शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

गर्भवतींना हक्काचे ‘माहेर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:05 IST

जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.

ठळक मुद्देगरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

सुनील दुसाने (उपमुख्य कार्यकारी आधिकारी, एकात्मिक बालविकास योजना) ठिकाण : नाशिक शहरी विभाग (पूर्वी जळगाव)

काय केले?1. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.2. गरोदर मातांना जर त्या गर्भवती असताना योग्य पोषण आहार मिळाला आणि गर्भातच तो बालकाला मिळाला तर जन्मणार्‍या बाळाचे वजन वाढू शकते, त्यामुळे त्यावर भर दिला.3. त्यासाठी गर्भवतींना प्रशिक्षण दिले. नियमित आहार; विशेषत: दुपारच्या वेळी महिलांनी दुपारी आहार घेतल्यानंतर दोन तास डाव्या कुशीवर झोपल्यास नाळेतून गर्भातील बाळाला थेट आहार मिळतो, याबद्दल त्यांच्यात जागृती निर्माण केली.4. योजना चांगल्या पद्धतीने राबविण्याचे ठरविल्यानंतर महिलांना घरात विर्शांती घेणे काहीसे अडचणीचे होते. त्यामुळे त्यांना अंगणवाडीतील काम संपल्यानंतर दोन तास ही वेळ निश्चित करण्यात आली.5. गरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

काय घडले?1. या योजनेसाठी एक हजार गरोदर मातांची निवड करण्यात आली त्या त्या अंगणवाड्यांमध्ये त्यांची सोय करण्यात आली.2. महिलांना घरून आहाराचे डबे आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महिलांना एक अतिरिक्त आहार मिळाला.3. ज्या महिलांची आहार आणण्याची स्थिती नव्हती त्यांना लोकवर्गणीतून आहार उपलब्ध करून देण्यात आला.4. कुटुंबातील सासूसासरे, ज्येष्ठ सदस्यांमुळे तसेच कामामुळे महिलांना दुपारी विर्शांती मिळत नव्हती ती मिळाली.5. या योजनेमुळे 58 टक्के मुलांचे वजन 3 किलो आणि त्यापेक्षा अधिक झाले.6. 30 ते 35 टक्के मुले अडीच ते तीन किलो वजनाची जन्मली7. याच योजनेच्या यशस्वीतेमुळे राज्य सरकारने योजनेला विस्तृत स्वरूप दिले आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना आणली

..तर जन्माआधीच कुपोषण आटोक्यात!महिलांचे, विशेषत: गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले असले, त्यांना वेळेवर मार्गदर्शन, पोषक आहार, विर्शांती मिळाली, तर जन्माला येणारे बालक सुदृढ असते. ग्रामीण आणि आदिवासी भागात नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे अनेक बालके जन्मत:चा कुपोषित असतात. गर्भवती महिलांना हक्काचे ‘माहेर’ मिळाले आणि तिथे त्यांची घरच्यासारखी काळजी घेतली गेली तर कुपोषणाची समस्या बालकांच्या जन्माआधीच आटोक्यात येऊ शकेल. - सुनील दुसाने 

(मुलाखत आणि शब्दांकन : संजय पाठक, लोकमत, नाशिक)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा