शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

इतिहासाचे भीष्माचार्य

By admin | Updated: August 2, 2014 14:38 IST

इतिहास संशोधनाला कसलीही प्रतिष्ठा नव्हती त्या काळात जाणीवपूर्वक या विषयाला वाहून घेणार्‍यांमध्ये डॉ. ब्रह्मनंद देशपांडे अग्रणी होते. येत्या ६ ऑगस्ट रोजी त्यांचा प्रथम स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त केलेले त्यांच्या कामाचे स्मरण..

 किरण देशमुख

 
अनमोल इतिहास बोलका करण्याचे कार्य नि:पक्षपातीपणे करणार्‍या इतिहासकारांत ज्येष्ठ संशोधक, गुरुवर्य डॉ. ब्रह्मनंद देशपांडे यांचा समावेश आवर्जून करावा लागतो. त्यांचा जन्म दि. १३ जून १९४0 रोजी, विदर्भातील रिसोड (जि. वाशिम) येथे वतनदार कुटुंबात झाला. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान आणि चिकित्सक होते. 
विद्याधनं सर्वधनप्रधानम्’ हे डॉ. देशपांडे यांना माहीत होते. म्हणूनच त्यांनी इतिहासातील ‘डॉक्टरेट’ (१९९६) व डी.लिट. (२00२) या सवरेत्तम पदव्या नागपूर विद्यापीठातून प्राप्त केल्या. पण पदे वा पदव्या यांच्या सहवासात गुरुवर्य कधीच रमले नाहीत. स्वत:च्या प्रकांड पांडित्यातून दि गुप्ता अँडमिनिस्ट्रेशन, देवगिरीचे यादव, शोधमुद्रा- खंड १ ते ६, चक्रपाणी, शब्दवेध, सप्तपर्णी, मयूरपंख, स्टडीज् इन इपिग्राफी खंड १, अजिंठा, वेरुळ, दौलताबाद इत्यादी उत्तमोत्तम दज्रेदार ग्रंथ लिहून ‘इतिहासाचार्य’ हा सन्मान उचित ठरविला. सार्‍या देशाचा, धर्मांचा वा संस्कृतीचा इतिहास, त्यातील अभिलेख, ताम्रपट, नाणी, हस्तलिखिते त्यांना अगदी मुखोद्गत असत. एखाद्या विषयावरील सरांचे भाष्य वा भाषण अचूक संदर्भासह विस्तृत असे. विषयाची जाण आणि वेळेचे भान ठेवूनच ते बोलत असत. 
 प्रतिपाद्य विषयाची सूत्रबद्ध सखोल मांडणी करून, प्रस्थापित विचारांपेक्षा नवीनच मते निर्भिडपणे प्रतिपादन करणे, ही त्यांची वाक्शैली होती. मुद्देसूद विवेचन, पुराव्यांसह सविस्तर विश्लेषण आणि आशयपूर्ण वर्णन करणे ही सरांच्या प्रभावी वक्तृत्वाची खास वैशिष्ट्ये होती. त्यामुळेच तर, त्यांची देशाच्या सर्व भागात झालेली व्याख्याने श्रवणीय तसेच, स्मरणीय ठरलीत. 
 इतिहासाशिवाय गुरुवर्यांचा धर्मशास्त्र, वेद-उपनिषदे, तत्त्वज्ञान, संगीतादि अनेक विषयांवर ‘अधिकार’ होता. प्राचीन कला स्थापत्य विशेषत: अजिंठा-वेरुळ, तेथील जगविख्यात ‘कैलास’ लेणे तर, सरांचे ‘जीव की प्राण’च होते. 
  दज्रेदार खुसखुशीत विनोद व शुद्ध कोट्यांची त्यांची वाक्यशैली भारावून टाकणारी होती. एकदा तर, गुरुवर्यांनी फोनद्वारे स्त्री आवाज उच्चारून सौ. देशमुखांच्या मनात माझ्याविषयी काही क्षण ‘संशयकल्लोळ’च निर्माण केला. पण, काही क्षणांतच स्वत:च्या मूळ आवाजात हसतच स्पष्टीकरणही दिले. त्यांचा स्वभाव अत्यंत मिस्कील होता. दुसर्‍याच्याही जीवनात हसू फुलत राहावे, हीच त्यांची खरी भावना होती.  डॉ. देशपांडे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गुजराथी, कन्नड, बंगाली, उर्दू, बुंदेलखंडी, छत्तीसगडी इ. भाषांचे उत्तम जाणकार होते. ब्रrी, नागरी, महानुभाविय सकळी सुंदरी इत्यादी लिपींचा त्यांचा अभ्यास उत्कृष्ट होता. 
संशोधनाच्या क्षेत्रात सत्यता, सचोटी, सहकार्य, समन्वय आणि संवाद असावा अशी त्यांची प्रामाणिक भूमिका होती. अर्थात, वैचारिक टीकाकारांविषयी त्यांच्या मनी शत्रुत्वाची भावना कधीच नव्हती. स्वच्छ व प्रामाणिक संशोधनासाठी ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असेच त्यांना नेहमी वाटत असे. म्हणूनच, लहानांविषयी वात्सल्य, बरोबरींच्याविषयी स्नेहभाव आणि ज्येष्ठांविषयी आदराची भावना सतत ठेवणार्‍या संशोधक डॉ. ब्रह्मनंद देशपांडे यांच्याविषयी प्रत्येकालाच 
वदनं प्रसाद- सदनं सदयं हृदयं सुधामुचो वाच:! 
करणं परोपकरणं केपांन ते वंद्या:?!!
 असे नेहमीच वाटत राहणार. 
गुरुवर्यांच्या पुण्यस्मृतीला विनम्र अभिवदन..
(लेखक इतिहासाचे अभ्यासक आहेत.)