शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

कुमार सप्तर्षी कुरुंदकरांवर का घसरले?

By admin | Updated: October 3, 2015 22:01 IST

मंथनमधील (13 सप्टेंबर 2015) डॉ. कुमार सप्तर्षी यांचा ‘बरे झाले, शेषराव बरळले’ हा लेख वाचला. ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक आणि एके काळी

मंथनमधील (13 सप्टेंबर 2015) डॉ. कुमार सप्तर्षी यांचा ‘बरे झाले, शेषराव बरळले’ हा लेख वाचला. 
‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक आणि एके काळी शंकराचार्यासोबतचा वाद अत्यंत प्रभावीपणो मांडणारा गांधीवादी विचारवंत एवढय़ा खालच्या पातळीवर जातो यावर विश्वास बसत नाही. शेषराव मोरे भाट आहेत, करुंदकरांच्या कॉलेजात ते लेक्चरर म्हणून लागले हे खोटं आहे. याशिवाय ‘कुरुंदकरांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता’. सप्तर्षी यांच्या लेखातील हे आरोप निर्थक व कुरुंदकरांबद्दल गैरसमज पसरविणारे आहेत. 
पुरोगामी विचारवंताचं हे वैशिष्टय़ आहे, की तो अत्यंत संयमी विचार समजून घेऊन, पचवून तेवढय़ाच परिपक्व विचारांचा प्रतिवाद करणारा ग्रंथ वाचकांच्या हाती देऊन प्रतिक्रिया घेतो. 
कुरुंदकरांच्या निधनाला आज 33 वर्षे पूर्ण झाली आहेत, तेव्हा कुमार सप्तर्षी यांनी कुरुंदकरांसोबत केलेल्या चर्चा, वाद-प्रतिवादाचा ग्रंथ प्रकाशित करावा. पूर्वीच प्रकाशित केला असेल तर तसे सांगून आमचे अज्ञान दूर करावे.
आमच्यासारखा सामान्य वाचक कोणाला विचारुन एखाद्याला विचारवंत ठरवत नसतो, तो त्या लेखकांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा अभ्यास करुन आपले मत बनवतो. हमीद दलवाई यांच्या ‘मुस्लीम जातीयतेचे स्वरुप, कारणो व उपाय’ या साधना प्रकाशनाची प्रस्तावना नरहर कुरुंदकरांची आहे. त्याचाही शब्द न् शब्द वाचून अशी टीका करणा:या विचारवंतास सामान्य वाचकांनी काय सांगायचे?
सय्यदभाईंचा ‘दगडावरील पेरणी’ हा ग्रंथ वाचल्यास मुस्लीम सत्यशोधक चळवळ व मुस्लीम समाजाच्या प्रबोधनासाठी कुरुंदकरांची तळमळ लक्षात येते.
नरहर कुरु ंदकर हे अत्यंत परखडपणो धर्मचिकित्सा  करणारे समाजवादी विचारवंत होते. हे खरे की, कुरुंदकर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता निर्भीडपणो भूमिका मांडत. लोकशाहीच्या दृष्टीने व्यक्तिपूजा घातक आहे म्हणून परभणीत जाहीर भाषणात कुरु ंदकरांनी सांगितले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हा ‘मराठा’ जातीच्या अभिमानाचा विषय नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे.’ कोण धर्मनिरपेक्ष आहे हे ठरवायचे झाल्यास कुरु ंदकर एक व्यावहारिक कसोटी सांगतात- ज्यांची भारतीय संविधानावर निष्ठा आहे व त्या संविधानास जो श्रेष्ठ मानतो तो धर्मनिरपेक्ष समजावा. ही कसोटी लावल्यास मुसलमान धर्मनिरपेक्ष ठरत नाहीत. कदाचित यामुळेच सप्तर्षी अस्वस्थ झाले असावेत. 
‘नरहर कुरुंदकर - राजकीय भाष्यकार’ या लेखात रा. शा. मोरखंडीकर यांनी म्हटल्याप्रमाणो कुरु ंदकरांचे  मुस्लिमांबद्दलचे विवेचन मुसलमानांविषयी त्यांना वाटणा:या आपलेपणातून आलेले आहे हे लक्षात ठेवणो जरुरी आहे. 
