शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शब्द विसरलेली मुलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 06:05 IST

School Children’s Online and Offline Learning (SCHOOL) या देशव्यापी पाहणीत सहभागी झालेली मुलं काय म्हणतात?

ठळक मुद्देजी मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेली आहे त्यांना परत शाळेत बसण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे.

तेजस्विनी तभाणे, श्रीवाणी जगताप

पुरंदर तालुक्यातील सासवड गावामध्ये धनगरांची एक छोटी वस्ती आहे. तिथे तुम्हाला लहानगी मुलं शेळ्या आणि बकऱ्यांमागे मागे काठी घेऊन पळताना दिसतील. हे त्यांचं रोजचं कामच आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने लॉकडाऊन सुरू झाल्यापासून, ही सर्व मुलं शिक्षणापासून पूर्णपणे दुरावली गेली आहेत. धनगर समाजातील बहुतांशी मुलांना आपल्या कुटुंब-व्यवसायात मदत करण्यासाठी अगदी तिसऱ्या-चौथ्या इयत्तेनंतर शाळा सोडावी लागते. परंतु कोविड-पूर्व काळात ह्या मुलांना निदान लिहिणे-वाचणेतरी

शाळेत शिकता येत होते, पण लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच शाळा सुटली आहे. जी मुलं गेल्यावर्षी पहिलीत होती, ती तर फक्त एखाद-दोन दिवस शाळेत जाऊ शकली आहेत. काहीच महिन्यात ही मुलं तिसऱ्या इयत्तेत गेली असती, पण आता त्यांचा संपूर्ण दिवस शेळ्या-बकऱ्यांमागे

फिरण्यात जातो. ही मुलं पुन्हा शिक्षणव्यवस्थेत येऊ शकतील का, त्यांना लिहिता-वाचता येईल का हा एक मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सासवडप्रमाणेच, भारतातील इतर ग्रामीण व शहरी भागातील, अनेक शाळाबाह्य मुलांची खरी परिस्थिती अर्थशास्त्रज्ञ निराली बखला, ज्यां द्रेज, रितिका खेरा आणि विपुल पैंक्रा यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या

अहवालातून स्पष्ट झाली आहे. School Children’s Online and Offline Learning (SCHOOL) हा अहवाल

भारतातील एकूण १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५-१४ वयोगटातील सुमारे १४०० शालेय मुला-मुलींच्या सर्वेक्षणावर आधारित आहे. हा अहवाल प्रामुख्याने ग्रामीण भागातील वंचित मुलांवर केंद्रित आहे

जे सहसा सरकारी शाळांमध्ये जातात.

या अहवालानुसार शहरी भागातील २४ टक्के विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील फक्त ८ टक्के विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेत आहेत. ग्रामीण भागांत प्रत्येक दुसरं मुल अशा घरात राहतं जिथे एकही स्मार्टफोन नाही. शहरी भागातील १९ टक्के आणि ग्रामीण भागातील ३७ टक्के विद्यार्थ्यांनी काहीही अभ्यास करत

नसल्याची नोंद केली आहे.

या (लॉकडाऊन) काळातील आर्थिक आणि मानसिक अस्थैर्याचे

मुलांना गंभीर चटके बसले आहेत. व्यावसायिक अस्थिरता, कौटुंबिक सदस्यांचा मृत्यू, कोविड संक्रमणाची सततची भीती, वाढती घरगुती हिंसा, कोंदटलेपणा हे सगळं लहानग्या मुलांनी अगदी जवळून

अनुभवलं आहे. या परिस्थितीने मुलांच्या आत्मविश्वासावरही घाला घातला आहे. अनेक पालकांना खासगी शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षणाचा वाढता खर्च परवडत नसल्याने त्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये स्थलांतरित करावं लागले आहे. SCHOOL सर्वेक्षणामध्ये २६ टक्के मुलांनी खासगी शाळा सोडल्याचं दिसून आलं. काही मुलांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांना खासगी शाळांमध्ये अपमान आणि नकाराचा सामना करावा लागला. या अपमानाचा

मुलांच्या मनावर काय परिणाम झाला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. खूप ठिकाणी नेटवर्क मिळत नसल्यामुळे व अनियमित वीज पुरवठा असल्यामुळे मुलांची फरफट झाली आहे. कोकणात अनेक ठिकाणी, दुर्गम भागातील मुले जिथे नेटवर्क मिळेल तिथे तंबू ठोकून तासाला

उपस्थित राहताना दिसत आहेत.

ऑनलाइन अभ्यासामुळे दिवसभर मोबाइल फोनवर गेम्स खेळण्याचं आणि टिकटॉक व इतर सोशल मीडियावर सतत ॲक्टिव्ह असण्याचं मुलांचं प्रमाण खूप वाढलं आहे. मोबाइलच्या व्यसनामुळे मुलांची शारीरिक हालचालही थांबली आहे.

कुटुंबाला हातभार लावण्यासाठी काही मुलं बालमजुरीच्या विळख्यातही अडकली आहेत. कोरोनाकाळात शाळातून ‘drop out’ होण्याची टक्केवारी वाढल्याने बालविवाह व बालमजुरीचं प्रमाणही वाढतं आहे.

SCHOOL अहवालानुसार सहावी ते आठवीत असणारी फक्त ५० टक्के मुलं अस्खलितपणे वाचू शकतात.

जिथे साक्षरता दर फक्त ७४ टक्के आहे, अशा भारतासारख्या देशांत हे अतिशय चिंताजनक आहे. अंगणवाड्या लहान मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु लॉकडाऊनने मुलांना याही संधीपासून वंचित ठेवलं.

SCHOOL सर्वेक्षणाचा भाग असलेली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अनेक मुलं ‘रीडिंग टेस्ट्ला’ घाबरून

जात होती. हातात वाचण्यासाठी प्रश्नावली पकडायलाही नकार देत होती. काही मुलं तर पळून गेली. जे शब्द त्यांना मागच्या वर्षीपर्यंत वाचता यायचे ते सर्व ही मुलं विसरून गेली आहेत.

SCHOOL सर्वेक्षणातील ९४-९७ टक्के पालक शाळा सुरू करण्याच्या बाजूने होते. शिक्षणालासुद्धा अत्यावश्यक सेवा मानले पाहिजे आणि लवकरात लवकर शाळा सुरू करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत.

जी मुलं शिक्षणाच्या प्रवाहातून दूर गेली आहे त्यांना परत शाळेत बसण्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. सरकारने शालेयप्रणाली सुरळीत करण्याबरोबरच, मुलांचं मानसिक व सामाजिक जीवन आणि पोषण-कल्याण व्यवस्था पुन:प्रस्थापित करण्याकडे देखील लक्ष दिले पाहिजे. या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं तर शाळा सुरू करण्याचा उपक्रम फोल ठरेल.

(समन्वयक, SCHOOL)

tabhanetejaswini24@gmail.com