शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

गांधीजींना इतिहासात ढकलून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 06:45 IST

गांधीजींनाही इतिहासात ढकलून देऊन आपण मोकळे झालो आहोत; पण हाच एक माणूस असा आहे, ज्याचे विचार आपल्या जगण्याला दिशा देऊ शकतात. 

- मधुकर राणे,  यवतमाळ

सर्वधर्मसमभाव किंवा ‘विविधतेत एकता’ असे शब्द आपण अगदी सहजपणे वापरतो, त्याचा गवगवाही करतो, प्रत्यक्षात किती लोकांच्या प्रत्यक्ष आचरणात ही कृती दिसते. आजकाल तर धर्मांच्या अस्मिता कधी नव्हे इतक्या टोकदार झाल्या आहेत. प्रत्येक जण म्हणतो, आमचाच धर्म  श्रेष्ठ आणि इतर धर्मीयांना कस्पटासमान लेखतो. जाती-धर्मीयांमधील इतकी कटुता पूर्वी कधी नव्हती इतक्या तीव्रतेनं ती आता दिसते आहे. कुठे चाललो आहोत आपण? गांधीजींनाही इतिहासात ढकलून देऊन आपण मोकळे झालो आहोत; पण हाच एक माणूस असा आहे, ज्याचे विचार आपल्या जगण्याला दिशा देऊ शकतात. 

लोकमतच्या 30 सप्टेंबरच्या ‘मंथन’ पुरवणीत सुरेश द्वादशीवार यांनी गांधीजींच्या धार्मिक पैलूंचं अतिशय सुंदर विवेचन केलं आहे.

गांधीजी स्वत:ला सनातन हिंदू म्हणवून घेत असले तरी त्यांचा विचार आणि त्यांचं आचरण वैश्विक होतं. एकाच वेळी ते हिंदू होते, मुस्लीम होते, ख्रिश्चन होते. खरं तर कुठल्याही धर्मात मावणार नाही असं त्यांचं आचरण होतं.महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं म्हटलं जातं, ते खरंच आहे; पण त्यांनी भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगालाच जगायचं कसं हे शिकवलं.

जगातल्या सर्व धर्मांना कवेत घेऊ शकणारा आणखी एक मोठा धर्म त्यांच्याकडे होता, तो म्हणजे मानवता. त्याच्या याच मानवतेमुळे ते जगाला कवेत घेऊ शकले. 

जगातले सर्वधर्म मानवजातीच्या कल्याणाचे स्वप्न सांगत आले, तरी त्यांच्या अंगभूत मर्यादा होत्या, आहेत आणि त्यामुळेच त्या त्या धर्माची शिकवण फक्त त्यांच्या अनुयायांपुरतीच मर्यादित राहिली, हे लेखकाचं निरीक्षण अत्यंत अचूक आणि अभ्यासपूर्ण आहे.

कोणत्याच धर्माचा इतिहास वाखाणण्याजोगा नाही, हे लेखकाचं विधान अनेकांना धक्कादायक वाटेल; पण ती वस्तुस्थिती आहे आणि लेखकानं ते उत्तम पटवूनही दिलं आहे.