बालके जन्मत:चा कुपोषित असतात. गर्भवती महिलांना हक्काचे ‘माहेर’ मिळाले आणि तिथे त्यांची घरच्यासारखी काळजी घेतली गेली तर कुपोषणाची समस्या बालकांच्या जन्माआधीच आटोक्यात येऊ शकेल. - सुनील दुसाने 

(मुलाखत आणि शब्दांकन : संजय पाठक, लोकमत, नाशिक)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा