शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
5
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
6
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
7
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
8
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
9
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
10
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
11
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
12
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
13
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
14
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
15
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
16
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
17
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
18
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
19
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
20
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 

सतत स्वत:ला सांगत राहा, की...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 06:05 IST

एखादे वाक्य एखाद्या मंत्राप्रमाणे स्वतःशी म्हणत राहायचे नक्की करून ते सतत म्हणत राहिलो तर शरीराकडून हवे ते प्रतिसाद मिळू शकतात..!

ठळक मुद्देस्वतःच्या शब्दात स्वतःसाठी एक प्रबळ युक्तिवाद तयार करा आणि सतत वाचत राहा.

- वंदना अत्रे

कोलकात्याच्या त्या प्रसिद्ध संशोधन केंद्रात पोचले तेव्हा रात्रीचे १० वाजले होते. रखवालदाराने त्या जुन्या दगडी इमारतीतील माझी निवासाची खोली दाखवली. त्या पूर्ण इमारतीमध्ये मी एकटी मुक्कामी होते. अतिशय कलात्मकरीत्या सजवलेली ती खोली म्हणजे संपन्न अभिरुचीचा नमुना होता. पण तरीही एक गूढ, नकोसेपण तिथे जाणवत होते. रात्रभर सगळे दिवे सुरू ठेवूनच झोप घेण्याचा मी प्रयत्न केला... त्या देखण्या परिसराचे अनेक फोटो आणि दिवसा तिथे अनुभवाला येणारी प्रसन्न शांतता असा अनुभव घेऊन मी परतले.. त्या मुक्कामाचे विचार जेव्हा मनात येत तेव्हा तिथे अनुभवलेल्या निवांत शांततेचा भाव पुन्हा मनात जागा होत असे..! त्या भेटीनंतर काही वर्षांनी संशोधनासाठी तिथे काही काळ राहिलेली एक मैत्रीण भेटली. मी त्या इमारतीत राहिले हे समजल्यावर भयानक चेहरा करीत ती म्हणाली, “त्या खोलीत राहिलीस तू? अग, अनेकांना तिथे रात्री भुते दिसली आहेत म्हणे...” हे ऐकताच मी भीतीने बेशुद्ध पडणे फक्त बाकी होते....

आज त्या खोलीचा विचार चुकून मनात आलाच तर ती प्रसन्न शांतता वगैरे न आठवता फक्त भीतीने थरकाप उडतो! ती घटना घडून काही काळ उलटला आहे तरीही..! आपले विचार आणि आपल्या भावना यांचे अतिशय जवळचे नाते आहे, असे विवेकनिष्ठ विचारसरणी या संकल्पनेचा जनक अल्बर्ट एलीस सांगतो. विचार बदलला की भावना बदलतात आणि भावना बदलल्या की आपले वर्तन बदलते, अशी साखळी त्याने मांडली आहे.

आपल्या विचार प्रक्रियेत शब्दांचे स्थान फारच महत्त्वाचे आहे. त्यामुळे जिने प्रत्यक्ष अनुभव घेतला असेल अशी व्यक्ती जेव्हा आपल्याला तिच्या अनुभवाबद्दल सांगत असते तेव्हा यावर पटकन आपला विश्वास बसतो. किंवा स्वतःच्या अनुभवाबद्दल आपण जेव्हा विचार करतो तेव्हा त्यावरही आपला ठाम विश्वास असतो. कानावर वारंवार वेळी-अवेळी रस्त्यावरून धावत असलेल्या रुग्णवाहिकेचा सायरन किंवा पोलिसांच्या शिट्ट्यांचा आवाज पडत असतो अशा अवघड काळात सतत मनात भीतीचे, स्वतःबद्दलच्या शंकेचे विचार घोळत राहणे स्वाभाविक आहे; पण त्याचा काय परिणाम होतो? तर, ती भीती किंवा काळजी आपल्याला आवडली आहे आणि म्हणून ती सारखी आपल्या मनात आहे असा आपल्या आंतरिक शक्तीचा गैरसमज होतो; आणि आपले शरीर मग तसेच प्रतिसाद द्यायला लागते. स्वतःच्या क्षमतेविषयी, आरोग्याविषयी मनात शंका निर्माण होऊ लागतात आणि त्यांना थारा दिला तर त्या प्रत्यक्षात आपली प्रकृती बिघडवूपण शकतात.

शब्दांचे एक सामर्थ्यही आहे आणि ते म्हणजे, ते वारंवार ऐकल्यामुळे किंवा उच्चारल्यामुळे आपल्या मनात विश्वासही निर्माण करीत असतात. विशेषतः ज्याच्या शब्दांवर किंवा शाब्दिक विचारांवर आपली श्रद्धा आहे ते आपल्यावर चांगला परिणामही करू शकतात. भारतीय योगशास्त्रात एक अतिशय प्रभावी उपाय सुचविला आहे आणि तो म्हणजे, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाताना आपल्या श्रद्धा, निष्ठा, क्षमता बळकट करणारा एक प्रभावी युक्तिवाद तयार करून तो वारंवार म्हणत राहायचा-

“मी या अवघड काळात सुदृढ निरोगी राहू शकतो. याला तोंड देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे!” असा काहीसा युक्तिवाद किंवा स्वसंवाद आपल्याला सध्याच्या काळात वापरता येईल.

- सतत मनात प्रबळ असणारा हा युक्तिवाद म्हणजे आपल्यामधील इच्छाशक्तीची उपासनाच आहे. अर्धी लढाई आपण इथेच जिंकतो. शेवटी, श्रद्धा म्हणजे तरी काय तर कोणतीही गोष्ट स्वतःला पटवून देणे! त्यामुळे कोणते शब्द किंवा वाक्य एखाद्या मंत्राप्रमाणे स्वतःशी म्हणत राहायचे ते नक्की करून ते म्हणत राहिलो तर शरीराकडून हवे ते प्रतिसाद मिळू शकतात..!

अर्थात याला अन्य प्रयत्नांची जोड मात्र द्यायला लागते. ते कोणते? त्याबद्दल पुढील लेखात...

तुम्हीकायकरूशकाल?

1. स्वतःच्या शब्दात स्वतःसाठी एक प्रबळ युक्तिवाद तयार करा.

2. तो तुमचे कपाट/आरसा असा सतत दिसेल असा लावून ठेवा आणि वाचत राहा.

3. ...आणि जाणवणारा फरक टिपून ठेवा.

(ज्येष्ठ पत्रकार आणि अनुवादक)

vratre@gmail.com