शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

लीलावतीकालीन आर्थिक व्यवहार

By admin | Updated: August 2, 2014 14:41 IST

थोर गणिती भास्कराचार्य यांच्या जन्माला या वर्षी ९00 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी बाराव्या शतकात त्यांचा सुप्रसिद्ध ‘लीलावती’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात उमटलेले तत्कालीन अर्थव्यवहारांचे प्रतिबिंब रोचक आहे.

 मेधा लिमये

आपल्या भारतात प्राचीन काळापासून शिक्षणात गणिताला महत्त्वाचे स्थान होते, तेव्हाच्या गुरु-शिष्य परंपरेत बहुतेक शिक्षण मौखिक पद्धतीने दिले जात असे; परंतु गणितासारख्या विषयाला लिखित पुस्तकाची फार गरज असते म्हणून गणितावरील पाठय़पुस्तके पाचव्या शतकापासून लिहिली गेली. सामान्यपणे गणितावरील पाठय़पुस्तक ज्या काळात लिहिले जाते, त्या काळातील लोकव्यवहारांचे दर्शन त्यातून अपरिहार्यपणे घडते कारण गणित विषयाचा संबंध मोठय़ा प्रमाणावर जनतेच्या दैनंदिन व्यवहारांशी असतो. थोर गणिती भास्कराचार्य यांच्या जन्माला या वर्षी ९00 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांनी बाराव्या शतकात त्यांचा सुप्रसिद्ध ‘लीलावती’ हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात उमटलेले तत्कालीन अर्थव्यवहारांचे प्रतिबिंब रोचक आहे. लीलावतीत भास्कराचार्यांनी प्रथम परिभाषा शीर्षकांतर्गत त्या काळच्या नाण्यांचे कोष्टक, धान्यमापे, सुवर्णमापे तसेच लांबी व क्षेत्रफळ मोजण्याची परिमाणे दिली आहेत. पहिले कोष्टक नाण्यांचे आहे. ते असे - 
२0 कवड्या  = १ काकिणी 
 ४ काकिणी = १ पण 
१६ पण = १ द्रम्म  
१६ द्रम्म = १ निष्क  
बहुतेक संस्कृत गणितग्रंथांमध्ये सर्वांत लहान नाणे ‘कवडी’ हेच दिले आहे. भास्कराचार्यांनी कवडीला ‘वराटक’ हा संस्कृत शब्द वापरला आहे. ‘कपर्दिक’ असा शब्दही वापरला जात असे. कवड्या समुद्रकिनार्‍यावर सहजपणे मिळत असत तसेच टिकाऊ, चमकदार व हाताळण्यास सुलभ असत म्हणून बहुधा त्यांचा उपयोग ‘चलन’ म्हणून होऊ लागला. सर्वसामान्य लोक व व्यापारी मोठय़ा प्रमाणावर त्यांचा उपयोग चलनी नाण्यासारखा करीत. कवडी किमतीने अगदी लहान म्हणूनच स्वाभिमानी माणसाचा गुण सांगताना तो कोणाची ‘फुटकी कवडी’ किंवा ‘कपर्दिक’ही घेणार नाही, असा वाक्प्रचार आपल्या मराठीत आहे. कवडीहून मोठे नाणे ‘काकिणी’ हे सामान्यत: तांब्याचे असे. त्याहून मोठी नाणी ‘पण’ आणि ‘द्रम्म’ ही बहुधा चांदीची असत व ‘निष्क’ हे सर्वांत मोठे नाणे सोन्याचे असे. काकिणीला ‘दमडी’, पणाला ‘पैसा’ आणि द्रम्माला ‘पावली’ अशी नावे नंतरच्या काळात रूढ झाली. ‘लीलावती पुनर्दर्शन’ या पुस्तकात ना. ह. फडके म्हणतात, ‘विसाव्या शतकाच्या प्रारंभापयर्ंत भारतात नाण्यांची व्यवस्था साधारणत: वरील प्रकारचीच होती. इ. स. १९१0 मध्ये पुण्यात वाण्याच्या दुकानात एक पैशास ४0 कवड्या मिळत. त्यांचा नाण्यांसारखा उपयोग करता येत असे. मिरच्या-कोथिंबिरीसारख्या किरकोळ वस्तू कवड्यांनी विकत घेता येत. ‘दाम’ हा शब्द ‘द्रम्म’ शब्दापासूनच झालेला आहे.’  
अशी चलनी नाणी असली तरी पूर्वी चलनाचा प्रसार र्मयादित होता व दैनंदिन व्यवहारात वस्तुविनिमय चालत असे, याला लीलावती व इतर संस्कृत ग्रंथांमध्ये ‘भांड-प्रतिभांड’ असा शब्द आहे. ‘लीलावती’त फळांचे उदाहरण दिले आहे. ते असे -
द्रम्मेण लभ्यत इहाऽऽम्रशतत्रयं चेत
त्रिंशत्पणेन विपणौ वरदाडिमानि ।
आम्रैर्वदाऽशु दशभि: कति दाडिमानि  
लभ्यानि तद्विनिमयेन भवन्ति मित्र ॥ 
अर्थ - बाजारात एका द्रम्मास (१६ पैशांस) ३00 आंबे मिळतात तसेच एका पैशास चांगल्या दर्जाची तीस डाळिंबे मिळतात. तर मित्रा, दहा आंब्यांच्या बदल्यात किती डाळिंबे मिळू शकतील ते चटकन सांग. [उत्तर : १६ डाळिंबे] येथे आंबे व डाळिंबे यांची जी तुलनात्मक किंमत दिली आहे, तशीच सामान्यपणे आजच्या काळातही आढळते. 
लीलावतीत सम-व्यस्त प्रमाणासाठी त्रैराशिक, पंचराशिक ते एकादशराशिक पद्धत दिली आहे. यावरील उदाहरणांवरून तेव्हाच्या नित्योपयोगी वस्तूंच्या व्यापाराची माहिती मिळते. केशर, कापूर, तांदूळ, मूग, चंदन, अगरू यांच्या खरेदी-विक्रीची उदाहरणे ‘लीलावती’त आहेत. केशराचा भाव तेव्हाही जास्त होता असे दिसते. एका उदाहरणात अडीच पल केशराचा भाव ३/७ निष्क म्हणजे जवळजवळ ७ द्रम्म दिला आहे. केशरासारखे पदार्थ मोजण्यासाठी गुंजा, माष, पल अशी परिमाणे होती. ५ गुंजांचा १ माष (अपभ्रंश-मासा), १६ माषांचा १ कर्ष व ४ कर्षांचा १ पल असे कोष्टक लीलावतीत आहे. 
खरे पाहता ही त्या काळातील सुवर्णमापे होती; पण लहान परिमाणात खरेदी केल्या जाणार्‍या औषधी वनस्पती, मसाले इत्यादींसाठीही ही परिमाणे प्रचारात होती. कापूर, चंदन, अगरू ही वनस्पतिजन्य सुगंधी द्रव्ये पूर्वीपासून भारतात धार्मिक पूजाअर्चांमध्ये उपयोगात आणली जात. त्यांना मागणी असल्यामुळे व्यापारात महत्त्वाचे स्थान होते. कापूर जास्त महाग होता, असे दिसते. ‘लीलावती’तील एका उदाहरणात प्रकृष्ट म्हणजे शुद्ध केलेला ६३ पल कापूर विकून १0४ निष्क मिळतात, असे दिले आहे. दुसर्‍या उदाहरणात कापूर, चंदन व अगरू खरेदी करून त्यापासून धूप बनविण्याचा उल्लेख आहे. त्यात एक पल कापराचा भाव २ निष्क, एक पल चंदनाचा भाव २ पण व एक पल अगरूचा भाव ४ पण आहे. 
त्या काळी धान्य वजनाने न मोजता मापाने मोजले जाई. भास्कराचार्य महाराष्ट्रातील होते व महाराष्ट्रातील लोकांच्या आहारात तांदळाचाच जास्त समावेश असतो, त्यामुळे तांदळासंबंधी एका उदाहरणात २ द्रम्मास एक पूर्णांक, एक अष्टमांश खारिका तांदूळ मिळतात, असा भाव दिला आहे. 
लीलावतीत इतर व्यावहारिक उदाहरणांमध्ये रंगीत व उत्तम किनारीच्या वस्त्रांचे उदाहरण आहे. त्या काळी घरबांधणी, घरातील इतर वस्तू यांसाठी लाकडाचा उपयोग जास्त होई, त्यामुळे लांबी, रुंदी व जाडी दिलेली असलेल्या लाकडी फळ्यांच्या किमतीसंबंधी उदाहरणे आहेत.  
‘लीलावती’त सरळ व्याजावरील उदाहरणे आहेत. रास काढणे, रकमेचे विभाग निरनिराळ्या मुदतीसाठी देऊन समान व्याज येत असल्यास विभाग काढणे अशी उदाहरणे येतात. त्या काळी खासगी सावकारी मोठय़ा प्रमाणावर चाले. विशेष म्हणजे संस्कृत गणितग्रंथांमधील उदाहरणांमध्ये व्याजाचा दर सामान्यपणे मासिक असतो आणि तो बराच जास्त आढळतो. लीलावतीतही व्याजाचा मासिक दर बहुतेक उदाहरणांमध्ये महिन्याला शेकडा ४ ते ५ इतका आहे. 
एवढे व्याज देण्यातच ऋणकोची दमछाक होत असेल व मुद्दल फेडणे कठीणच होत असेल म्हणूनच त्या काळात ऋण काढून काही करणे नको, अशी सर्वसामान्य लोकांची धारणा होती. या शिवाय भागीदारीच्या व्यवहारांचीही उदाहरणे आहेत. एका उदाहरणात तीन व्यापार्‍यांनी अनुक्रमे ५१, ६८ व ८५ निष्क भांडवल घातले व कौशल्याने व्यापार करून ३00 निष्क मिळविले, असे सांगून प्रत्येकाची मिळकत विचारली आहे. या उदाहरणांवरून असे आढळते, की बाराव्या शतकातले आर्थिक व्यवहार आताइतके गुंतागुंतीचे नसले तरी सध्याच्या व्यवहारांची थोड्या प्रमाणावर सुरुवात तेव्हा झाली होती.
(लेखिका विज्ञान अभ्यासक आहेत.)