शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

‘मी टू’ मोहीम सफल व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 15:53 IST

समाजातील विकृत जीव अनेकांच्या चारित्र्यावर, शीलावर घाला घालतात.

समाजातील विकृत जीव अनेकांच्या चारित्र्यावर, शीलावर घाला घालतात. त्याचे परिणाम मनावर आघात करून जातात. हे मनावरचं मळभ दूर करण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘मी टू’ मोहीम सफल व्हावी. गैरफायदा घेणाऱ्यांना जागीच रोखलं जावं. हे कितपत सफल होईल सांगता येत नाही.देशभरात ‘मी टू’ या मोहिमेचा जोर वाढत असताना या मोहिमेअंतर्गत कोणी ना कोणी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडत आहे. ही यादी दिवसेंदिवस वाढत चालली असून मोठ-मोठी नावे समोर येत आहेत. त्याची सत्यता पडताळणे ही एक न्यायदेवतेला आव्हानात्मक बाब आहे. त्यांची शहानिशा होईल तेव्हा होईल. पण, मी एका ग्रामीण भागात वाढलेली. त्यामुळे सेलिब्रिटी किंवा नामवंतांपेक्षा ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या अन्यायाला वाचा फुटेल का? हा मला पडलेला प्रश्न आहे.याच कारणही तसेच आहे. तीस वर्षांपूर्वीच माझं बालपण एका खेडेगावात गेले. म्हणजे त्यावळी पोलीस स्टेशन, पत्रकार अशी एखादी संघटना होती. सोशल मीडिया या खूप दूरच्या गोष्टी होत्या. गावच्या पंचांनीच न्यायनिवाडा करून गावातच त्या वादाचा सोक्षमोक्ष लावायचा. गाव प्रमुखांकडे या तक्रारी पहिल्यांदा जायच्या. गावचे सरपंच, पोलीस पाटील व अन्य पंच मंडळी ही सर्व कामे पहायची. मी पाच, सहा वर्षे वयाची असताना अशा तक्रारी आलेल्या मी पाहिल्या होत्या. पण त्यावेळी हे समजत नसायचे. वाढत्या वयाबरोबरच हे सर्व समजत गेलं. या गोष्टी ऐकून मनात भीतीनं घर केलं ते वेगळंच. सासºयाने सुनेचा छळ केला किंवा नवºयाचा भाऊ (दीर) आपल्याला छळत आहे. शेतमजूर महिलांसोबत शेतमालकाने असभ्य वर्तन केल्याची तक्रार, अशा अनेक तक्रारी मी त्यावेळी ऐकल्या आहेत. जुन्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती. त्याचे फायदे तर खूप, पण अशा घटना घडलेले एखादं कुटुंब अपवादात्मक सापडायचं. मात्र त्या पीडितांना समाधानकारक न्याय मिळत नसायचा. आपला बाप किंवा भाऊ असे वागूच शकत नाही, हे त्या धिटाईने पुढे आलेल्या पीडितेचा पतीच सांगायचा. कारण तिने केलेल्या तक्रारी खोट्या आहेत हे तोच पटवून द्यायचा. त्यामुळे न्यायाला काही आधारच राहत नसे. तिची मात्र कुणीच साथ न दिल्याने तिची कुचंबना व्हायची. आई-वडिलांच्या नावासाठी आणि सासरची अब्रू सांभाळण्यासाठी तिला तो त्रास सहन करून सासरीच रहावं लागायचं.गावात एक इसम असा होता की, तो लहान मुलींना पकडून ठेवायचा. त्यांच्या मागे धावायचं, एव्हढेच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसात अंगणात ओट्यावर-ओसरीवर आपल्या कुटुंबासोबत निजलेल्या बायकांंची छेड काढायचा. यामुळे कित्येक वेळा त्याने मार देखील खाल्ला.पण नंतर बायका मात्र भयानं अंगणात झोपत नसायच्या. तो हे कृत्य दारूच्या नशेत करायचा. मला तर वाटायचं हे कृत्य करण्यासाठीच तो नशा करायचा. अशा विकृतीस काय म्हणावं ..? त्या महिला अशिक्षित होत्या, अडाणी होत्या, पावित्र्य काय असतं हे त्यांना समजतंं होतं.एक नवविवाहिता तक्रार घेऊन आली. लग्नानंतर थोड्या दिवसात तिला तिची फसवणूक झाल्याचे समजले. तिचा पती कधीच पिता होऊ शकत नाही. हे त्याच्या आई-वडील व घरातील बहुतेक मंडळींना माहित असताना देखील तिचा विवाह लावून देण्यात आला. असे असताना देखील ती बाई पतीच्या नावाखातर नांदायला तयार झाली. पण घरच्या मंडळींची वेगळीच मागणी होती. त्यांचा वंश चालावा म्हणून त्या बाईनं दुसºया कोण्या पुरुषापासून मूल जन्माला घालावं. त्या नवविवाहितेची काय अवस्था असेल? त्यासाठी तिला सारे कुटुंब छळत होते. बरं त्यावेळी ‘टेस्ट ट्यूब बेबी’ किंवा आजच्यासारखं मेडिकल सायन्सची प्रगती नव्हती. झालीच असेल तर ती खेड्यापर्यंत पोहोचलीच नव्हती. त्या बाईनं काय करायचं? तिनं नवराच सोडला व सरळ माहेर धरलं. अशा धाडसी बायका क्वचितच होत्या.खरं तर आजच्या समस्या देखील खूप भयावह आणि मनाला, विचारांना, भावनेला सुन्न करणाºया आहेत. रोजच आपण भयानक, हिंसक बातम्या ऐकतो, वाचतो, बघतो. नवी जखम भळभळत असताना जुन्या जखमांवरच्या खपल्या काढण्याला अर्थ आहे का? हा एक स्वतंत्र विषय आहे. समाजातील विकृत जीव अनेकांच्या चारित्र्यावर, शीलावर घाला घालतात. त्याचे परिणाम मनावर आघात करून जातात. हे मनावरचं मळभ दूर करण्यासाठी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ‘मी टू’ मोहीम सफल व्हावी. गैरफायदा घेणाºयांना जागीच रोखलं जावं. हे कितपत सफल होईल सांगता येत नाही. पण त्यातून निव्वळ सत्य आणि सत्यच समोर यावं असं वाटतं.वंदना लगड

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर