शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

जात जाता जाता परत कशी आली?

By admin | Updated: January 9, 2016 14:38 IST

रामजन्मभूमीच्या वादानंतर हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला. नंतरच्या दहाएक वर्षात मात्र धर्मापेक्षाही अधिक ध्रुवीकरण जातींच्या मुद्दय़ावर होऊ लागलं. हल्ली तर ग्रामीण भागात प्रत्येक जातीची निदान एखादी संघटना नक्कीच असते. काय हवं असतं या संघटनांना? काय प्रेरणा असतात यांच्या? समतेचा विचार यात कुठे असतो का? - या प्रश्नांची उत्तरं ‘माणूस हीच जात’ मानणा:यांना हताश करणारी आहेत.

- बालाजी सुतार
 
गर्व आहे अमुकढमुक असल्याचा!’ किंवा ‘भगवं, पिवळं, निळं वादळ!’ यापैकी काहीतरी लिहिलेलं असतं. नसेल तर कुणा महापुरु षाचा, नेत्याचा फोटो असतो. रस्त्यावरून गेलेल्या दहा गाडय़ांपैकी निदान पाचांवर हे असतं. पायी चालणा:या कुणाकुणाच्या गळ्यात भडक रंगीत गमजे दिसतात. कपाळावर नाम दिसतो. मनगटांवर बांधलेल्या धाग्यांचे रंगसुद्धा काही निश्चित निर्देश करणारे.  चोळणो, टोप्या घातलेली, दाढय़ा कोरलेली माणसं दिसतात. रस्त्यांवर जातनिहाय संघटनांच्या पाटय़ा, जातवार महापुरुषांच्या नावांचे चौक दिसतात.
जागतिकीकरण आणि बाजारीकरणाची अवाढव्य चाकं निर्दयपणो फिरत असताना, अवघ्या जगाचे व्यवहार रोकडय़ा अर्थकारणाशी निगडित असताना, समकालीन प्रश्न टाळून विपरीत दिशेने जगाचा प्रवास घडवणा:या मध्ययुगीन विचारधाराही जोमाने सशक्त होताना दिसत आहेत.     
ग्रामीण जातवास्तवाचा शोध घेताना भोवताल हा असा चिरफाळलेला दिसतो. 
अवघ्या पंधरा-वीस वर्षांपूर्वी हा जातीय विखार एवढा तीव्र नव्हता. खरंतर दलित-सवर्णांमधला झगडा तेव्हाही उघडपणो होता. दलित अस्मिता जोरकसपणो गावकुसाला धडका मारत होत्या. पण हजारो वर्षांपासून कोंडलेल्या अभिसरणाच्या प्रक्रियेतला अपरिहार्य संघर्षाचा सुरु वातीचा काळ म्हणून या झगडय़ाकडे समजुतीने पाहता येणं शक्य होतं. गावात जात-धर्मनिहाय गल्ल्या असत. जातभावनाही मनात पक्क्या असत; पण जातीवरून उघड संघर्ष झालेला कधी पाहण्यात नव्हता. आज गावांमध्ये हे चित्र नाही.
खोलात गेलो तर लक्षात येतं की रामजन्मभूमीच्या वादानंतर हिंदू-मुस्लीम अशा धार्मिक ध्रुवीकरणाला वेग आला. नंतरच्या दहाएक वर्षांत मात्र धर्मापेक्षाही अधिक ध्रुवीकरण जातींच्या मुद्दय़ावर होऊ लागल्याचं दिसत गेलं आणि आता जाती-जातींतले तणाव अधिक स्पष्टपणो समोर येताना दिसत आहेत. 
हे असं का झालं? कारणं मुख्यत: राजकीय आणि आर्थिक आहेत. मागच्या पंधरावीस वर्षांमध्ये जातीवर बेतलेल्या गलिच्छ राजकारणाने प्रचंड वेग घेतलेला आहे. संख्याबळाने अगदीच छोटय़ा असलेल्या जातींचेही सोशिओ-पोलिटिकल अभिनिवेश उग्र झालेले दिसत आहेत. राजकीय सत्ताकांक्षी जातवार पुढा:यांनी जातीय अस्मितांचे धोकादायक वणवे पेटवून ते कायम धुमसते ठेवले आहेत. आपापल्या जातींचे ऐतिहासिक महापुरु ष शोधून, त्यांना वर्तमानात अधिष्ठित करून, त्या छत्रखाली द्वेषाचं रान उठवलं जात आहे. ‘जातींच्या पारंपरिक उतरंडीत आपल्या ‘वर’ असलेल्या जातींनी आपल्या जातीवर अन्याय केलेला आहे’ किंवा ‘या उतरंडीत ‘वर’ राहणं हा आपला हक्कच आहे’ हे युवाशक्ती नामक आक्रमक ताकदीच्या मनावर ठसवून, त्या उपद्रवशक्तीच्या बळावर सत्तेतलं एखादं कुरण आपल्यासाठी राखीव करून घेण्याची स्वप्नं पाहिली जातात. या कुरणातलं एखादं झुडूप आपल्याही वाटय़ाला येईल अशा आशेने तरुणांच्या झुंडी यात सामील होतात.
आर्थिक कारणांत पहिलं कारण उद्ध्वस्त झालेली कृषिव्यवस्था. शेतीचं अर्थकारण दिवसेंदिवस बिकट होत आहे. ‘व्यवसाय’ म्हणावं असं शेतीत काहीही उरलेलं नाही. पारंपरिक शेतीव्यवस्था जातिव्यवस्थेशी निगडित होती. अठरापगड जातींच्या मदतीशिवाय शेती करता येणं अशक्य होतं. जातींमध्ये शोषण होतं पण स्वार्थापोटी का होईना, जातीय सौहार्द टिकवून ठेवणंही गरजेचंच होतं. आता शेतीच उद्ध्वस्त झाल्यामुळे आणि शेतीशी पूरक व्यवसायही छोटय़ा लोकांच्या हातून निसटल्यामुळे ‘जात’ म्हणून एकमेकांना एकमेकांची गरज उरलेली नाही. शेतीची दुरवस्था आणि आर्थिक उत्पन्नाच्या पर्यायी व्यवस्थेच्या अभावामुळे वैफल्यग्रस्त तरु णांना वैयक्तिक, सामाजिक, राजकीय लाभाच्या आशेने जात जवळ करावी लागते. 
 ग्रामीण भागात मुळातच पांढरपेशा रोजगाराच्या संधी फार कमी असतात. मटक्याचा आकडा लागावा तशा पद्धतीने क्वचित एखाद्याला बरी सरकारी नोकरी मिळून जाते. इतरांना साखर कारखाने, खासगी शिक्षण संस्था किंवा असल्याच कशात ‘चिकटवून घेतील’ अशा आशेने या-त्या पुढा:याच्या मागे हिंडावं लागतं. उमेद खच्ची करणा:या या काळोख्या वातावरणातही ङिांग चढवू शकेलशी सहज उपलब्ध गोष्ट असते ती जात. जातींचे अभिमान. स्वतंत्र ओळख निर्माण करणं शक्य नसतं तेव्हा ‘जात’ हीच एक ओळख होऊन बसते. आपली जात, आपले पूर्वज कुणीतरी ‘लै भारी’, मग आपणही तसेच भारी. किंवा, आपल्या जातीला या या जातीच्या लोकांनी त्रस दिला, आपली जात खालची मानली याचे गंड, त्यातून उफाळणारा त्वेष, वर्चस्वाची किंवा सुडाची भावना यांनी आपल्या सामाजिकतेचा मोठाच अवकाश व्यापलेला आहे. परिणामी जातींच्या अनेक संघटना जोमाने परस्परविरोधात आक्र मक होताना दिसत आहेत. 
जातींचे, ‘पूर्व दिव्याचे’ अभिमान तीव्र झाले की, ‘आज’च्या समस्यांना बगल देता येते. कालबाह्य प्रश्नांची भुतं जागवली, भगव्या, निळ्या, हिरव्या रक्ताची नशा चढली की लौकिक प्रश्न किरकोळ वाटायला लागतात. आपण ‘अमुकचे वारस’ आहोत, इतरांहून श्रेष्ठ आहोत असल्या गोष्टींची भूल पडते. जातीय दंडशक्तीने इतरांना धाकात ठेवता येतं. अहं सुखावला जातो. धूसर सीमारेषा ओलांडून अस्मितांचं रूपांतर माजात केव्हा होतं तेही उमगत नाही. जातींच्या संघटना किंवा राजकीय पक्ष याला हवा देत राहतात. 
चौफेर कोंडी झालेल्या तरु णाईला इकडे खेचणं सोपं असतं. 
‘एकमय समाजाची निर्मिती’ हे महात्मा फुल्यांचं स्वप्न सव्वाशे वर्षांनंतरही अपूर्ण आहे आणि आपण उठता बसता फुले-शाहू-आंबेडकरांचं नाव उच्चारत असतो. आपल्या ढोंगीपणाचीही कमाल आहे. जातीधर्माचा उल्लेख न करताही मोकळेपणाने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण झाल्याखेरीज काही बदल होईल अशी आशा नाही. तोपर्यंत जाती-धर्माचे हे टोकदार भाले या अवकाशाला असेच भोसकत राहणार, हे आजचं दुर्दैवी वास्तव आहे.
 
ग्रामीण भागात जातीच्या
भाल्यांना धार का आली?
1 खेडय़ापाडय़ातली अर्धीअधिक तरु ण लोकसंख्या कायमच ‘बेकार’ हे विशेषण धारण करून जगते आहे. निरु पयोगी शिक्षणव्यवस्थेतून बाहेर पडलेल्या ग्रामीण तरुणांना अर्थकेंद्री जगाचा वेग पेलवत नाही, किंबहुना त्यासाठी आवश्यक कौशल्यंच त्यांच्याकडे नसतात.
2  सुखवस्तू जगण्याची आस असते, पैसाही हवा असतो. नोकरीधंदा नसताना पैसा मिळवणं ही गोष्ट राजकारणात शक्य होईल असं अनेकांना वाटतं. जातींच्या संघटनेत प्रवेश करणं हे राजकारणाचं एक प्रवेशद्वार मानलं जातं. पण राजकारणात पाय रोवणं सगळ्यांनाच शक्य नसतं. मग छोटे स्वार्थ वर येतात. संघटनेच्या रेटय़ाने काही आरक्षणासारखे लाभ मिळाले तर दैनंदिन जगणं सोपं होईल अशी आशा जागृत होते. 
3 आरक्षणाच्या मुद्दय़ावर बेकारांच्या फौजा झटकन एकत्र येतात. 
त्यामुळे जवळजवळ सगळ्याच जातींचे लोक आता आरक्षणाच्या मागण्या करू लागल्याचं दिसतं आहे.
 
(लेखक बदलत्या ग्रामीण जीवनाचे 
अभ्यासक आहेत.)
 
majhegaane@gmail.com