शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

जय हिंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 06:05 IST

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करणाऱ्या ‘भारता"च्या आई-वडिलांशी गप्पा

ठळक मुद्देऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी हा खास मानाचा सलाम, चिवट जिद्द आणि जगण्याला भिडण्याची सच्ची कळकळ असणाऱ्या ऑलिम्पिकपटूंना, त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही..!

- मंथन टीम

गावखेड्यातला-छोट्या शहरातला-मध्यमवर्गीय घरातला-नन्नाचा पाढा ऐकतच जगणारा हा ‘भारत’. तो त्याच्याही नकळत पाहू लागतो स्वप्न. ती स्वप्नं ‘जिंकण्याची’ नसतात, ती असतात मनासारखं जगण्याची.

जो खेळ, जी आव्हानं आपल्याला हाका मारतात, आपली रग जिरवतात त्या साऱ्याला भिडायची जिद्द एवढ्याच भांडवलावर सुरू झालेला असतो हा प्रवास..

त्याला ना मोटिव्हेशनल भाषणांचं ग्लॅमर असतं, ना ‘फोकस्ड’ राहून, प्लॅन एबीसीडीची बाराखडी कळलेली असते.

 

तिथं असतं फक्त त्या त्या क्षणातलं जगणं, आहे तो क्षण ‘आपला’ करण्याची साधी-निरागस हाक..

त्या हाकांना ‘ओ’ देणारे हे तरुण. ‘भारतातले’. ते आज ऑलिम्पिकमध्ये ‘इंडिया’चं प्रतिनिधित्व करायला टोक्योत दाखल झाले आहेत..

हा ‘भारत’ तिकडे ‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करायला सज्ज झालेला असताना इकडे त्यांच्या जगण्याचा एक तुकडा, या खेळाडूंचे पालक, भाऊ, प्रशिक्षक हे सारे ‘वर्तमानात’च आहेत. कुणी आजही शेतात राबतं आहे, पावसाळी कामांना वेग आला आहे. कुणी नाकासमोर नोकरीला जातं आहे आणि आपलं लेकरू जिंकून आलं की निदान चार दिवस तरी त्यानं आपल्यापाशी रहावं, त्याला गोडाधोडाचे चार घास करून खाऊ घालावेत या आशेवर लेकराची वाट पाहतं आहे..

ऑलिम्पिक खेळायला गेलेल्या पथकातल्या खेळाडूंची यादी काढून पहा, तुम्हाला हा ‘भारत’ दिसेल. जिथं तीन लेकरांची आई, मणिपूरची मेरी कोम आपली सारी जिद्द एकवटून पुन्हा ऑलिम्पिक पदकावर दावा सांगत भारतीय पथकाचं नेतृत्त्व करणार आहे. मणिपूर ते टोक्यो या प्रवासात तिच्यातली पुन्हा पुन्हा कमबॅक करायला लावणारी आग इम्फाळमधल्या गारढोण कर्फ्युवाल्या अंधाऱ्या रात्रींनी अजूनही कायम ठेवलेली आहे. आणि पाठीशी उभा आहे तिचा नवरा, "तीन मुलांकडे मी पाहतो तू हो पुढे " म्हणणारा..आणि आपण कसे बायकोला ‘सपोर्ट’ करतोय याचं कुठलंही प्रदर्शन कधीच न मांडणारा !

आसामची लव्हलीना बोरगोहीन लॉकडाऊन काळात आईवडिलांसह भातशेतीत राबत होती. आईची तब्येत बिघडली तर दवाखान्याच्या वाऱ्या करत, तिला आराम देत स्वयंपाक करत होती. म्हणाली," प्रॅक्टिस तर करणारच पण आईसाठी भातकालवण रांधते आधी !" तिच्या आईवडिलांना तर आपली बॉक्सर लेक ऑलिम्पिक क्वालिफाय झाली हे माहीत होतं, पण त्यांचं साधं-शांत घर. तिथं ना कसला ‘शो-शा’, ना कसला रुबाब.

- ही अशी कहाणी ऑलिम्पिकला गेलेल्या प्रत्येक खेळाडूची सांगता येईल. पण त्या कहाण्या म्हणजे टीपीकल ‘यशोगाथा’ नव्हेत. नाहीतच. तर त्या आहेत ठेचा लागत, पाय रक्ताळले तरी पुन्हा पुन्हा उभ्या राहत, बोटाला चिंध्या बांधून अपयशाच्या धाग्यातून विणलेल्या कष्टाच्या कहाण्या.

पण फक्त हिरो-हिरॉइन म्हणून या कहाण्या या खेळाडूंच्याच कशा असतील?

त्या त्यांच्या पालकांच्या आहेत, त्यांच्या प्रशिक्षकांच्या, भावाबहिणीच्या, अगदी मदतीला धावणाऱ्या शेजाऱ्यांच्या, प्राथमिक शिक्षकांच्याही आहेत.

महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या पालकांशी म्हणून ‘लोकमत’ने हा खास संवाद साधला..

टीव्ही चॅनल्स आणि पेपरवाल्यांना चमकदार बाइट द्यायला सरावलेले नाहीत हे पालक, ते आजही आपल्या रोजच्या जगण्यातलं रुटीन चालवतात. ना आपल्या लेकरांविषयी फार बोलतात, ना कर्तबगारीविषयी.

त्यांना भेटलो, फोन केले. तर उत्तरं तुटक मिळतात, काय बोलावं कळत नाही सांगतात.. आजवरच्या कष्टांचं भांडवल करत नाही की, आम्ही किती सोसलं हेही सांगत नाहीत.

सांगतात एवढंच की, मुलांनी त्यांची वाट निवडली.. आम्ही सोबत होतो, कधी लांबून पाहिला प्रवास..कधी कमी पडलो, चिडलो-रडलो-भांडलोही.

काही घरांना तर आपल्या मुलानं कुठली स्पर्धा जिंकली, हे ऑलिम्पिक काय फार मोठंसं असतं हेच माहिती नाही, विदेशातल्या स्पर्धेला नेहमीसारखं पोर गेलंय, असंच त्यांना वाटतं आहे. मुलांनी मेडल जिंकून आणावं असं वाटतं, पण त्याचं प्रेशर नाही.. ना अट्टहास.

म्हणून तर ऑलिम्पिकहून परत आल्यावर पहिलं काम काय करणार असं विचारल्यावर एक वडील म्हणाले, खांद्यावर घेऊन गावभर फिरणार त्याला !

- अशी साधी ही माणसं.

ऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी हा खास मानाचा सलाम, चिवट जिद्द आणि जगण्याला भिडण्याची सच्ची कळकळ असणाऱ्या ऑलिम्पिकपटूंना, त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही..!

ऑलिम्पिकमध्ये एक्सलन्स, आणि तिथं पदक जिंकणं म्हणजे एक्सलन्समधलं परफेक्शन. त्याहीपलीकडे जात जगण्यावर आणि मानवी क्षमतांवरच्या अखंड विश्वासाचं प्रतीक..म्हणजे ऑलिम्पिक !

‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करणाऱ्या ‘भारता"चं रूप तरी याहून वेगळं काय आहे?

त्यांना शुभेच्छा !

जय हिंद !