शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

जय हिंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 06:05 IST

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करणाऱ्या ‘भारता"च्या आई-वडिलांशी गप्पा

ठळक मुद्देऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी हा खास मानाचा सलाम, चिवट जिद्द आणि जगण्याला भिडण्याची सच्ची कळकळ असणाऱ्या ऑलिम्पिकपटूंना, त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही..!

- मंथन टीम

गावखेड्यातला-छोट्या शहरातला-मध्यमवर्गीय घरातला-नन्नाचा पाढा ऐकतच जगणारा हा ‘भारत’. तो त्याच्याही नकळत पाहू लागतो स्वप्न. ती स्वप्नं ‘जिंकण्याची’ नसतात, ती असतात मनासारखं जगण्याची.

जो खेळ, जी आव्हानं आपल्याला हाका मारतात, आपली रग जिरवतात त्या साऱ्याला भिडायची जिद्द एवढ्याच भांडवलावर सुरू झालेला असतो हा प्रवास..

त्याला ना मोटिव्हेशनल भाषणांचं ग्लॅमर असतं, ना ‘फोकस्ड’ राहून, प्लॅन एबीसीडीची बाराखडी कळलेली असते.

 

तिथं असतं फक्त त्या त्या क्षणातलं जगणं, आहे तो क्षण ‘आपला’ करण्याची साधी-निरागस हाक..

त्या हाकांना ‘ओ’ देणारे हे तरुण. ‘भारतातले’. ते आज ऑलिम्पिकमध्ये ‘इंडिया’चं प्रतिनिधित्व करायला टोक्योत दाखल झाले आहेत..

हा ‘भारत’ तिकडे ‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करायला सज्ज झालेला असताना इकडे त्यांच्या जगण्याचा एक तुकडा, या खेळाडूंचे पालक, भाऊ, प्रशिक्षक हे सारे ‘वर्तमानात’च आहेत. कुणी आजही शेतात राबतं आहे, पावसाळी कामांना वेग आला आहे. कुणी नाकासमोर नोकरीला जातं आहे आणि आपलं लेकरू जिंकून आलं की निदान चार दिवस तरी त्यानं आपल्यापाशी रहावं, त्याला गोडाधोडाचे चार घास करून खाऊ घालावेत या आशेवर लेकराची वाट पाहतं आहे..

ऑलिम्पिक खेळायला गेलेल्या पथकातल्या खेळाडूंची यादी काढून पहा, तुम्हाला हा ‘भारत’ दिसेल. जिथं तीन लेकरांची आई, मणिपूरची मेरी कोम आपली सारी जिद्द एकवटून पुन्हा ऑलिम्पिक पदकावर दावा सांगत भारतीय पथकाचं नेतृत्त्व करणार आहे. मणिपूर ते टोक्यो या प्रवासात तिच्यातली पुन्हा पुन्हा कमबॅक करायला लावणारी आग इम्फाळमधल्या गारढोण कर्फ्युवाल्या अंधाऱ्या रात्रींनी अजूनही कायम ठेवलेली आहे. आणि पाठीशी उभा आहे तिचा नवरा, "तीन मुलांकडे मी पाहतो तू हो पुढे " म्हणणारा..आणि आपण कसे बायकोला ‘सपोर्ट’ करतोय याचं कुठलंही प्रदर्शन कधीच न मांडणारा !

आसामची लव्हलीना बोरगोहीन लॉकडाऊन काळात आईवडिलांसह भातशेतीत राबत होती. आईची तब्येत बिघडली तर दवाखान्याच्या वाऱ्या करत, तिला आराम देत स्वयंपाक करत होती. म्हणाली," प्रॅक्टिस तर करणारच पण आईसाठी भातकालवण रांधते आधी !" तिच्या आईवडिलांना तर आपली बॉक्सर लेक ऑलिम्पिक क्वालिफाय झाली हे माहीत होतं, पण त्यांचं साधं-शांत घर. तिथं ना कसला ‘शो-शा’, ना कसला रुबाब.

- ही अशी कहाणी ऑलिम्पिकला गेलेल्या प्रत्येक खेळाडूची सांगता येईल. पण त्या कहाण्या म्हणजे टीपीकल ‘यशोगाथा’ नव्हेत. नाहीतच. तर त्या आहेत ठेचा लागत, पाय रक्ताळले तरी पुन्हा पुन्हा उभ्या राहत, बोटाला चिंध्या बांधून अपयशाच्या धाग्यातून विणलेल्या कष्टाच्या कहाण्या.

पण फक्त हिरो-हिरॉइन म्हणून या कहाण्या या खेळाडूंच्याच कशा असतील?

त्या त्यांच्या पालकांच्या आहेत, त्यांच्या प्रशिक्षकांच्या, भावाबहिणीच्या, अगदी मदतीला धावणाऱ्या शेजाऱ्यांच्या, प्राथमिक शिक्षकांच्याही आहेत.

महाराष्ट्रातून ऑलिम्पिक पात्र ठरलेल्या खेळाडूंच्या पालकांशी म्हणून ‘लोकमत’ने हा खास संवाद साधला..

टीव्ही चॅनल्स आणि पेपरवाल्यांना चमकदार बाइट द्यायला सरावलेले नाहीत हे पालक, ते आजही आपल्या रोजच्या जगण्यातलं रुटीन चालवतात. ना आपल्या लेकरांविषयी फार बोलतात, ना कर्तबगारीविषयी.

त्यांना भेटलो, फोन केले. तर उत्तरं तुटक मिळतात, काय बोलावं कळत नाही सांगतात.. आजवरच्या कष्टांचं भांडवल करत नाही की, आम्ही किती सोसलं हेही सांगत नाहीत.

सांगतात एवढंच की, मुलांनी त्यांची वाट निवडली.. आम्ही सोबत होतो, कधी लांबून पाहिला प्रवास..कधी कमी पडलो, चिडलो-रडलो-भांडलोही.

काही घरांना तर आपल्या मुलानं कुठली स्पर्धा जिंकली, हे ऑलिम्पिक काय फार मोठंसं असतं हेच माहिती नाही, विदेशातल्या स्पर्धेला नेहमीसारखं पोर गेलंय, असंच त्यांना वाटतं आहे. मुलांनी मेडल जिंकून आणावं असं वाटतं, पण त्याचं प्रेशर नाही.. ना अट्टहास.

म्हणून तर ऑलिम्पिकहून परत आल्यावर पहिलं काम काय करणार असं विचारल्यावर एक वडील म्हणाले, खांद्यावर घेऊन गावभर फिरणार त्याला !

- अशी साधी ही माणसं.

ऑलिम्पिक स्पर्धा प्रत्यक्ष सुरू होण्यापूर्वी हा खास मानाचा सलाम, चिवट जिद्द आणि जगण्याला भिडण्याची सच्ची कळकळ असणाऱ्या ऑलिम्पिकपटूंना, त्यांच्या पालकांना आणि प्रशिक्षकांनाही..!

ऑलिम्पिकमध्ये एक्सलन्स, आणि तिथं पदक जिंकणं म्हणजे एक्सलन्समधलं परफेक्शन. त्याहीपलीकडे जात जगण्यावर आणि मानवी क्षमतांवरच्या अखंड विश्वासाचं प्रतीक..म्हणजे ऑलिम्पिक !

‘इंडिया’ला रिप्रेझेण्ट करणाऱ्या ‘भारता"चं रूप तरी याहून वेगळं काय आहे?

त्यांना शुभेच्छा !

जय हिंद !