शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

जीवनस्पर्शी

By admin | Updated: September 6, 2014 14:23 IST

स्वत:ला अपूर्ण मानणार्‍या म. गांधीजींच्या नम्रतेने विनोबांना प्रभावित केले. बापू स्थितप्रज्ञतेच्या जवळ पोहोचले आहेत, असे त्यांना जाणवले. आश्रमात बापूंच्या सान्निध्याने, बापूंच्या जीवनाच्या स्पर्शाने विनोबा एका नव्या रूपात जन्माला आले. येत्या ११ सप्टेंबर रोजी त्यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने..

- वासंती सोर

सर्व आश्रमवासी महात्मा गांधींना प्रेमादराने बापू म्हणत आणि विनायक नरहरी भावे हा युवक साबरमती आश्रमात दाखल झाल्यावर बापूंनी प्रेमाने त्यांचे नामकरण विनोबा भावे केले. ज्ञानोबा, तुकोबा या संतपरंपरेत स्थान मिळवून विनोबांनी ते नाव सार्थ केले. विनोबा बापूंना कधी भेटलेही नव्हते. दर्शनही घेतले नव्हते, तरीही त्यांनी बापूंचे वेगळेपण टिपले आणि हे वेगळेपण पुढे अधिकाधिक प्रत्ययाला येत गेले.
आध्यात्मिक शांतीचा ध्यास घेऊन विनायक नरहरी भावे हा युवक घर सोडून हिमालयाच्या दिशेने निघाला होता. वाटेत त्याचा मुक्काम काशीला होता. तिथे त्याने काशी विद्यापीठाच्या उद्घाटनाप्रसंगी बापूंनी दिलेले व्याख्यान वाचले. बापूंचे वेगळेपण त्या व्याख्यानातूनच त्याला जाणवले. व्याख्यानाच्या संदर्भात त्याच्या मनात काही शंका निर्माण झाल्या. बापूंना पत्र पाठवून त्याने आपल्या शंका त्यांच्यासमोर ठेवल्या. बापूंचे सविस्तर पत्र आले. तरीही चिकित्सक विनायकाच्या मनात काही शंका शिल्लकच होत्या. 
त्याने पुन्हा पत्र पाठविले. उत्तरात बापूंनी लिहिले, ‘‘पत्रानं तुमच्या शंकांचं समाधान करता येणार नाही. त्यासाठी जीवनाला स्पर्श हवा. समाधान चर्चेनं नव्हे, तर जीवनानं होईल. तुम्ही साबरमती आश्रमात या.’’ पत्रासोबत आश्रमाच्या नियमावलीचे पत्रक होते. इथेच जीवनाच्या स्पर्शाची सुरुवात झाली. नियमावलीत आश्रमवासींसाठी काही व्रतांचे पालन अनिवार्य मानले होते. भारतीय परंपरेत आध्यात्मिक साधनेसाठी, मुमुक्षूसाठी व्रतपालन आवश्यक मानले आहे. हे विनायकाला माहीत होते. त्याला वाटले, हा माणूस वेगळाच दिसतोय. अन्यायनिवारणासाठी करायच्या अहिंसक सत्याग्रहींसाठी हा व्रतपालन आवश्यक मानतोय. जीवनाला झालेला आश्रमी जीवनाचा पहिला स्पर्श विनायकाला चकित करून गेला. विनायक आश्रमाचा रहिवासी झाल्यावर आश्रमवासींचा व्रतपालनाचा प्रयत्न त्याने पाहिला. बापूंच्या जीवनात तर त्याने व्रतपालनाची पराकाष्ठाच पाहिली. जीवनाला होणारा स्पर्श अधिक गहिरा झाला. 
