शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

इतिहासाचे भीष्माचार्य

By admin | Updated: August 2, 2014 14:38 IST

इतिहास संशोधनाला कसलीही प्रतिष्ठा नव्हती त्या काळात जाणीवपूर्वक या विषयाला वाहून घेणार्‍यांमध्ये डॉ. ब्रह्मनंद देशपांडे अग्रणी होते. येत्या ६ ऑगस्ट रोजी त्यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त केलेले त्यांच्या कामाचे स्मरण..

 किरण देशमुख

 
अनमोल इतिहास बोलका करण्याचे कार्य नि:पक्षपातीपणे करणार्‍या इतिहासकारांत ज्येष्ठ संशोधक, गुरुवर्य डॉ. ब्रह्मनंद देशपांडे यांचा समावेश आवर्जून करावा लागतो. त्यांचा जन्म दि. १३ जून १९४0 रोजी, विदर्भातील रिसोड (जि. वाशिम) येथे वतनदार कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि चिकित्सक होते. 
विद्याधनं सर्वधनप्रधानम्’ हे डॉ. देशपांडे यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी इतिहासातील ‘डॉक्टरेट’ (१९९६) व डी.लिट. (२00२) या सवरेत्तम पदव्या नागपूर विद्यापीठातून प्राप्त केल्या. पण पदे वा पदव्या यांच्या सहवासात गुरुवर्य कधीच रमले नाहीत. स्वत:च्या प्रकांड पांडित्यातून दि गुप्ता अँडमिनिस्ट्रेशन, देवगिरीचे यादव, शोधमुद्रा- खंड १ ते ६, चक्रपाणी, शब्दवेध, सप्तपर्णी, मयूरपंख, स्टडीज् इन इपिग्राफी खंड १, अजिंठा, वेरुळ, दौलताबाद इत्यादी उत्तमोत्तम दज्रेदार ग्रंथ लिहून ‘इतिहासाचार्य’ हा सन्मान उचित ठरविला. सार्‍या देशाचा, धर्मांचा वा संस्कृतीचा इतिहास, त्यातील अभिलेख, ताम्रपट, नाणी, हस्तलिखिते त्यांना अगदी मुखोद्गत असत. एखाद्या विषयावरील सरांचे भाष्य वा भाषण अचूक संदर्भासह विस्तृत असे. विषयाची जाण आणि वेळेचे भान ठेवूनच ते बोलत असत. 
 प्रतिपाद्य विषयाची सूत्रबद्ध सखोल मांडणी करून, प्रस्थापित विचारांपेक्षा नवीनच मते निर्भिडपणे प्रतिपादन करणे, ही त्यांची वाक्शैली होती. मुद्देसूद विवेचन, पुराव्यांसह सविस्तर विश्लेषण आणि आशयपूर्ण वर्णन करणे ही सरांच्या प्रभावी वक्तृत्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच तर, त्यांची देशाच्या सर्व भागात झालेली व्याख्याने श्रवणीय तसेच, स्मरणीय ठरलीत. 
 इतिहासाशिवाय गुरुवर्यांचा धर्मशास्त्र, वेद-उपनिषदे, तत्त्वज्ञान, संगीतादि अनेक विषयांवर ‘अधिकार’ होता. प्राचीन कला स्थापत्य विशेषत: अजिंठा-वेरुळ, तेथील जगविख्यात ‘कैलास’ लेणे तर, सरांचे ‘जीव की प्राण’च होते. 
  दज्रेदार खुसखुशीत विनोद व शुद्ध कोट्यांची त्यांची वाक्यशैली भारावून टाकणारी होती. एकदा तर, गुरुवर्यांनी फोनद्वारे स्त्री आवाज उच्चारून सौ. देशमुखांच्या मनात माझ्याविषयी काही क्षण ‘संशयकल्लोळ’च निर्माण केला. पण, काही क्षणांतच स्वत:च्या मूळ आवाजात हसतच स्पष्टीकरणही दिले. त्यांचा स्वभाव अत्यंत मिस्कील होता. दुसर्‍याच्याही जीवनात हसू फुलत राहावे, हीच त्यांची खरी भावना होती.  डॉ. देशपांडे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी, छत्तीसगडी इ. भाषांचे उत्तम जाणकार होते. ब्रrी, नागरी, महानुभाविय सकळी सुंदरी इत्यादी लिपींचा त्यांचा अभ्यास उत्कृष्ट होता. 
संशोधनाच्या क्षेत्रात सत्यता, सचोटी, सहकार्य, समन्वय आणि संवाद असावा अशी त्यांची प्रामाणिक भूमिका होती. अर्थात, वैचारिक टीकाकारांविषयी त्यांच्या मनी शत्रुत्वाची भावना कधीच नव्हती. स्वच्छ व प्रामाणिक संशोधनासाठी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असेच त्यांना नेहमी वाटत असे. म्हणूनच, लहानांविषयी वात्सल्य, बरोबरींच्याविषयी स्नेहभाव आणि ज्येष्ठांविषयी आदराची भावना सतत ठेवणार्‍या संशोधक डॉ. ब्रह्मनंद देशपांडे यांच्याविषयी प्रत्येकालाच 
वदनं प्रसाद- सदनं सदयं हृदयं सुधामुचो वाच:! 
करणं परोपकरणं केपांन ते वंद्या:?!!
 असे नेहमीच वाटत राहणार. 
गुरुवर्यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवदन..
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)