शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

कुमार सप्तर्षी कुरुंदकरांवर का घसरले?

By admin | Updated: October 3, 2015 22:01 IST

मंथनमधील (13 सप्टेंबर 2015) डॉ. कुमार सप्तर्षी यांचा ‘बरे झाले, शेषराव बरळले’ हा लेख वाचला. ‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक आणि एके काळी

मंथनमधील (13 सप्टेंबर 2015) डॉ. कुमार सप्तर्षी यांचा ‘बरे झाले, शेषराव बरळले’ हा लेख वाचला. 
‘सत्याग्रही’ मासिकाचे संपादक आणि एके काळी शंकराचार्यासोबतचा वाद अत्यंत प्रभावीपणो मांडणारा गांधीवादी विचारवंत एवढय़ा खालच्या पातळीवर जातो यावर विश्वास बसत नाही. शेषराव मोरे भाट आहेत, करुंदकरांच्या कॉलेजात ते लेक्चरर म्हणून लागले हे खोटं आहे. याशिवाय ‘कुरुंदकरांमध्ये मुस्लीम समाजाबद्दल, आंबेडकरांबद्दल व दलितांबद्दल सुप्त राग होता’. सप्तर्षी यांच्या लेखातील हे आरोप निर्थक व कुरुंदकरांबद्दल गैरसमज पसरविणारे आहेत. 
पुरोगामी विचारवंताचं हे वैशिष्टय़ आहे, की तो अत्यंत संयमी विचार समजून घेऊन, पचवून तेवढय़ाच परिपक्व विचारांचा प्रतिवाद करणारा ग्रंथ वाचकांच्या हाती देऊन प्रतिक्रिया घेतो. 
कुरुंदकरांच्या निधनाला आज 33 वर्षे पूर्ण झाली आहेत, तेव्हा कुमार सप्तर्षी यांनी कुरुंदकरांसोबत केलेल्या चर्चा, वाद-प्रतिवादाचा ग्रंथ प्रकाशित करावा. पूर्वीच प्रकाशित केला असेल तर तसे सांगून आमचे अज्ञान दूर करावे.
आमच्यासारखा सामान्य वाचक कोणाला विचारुन एखाद्याला विचारवंत ठरवत नसतो, तो त्या लेखकांनी लिहिलेल्या साहित्यकृतींचा अभ्यास करुन आपले मत बनवतो. हमीद दलवाई यांच्या ‘मुस्लीम जातीयतेचे स्वरुप, कारणो व उपाय’ या साधना प्रकाशनाची प्रस्तावना नरहर कुरुंदकरांची आहे. त्याचाही शब्द न् शब्द वाचून अशी टीका करणा:या विचारवंतास सामान्य वाचकांनी काय सांगायचे?
सय्यदभाईंचा ‘दगडावरील पेरणी’ हा ग्रंथ वाचल्यास मुस्लीम सत्यशोधक चळवळ व मुस्लीम समाजाच्या प्रबोधनासाठी कुरुंदकरांची तळमळ लक्षात येते.
नरहर कुरु ंदकर हे अत्यंत परखडपणो धर्मचिकित्सा  करणारे समाजवादी विचारवंत होते. हे खरे की, कुरुंदकर कुणाचाही मुलाहिजा न ठेवता निर्भीडपणो भूमिका मांडत. लोकशाहीच्या दृष्टीने व्यक्तिपूजा घातक आहे म्हणून परभणीत जाहीर भाषणात कुरु ंदकरांनी सांगितले, ‘छत्रपती शिवाजी महाराज हा ‘मराठा’ जातीच्या अभिमानाचा विषय नाही, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या अभिमानाचा विषय आहे.’ कोण धर्मनिरपेक्ष आहे हे ठरवायचे झाल्यास कुरु ंदकर एक व्यावहारिक कसोटी सांगतात- ज्यांची भारतीय संविधानावर निष्ठा आहे व त्या संविधानास जो श्रेष्ठ मानतो तो धर्मनिरपेक्ष समजावा. ही कसोटी लावल्यास मुसलमान धर्मनिरपेक्ष ठरत नाहीत. कदाचित यामुळेच सप्तर्षी अस्वस्थ झाले असावेत. 
‘नरहर कुरुंदकर - राजकीय भाष्यकार’ या लेखात रा. शा. मोरखंडीकर यांनी म्हटल्याप्रमाणो कुरु ंदकरांचे  मुस्लिमांबद्दलचे विवेचन मुसलमानांविषयी त्यांना वाटणा:या आपलेपणातून आलेले आहे हे लक्षात ठेवणो जरुरी आहे. 
सर्व समाजहिताच्या, विकासाच्या तळमळीतून  कुरुंदकर त्यांच्या ‘अन्वय’ ग्रंथातील ‘धर्म आणि मन’ या लेखात म्हणतात, सेक्युलर राजकारणाची प्रचंड स्पर्धा  मुस्लीम अंधश्रद्धा कुरवाळण्यासाठी, गोंजारण्यासाठी चालू  असते. पण याखेरीज महत्त्वाच्या आणि मूलभूत आघाडीवर अर्थरचना बदलण्याची गरज आहे. अर्थरचना बदलल्याविना समाजरचना बदलत नसते. दोन्ही आघाडय़ांवर जोर धरावा तेव्हा मंद गतीने मन बदलत असते. मानवी दास्यपरंपरेत मानसिक दास्य हे सर्वात शेवटी लय पावणारे असते. कुरुंदकरांनी धर्मनिरपेक्षतेसाठी केलेली धर्मचिकित्सा विकासासाठीच केलेला प्रपंच आहे. यदुनाथ थत्ते संपादित ‘निवडक तवारिख’ या ग्रंथाच्या प्रस्तावनेत कुरुंदकर म्हणतात, मुसलमानांच्याच प्रगतीसाठी हा परंपरावाद उद्ध्वस्त करणो आवश्यक आहे. 
धर्मनिरपेक्ष आधुनिक राष्ट्रनिर्माणासाठी कुरुंदकर निर्भीडपणो जी रोखठोक धर्मचिकित्सा करतात त्यासंदर्भात वि. ल. धारु रकर म्हणतात, ‘‘धर्माध वृत्तीचा समाचार घेताना ते जसे हिंदूंचा समाचार घेतात तसाच ते मुसलमानांचाही घेतात. सत्याचे विश्लेषण करताना कुणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही असाच त्यांचा कटाक्ष होता. याच जाणिवेतून त्यांनी सोबत वृत्तपत्रचे व्यासपीठ वापरून मुक्त चिकित्सा केली.’’ 
कुरुंदकर हिंदू धर्म राज्याबाबत अत्यंत मार्मिक व महत्त्वपूर्ण विवेचन करतात. ते म्हणतात, हिंदू धर्म राज्यात अस्पृश्यांना, स्त्रियांना शिक्षणाचा हक्क असणार नाही. म्हणजे हिंदू धर्मराज्यात हिंदूच गुलाम होतो. बाकी धर्मीयांचा तर प्रश्नच नाही. हाच नियम अन्य धर्मराज्यांना लागू आहे. तुम्ही कोणत्याही धर्माच्या कक्षेखाली असा. मग तो ईसाई धर्म असो की शांततावादी इस्लाम असो, बौद्धांचे जग असो की हिंदूंचे जग असो माणसाची जात शतकानुशतके गुलाम राहत आली आहे. 
हा धर्मबंधनातून मुक्त होण्याचा लढा म्हणजेच धर्मनिरपेक्षतेचा लढा आहे. कुरु ंदकरांचे त्यांच्या आकलन या ग्रंथातील ‘पू. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने’ हा लेख वाचून मी अत्यंत प्रभावित झालो. त्यापूर्वी आम्ही धनंजय कीर लिखित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चरित्र व अन्य दोन ग्रंथ वाचले होते. पण कुरुंदकरांनी मांडलेला राष्ट्रवादी आंबेडकर अफलातून. त्यानंतरही अनेक ग्रंथ वाचले पण एवढी अभ्यासपूर्ण मांडणी नाही वाचली. कुरुंदकरांची त्यांच्या ‘भजन’ या ग्रंथातील दलितांबद्दलची मांडणीदेखील प्रभावित करते. 
कुरु ंदकरांचा ‘हैदराबाद :  विसर्जन आणि विमोचन’ हा ग्रंथ वाचून नामांतर  आंदोलनाविषयीची त्यांची भूमिका समजून घेऊन थोर समाजवादी नेते एसेम जोशींसंबंधी नांदेड व उदगीर येथे घडलेला प्रसंग पूर्ण अभ्यासून सांगतो, यात कुरुंदकरांची  भूमिका दलितविरोधी नसून मराठवाडय़ाच्या अस्मितेची आहे. 
 
- डॉ. दत्ताहरी होनराव, 
राज्यशास्त्न विभागप्रमुख, 
हावगीस्वामी महाविद्यालय, उदगीर