विनायकाला लहानपणापासून दोन गोष्टींचे आकर्षण होते. बंगालची क्रांती आणि आध्यात्मिक शांती. क्रांती व शांतीचे दर्शन त्याला एकाच ठिकाणी बापूंमध्ये झाले आणि शंकानिरसनासाठी बापूंच्या भेटीला आलेला विनायक साबरमती आश्रमाचा रहिवासी होऊन विनोबा झाला. आश्रमातील त्या दोघांच्या पहिल्या भेटीतून जीवनाला होणार्‍या स्पर्शाने याला एक वेगळेच दर्शन झाले. विनोबा बापूंच्या भेटीला गेले, तेव्हा बापू स्वयंपाकघरात सुरीने भाजी चिरत होते. आफ्रिकेतील सत्याग्रहात सफलता मिळवून आलेला एवढा महान पुढारी भाजी चिरतोय, हे बघून विनोबा पुन्हा चकित झाले. विनोबांचा गीतेचा अभ्यास होता. त्यातून कर्माची अनिवार्यता त्यांना कळली होती; पण इथे बापूंच्या जीवनात त्याचे दर्शन झाले. बापूंनी एक सुरी त्यांना दिली. विनोबा म्हणतात, की आजपर्यंत त्यांनी अभ्यासाशिवाय कुठलेच काम केले नव्हते. त्यांना भाजी चिरता येणे शक्यच नव्हते. बापूंनी तेही शिकवले. न बोलता, जीवनातून ज्ञानयोगी विनोबांना बापूंनी कर्मयोगाची दीक्षा दिली. शंकानिरसनासाठी आलेले विनोबा बापूंजवळच राहिले. दोघांमध्ये अनोखे सौहार्द निर्माण झाले. आश्रमवासी होण्याच्या संदर्भात विनोबा म्हणतात, ‘‘मी बापूंना भेटलो आणि त्यांच्यावर मुग्ध झालो. बापूंच्या सत्यनिष्ठेत मला कुठलीही उणीव, न्यूनता, कमतरता दिसली असती तर मी त्यांच्याजवळ टिकलोच नसतो.’’
स्वत:ला अपूर्ण मानणार्‍या बापूंच्या नम्रतेने विनोबांना प्रभावित केले. बापू स्थितप्रज्ञाच्या लक्षणांच्या जवळ पोहोचले आहेत, असे त्यांना जाणवले. ते म्हणतात, ‘‘बापूंच्या आश्रमात जे काही मला मिळालं, ते आजवर माझ्या उपयोगाला आलं. बापूंचा आश्रम मला दृष्टी देणारं मातृस्थान आहे.’’ आश्रमात बापूंच्या सान्निध्याने, बापूंच्या जीवनाच्या स्पर्शाने विनोबा एका नव्या रूपात जन्माला आले. बापूंनी विनोबांच्या शारीरिक स्वास्थ्याचीही काळजी त्यांनी केली. त्यांचा विश्‍वास विनोबांनी संपादन केला म्हणून तर व्यक्तिगत सत्याग्रहाच्या वेळी पहिला सत्याग्रही म्हणून बापूंनी विनोबांची निवड केली. 
विनोबांनी कधीच कोणाला गुरू मानले नाही. त्यांनी बापूंनाही गुरुपद बहाल केले नाही. त्यांनी बापूंना पितृपद बहाल केले. तसा उल्लेख त्यांनी एका पत्रात केला. त्या पत्राच्या उत्तरात बापू लिहितात, ‘‘तुझी श्रद्धा आणि भक्ती माझ्या डोळ्यांत पाणी आणते. तुझ्यासारख्याचा पिता होण्याची पात्रता माझ्यात नाही. ती पात्रता प्राप्त करण्याचा मी प्रयत्न करीन.’’ बापूंच्या नम्रतेचा हा स्पर्श मोलाचा होता.
आश्रमात आल्यानंतर विनोबा सर्वार्थाने घडत गेले. या घडण्याबद्दल ते स्वत: म्हणतात, ‘‘मी जंगली जनावर होतो. बापूंनी मला पाळीव प्राणी केलं. मी एक ओबडधोबड पाषाण होतो. बापूंनी त्यावर कारागिरी केली आणि मला माणूस केलं.’’ हे घडणे पत्रव्यवहारातून किंवा उपदेशातून झाले नव्हते. ते घडले जीवनाच्या स्पर्शातून.
(लेखिका ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्त्या आहेत.)