सर्व समाजहिताच्या, विकासाच्या तळमळीतून  कुरुंदकर त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या लेखात म्हणतात, सेक्युलर राजकारणाची प्रचंड स्पर्धा  मुस्लीम अंधश्रद्धा कुरवाळण्यासाठी, गोंजारण्यासाठी चालू  असते. पण याखेरीज महत्त्वाच्या आणि मूलभूत आघाडीवर अर्थरचना बदलण्याची गरज आहे. अर्थरचना बदलल्याविना समाजरचना बदलत नसते. दोन्ही आघाडय़ांवर जोर धरावा तेव्हा मंद गतीने मन बदलत असते. मानवी दास्यपरंपरेत मानसिक दास्य हे सर्वात शेवटी लय पावणारे असते. कुरुंदकरांनी धर्मनिरपेक्षतेसाठी केलेली धर्मचिकित्सा विकासासाठीच केलेला प्रपंच आहे. यदुनाथ थत्ते संपादित ‘निवडक तवारिख’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत कुरुंदकर म्हणतात, मुसलमानांच्याच प्रगतीसाठी हा परंपरावाद उद्ध्वस्त करणो आवश्यक आहे. 
धर्मनिरपेक्ष आधुनिक राष्ट्रनिर्माणासाठी कुरुंदकर निर्भीडपणो जी रोखठोक धर्मचिकित्सा करतात त्यासंदर्भात वि. ल. धारु रकर म्हणतात, ‘‘धर्माध वृत्तीचा समाचार घेताना ते जसे हिंदूंचा समाचार घेतात तसाच ते मुसलमानांचाही घेतात. सत्याचे विश्लेषण करताना कुणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही असाच त्यांचा कटाक्ष होता. याच जाणिवेतून त्यांनी सोबत वृत्तपत्रचे व्यासपीठ वापरून मुक्त चिकित्सा केली.’’ 
कुरुंदकर हिंदू धर्म राज्याबाबत अत्यंत मार्मिक व महत्त्वपूर्ण विवेचन करतात. ते म्हणतात, हिंदू धर्म राज्यात अस्पृश्यांना, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क असणार नाही. म्हणजे हिंदू धर्मराज्यात हिंदूच गुलाम होतो. बाकी धर्मीयांचा तर प्रश्नच नाही. हाच नियम अन्य धर्मराज्यांना लागू आहे. तुम्ही कोणत्याही धर्माच्या कक्षेखाली असा. मग तो ईसाई धर्म असो की शांततावादी इस्लाम असो, बौद्धांचे जग असो की हिंदूंचे जग असो माणसाची जात शतकानुशतके गुलाम राहत आली आहे. 
हा धर्मबंधनातून मुक्त होण्याचा लढा म्हणजेच धर्मनिरपेक्षतेचा लढा आहे. कुरु ंदकरांचे त्यांच्या आकलन या ग्रंथातील ‘पू. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने’ हा लेख वाचून मी अत्यंत प्रभावित झालो. त्यापूर्वी आम्ही धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र व अन्य दोन ग्रंथ वाचले होते. पण कुरुंदकरांनी मांडलेला राष्ट्रवादी आंबेडकर अफलातून. त्यानंतरही अनेक ग्रंथ वाचले पण एवढी अभ्यासपूर्ण मांडणी नाही वाचली. कुरुंदकरांची त्यांच्या ‘भजन’ या ग्रंथातील दलितांबद्दलची मांडणीदेखील प्रभावित करते. 
कुरु ंदकरांचा ‘हैदराबाद :  विसर्जन आणि विमोचन’ हा ग्रंथ वाचून नामांतर  आंदोलनाविषयीची त्यांची भूमिका समजून घेऊन थोर समाजवादी नेते एसेम जोशींसंबंधी नांदेड व उदगीर येथे घडलेला प्रसंग पूर्ण अभ्यासून सांगतो, यात कुरुंदकरांची  भूमिका दलितविरोधी नसून मराठवाडय़ाच्या अस्मितेची आहे. 
 
- डॉ. दत्ताहरी होनराव, 
राज्यशास्त्न विभागप्रमुख, 
हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर