शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

गांधीजींना इतिहासात ढकलून कसं चालेल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 06:45 IST

गांधीजींनाही इतिहासात ढकलून देऊन आपण मोकळे झालो आहोत; पण हाच एक माणूस असा आहे, ज्याचे विचार आपल्या जगण्याला दिशा देऊ शकतात. 

- मधुकर राणे,  यवतमाळ

सर्वधर्मसमभाव किंवा ‘विविधतेत एकता’ असे शब्द आपण अगदी सहजपणे वापरतो, त्याचा गवगवाही करतो, प्रत्यक्षात किती लोकांच्या प्रत्यक्ष आचरणात ही कृती दिसते. आजकाल तर धर्मांच्या अस्मिता कधी नव्हे इतक्या टोकदार झाल्या आहेत. प्रत्येक जण म्हणतो, आमचाच धर्म  श्रेष्ठ आणि इतर धर्मीयांना कस्पटासमान लेखतो. जाती-धर्मीयांमधील इतकी कटुता पूर्वी कधी नव्हती इतक्या तीव्रतेनं ती आता दिसते आहे. कुठे चाललो आहोत आपण? गांधीजींनाही इतिहासात ढकलून देऊन आपण मोकळे झालो आहोत; पण हाच एक माणूस असा आहे, ज्याचे विचार आपल्या जगण्याला दिशा देऊ शकतात. 

लोकमतच्या 30 सप्टेंबरच्या ‘मंथन’ पुरवणीत सुरेश द्वादशीवार यांनी गांधीजींच्या धार्मिक पैलूंचं अतिशय सुंदर विवेचन केलं आहे.

गांधीजी स्वत:ला सनातन हिंदू म्हणवून घेत असले तरी त्यांचा विचार आणि त्यांचं आचरण वैश्विक होतं. एकाच वेळी ते हिंदू होते, मुस्लीम होते, ख्रिश्चन होते. खरं तर कुठल्याही धर्मात मावणार नाही असं त्यांचं आचरण होतं.महात्मा गांधींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं असं म्हटलं जातं, ते खरंच आहे; पण त्यांनी भारतीयांनाच नाही तर संपूर्ण जगालाच जगायचं कसं हे शिकवलं.

जगातल्या सर्व धर्मांना कवेत घेऊ शकणारा आणखी एक मोठा धर्म त्यांच्याकडे होता, तो म्हणजे मानवता. त्याच्या याच मानवतेमुळे ते जगाला कवेत घेऊ शकले. 

जगातले सर्वधर्म मानवजातीच्या कल्याणाचे स्वप्न सांगत आले, तरी त्यांच्या अंगभूत मर्यादा होत्या, आहेत आणि त्यामुळेच त्या त्या धर्माची शिकवण फक्त त्यांच्या अनुयायांपुरतीच मर्यादित राहिली, हे लेखकाचं निरीक्षण अत्यंत अचूक आणि अभ्यासपूर्ण आहे.

कोणत्याच धर्माचा इतिहास वाखाणण्याजोगा नाही, हे लेखकाचं विधान अनेकांना धक्कादायक वाटेल; पण ती वस्तुस्थिती आहे आणि लेखकानं ते उत्तम पटवूनही दिलं आहे.