शहरं
Join us  
Trending Stories
1
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
2
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
3
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
4
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
5
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
6
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
7
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
8
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
9
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
10
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
11
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
12
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
13
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
14
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
15
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
16
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
17
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
18
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
19
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
20
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवतींना हक्काचे ‘माहेर’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:05 IST

जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.

ठळक मुद्देगरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

सुनील दुसाने (उपमुख्य कार्यकारी आधिकारी, एकात्मिक बालविकास योजना) ठिकाण : नाशिक शहरी विभाग (पूर्वी जळगाव)

काय केले?1. जळगाव जिल्ह्यात सुमारे अडीच तालुके आदिवासीबहुल आहेत. तेथे कुपोषणाची समस्या सोडविण्यासाठी अभिनव ‘माहेर’ ही योजना राबवली.2. गरोदर मातांना जर त्या गर्भवती असताना योग्य पोषण आहार मिळाला आणि गर्भातच तो बालकाला मिळाला तर जन्मणार्‍या बाळाचे वजन वाढू शकते, त्यामुळे त्यावर भर दिला.3. त्यासाठी गर्भवतींना प्रशिक्षण दिले. नियमित आहार; विशेषत: दुपारच्या वेळी महिलांनी दुपारी आहार घेतल्यानंतर दोन तास डाव्या कुशीवर झोपल्यास नाळेतून गर्भातील बाळाला थेट आहार मिळतो, याबद्दल त्यांच्यात जागृती निर्माण केली.4. योजना चांगल्या पद्धतीने राबविण्याचे ठरविल्यानंतर महिलांना घरात विर्शांती घेणे काहीसे अडचणीचे होते. त्यामुळे त्यांना अंगणवाडीतील काम संपल्यानंतर दोन तास ही वेळ निश्चित करण्यात आली.5. गरोदर महिलांना घरी गेल्यावर आईच्या ममतेने सांभाळले जाते आणि आहार दिला जातो त्यामुळे या योजनेला ‘माहेर’ असे नाव दिले.

काय घडले?1. या योजनेसाठी एक हजार गरोदर मातांची निवड करण्यात आली त्या त्या अंगणवाड्यांमध्ये त्यांची सोय करण्यात आली.2. महिलांना घरून आहाराचे डबे आणण्यास सांगण्यात आले. त्यामुळे महिलांना एक अतिरिक्त आहार मिळाला.3. ज्या महिलांची आहार आणण्याची स्थिती नव्हती त्यांना लोकवर्गणीतून आहार उपलब्ध करून देण्यात आला.4. कुटुंबातील सासूसासरे, ज्येष्ठ सदस्यांमुळे तसेच कामामुळे महिलांना दुपारी विर्शांती मिळत नव्हती ती मिळाली.5. या योजनेमुळे 58 टक्के मुलांचे वजन 3 किलो आणि त्यापेक्षा अधिक झाले.6. 30 ते 35 टक्के मुले अडीच ते तीन किलो वजनाची जन्मली7. याच योजनेच्या यशस्वीतेमुळे राज्य सरकारने योजनेला विस्तृत स्वरूप दिले आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना आणली

..तर जन्माआधीच कुपोषण आटोक्यात!महिलांचे, विशेषत: गर्भवती महिलांचे आरोग्य चांगले असले, त्यांना वेळेवर मार्गदर्शन, पोषक आहार, विर्शांती मिळाली, तर जन्माला येणारे बालक सुदृढ असते. ग्रामीण आणि आदिवासी भागात नेमकी याच गोष्टीची कमतरता आहे. त्यामुळे अनेक बालके जन्मत:चा कुपोषित असतात. गर्भवती महिलांना हक्काचे ‘माहेर’ मिळाले आणि तिथे त्यांची घरच्यासारखी काळजी घेतली गेली तर कुपोषणाची समस्या बालकांच्या जन्माआधीच आटोक्यात येऊ शकेल. - सुनील दुसाने 

(मुलाखत आणि शब्दांकन : संजय पाठक, लोकमत, नाशिक)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा