शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आनंद परतणारच..

By admin | Updated: November 29, 2014 14:53 IST

अपेक्षेप्रमाणे नॉर्वेच्या अव्वल मानांकित मॅग्नस कार्लसनने विश्‍वनाथन आनंदला पराभूत करून विश्‍वविजेतेपद राखले. गेल्या वेळी आव्हानवीर म्हणून आलेल्या कार्लसनने विश्‍वविजेतेपदावरची दावेदारी कायम राखली. या वेळची लढत अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होती. चौसष्ट घरांच्या या खेळातील विविध बाजूंचा हा लेखाजोखा..

 पवन देशपांडे

 
'कॅच विन मॅच’ ही क्रिकेटची थिअरी. एखाद्या फलंदाजाचा एक ‘कॅच’ सोडणेही प्रतिस्पर्धी संघाला महाग ठरू शकते; कारण ती संधी गमावणे म्हणजे विजयाची एक संधी दवडण्यासारखेच असते. काही दिवसांपूर्वी रोहित शर्माने २६४ धावांचा विश्‍वविक्रम केला. त्या सामन्यात श्रीलंकन संघाने त्याच्या तीन ‘कॅचेस’ सोडल्या होत्या. कोणत्याही खेळाला ‘कॅच विन मॅच’ ही थिअरी लागू होते. बुद्धिबळातही तेच असते. बुद्धिबळ जगज्जेतेपदाच्या ११ लढतींत हेच दिसून आले.  आनंदने केलेल्या चुका ‘कॅच’ करण्याची एकही संधी कार्लसनने सोडली नाही. दुसरीकडे आनंद मात्र चुका हेरण्यात - ‘कॅच’ करण्यात कमी पडला.
पहिला सामना बरोबरीत सुटला; पण त्यातही आपण मिडल गेममध्ये फारशा चांगल्या चाली रचल्या नसल्याची कबुली आनंदने दिली होती. त्यानंतर दुसराच सामना कार्लसनने जिंकला. याही सामन्यात आनंदने एक ब्लंडर केली आणि ती संधी कार्लसनने सोडली नाही. आनंदने टाकलेल्या वजिराच्या चालीवर त्याने खूप विचार केला आणि सामनाच जिंकला. त्या रात्री आनंद कदाचित झोपला नसावा. आनंदने दुसर्‍या सामन्यातील चूक लगेच सुधारली. त्याने कार्लसनला तिसर्‍याच सामन्यात जमिनीवर आणले. तिसर्‍या सामना हारल्यानंतर कार्लसनने म्हटले होते, ‘‘सामन्याआधी खरं तर मी खूप तयारी केली होती; पण आनंद सरस ठरला.’’ ते खरेच होते. आनंदने केलेला सराव त्या दिवशी कार्लसनवर भारी ठरला. एका प्याद्याभोवतीच हा सामना फिरला. कार्लसनला शेवटपर्यंत बरोबरीही गाठता आली नव्हती. त्यानंतरच्या प्रत्येक सामन्यात कार्लसन खूप नेटाने लढण्याचा प्रयत्न करीत होता. चौथा आणि पाचवा सामना बरोबरीत सुटला; पण सहाव्या सामन्यात आनंदने हातची संधी दवडली. एवढेच नाही, तर तो नंतर घोडचूकही करून बसला. त्याचा फायदा कार्लसनने घेतला आणि एका गुणाने आघाडी घेत सामना जिंकला. काळ्या मोहर्‍या असूनही सहाव्या सामन्यात जिंकण्याची संधी आनंदकडे होती. सामन्यानंतर कार्लसननेही आपण घोडचूक केली होती, अशी कबुली दिली होती; पण आनंदला हे ‘गिफ्ट’ स्वीकारता आले नाही. त्यानंतरचे चार सामने बरोबरीत सुटले. अनेकदा आघाडी घेण्याची संधी हाती येऊनही आनंदला ती हेरता आली नाही. अगदी दहाव्या सामन्यातही आनंदला कार्लसनला पराभूत करून गुणांमध्ये बरोबरी साधण्याची हातची संधी साधता आली नाही. बर्लिन बचावात काळ्या मोहर्‍या घेऊन खेळणे आणि जिंकणे हे तसे अशक्य कोटीतले काम आहे. अकराव्या सामन्यात बर्लिन बचावाने खेळणे आनंदसाठी म्हणूनच फायद्याचे ठरले नाही. शिवाय, त्याने डावाच्या अखेरीस कार्लसनच्या उंटाच्या बदल्यात हत्तीची मारामारी करून मोठी चूक केली. तसे केले नसते, तर कदाचित हा सामना बरोबरीत सुटून जगज्जेतेपदाची अखेरची आणि १२वी लढत ही सर्वांसाठी उत्सुकतेची ठरली असती; पण कार्लसनने अकराव्या लढतीतच आनंदला चूक करण्यास भाग पाडले. 
कार्लसन हा एंडगेमचा बादशाह मानला जातोय. कोणताही डाव अखेरपर्यंत घेऊन जायचा आणि प्रतिस्पध्र्याला आपल्या जाळ्यात अडकवायचे, ही त्याची रणनीती. जगज्जेतेपदाचा अखेरचा सामना पराभूत झाल्यानंतर आनंदनेही हे कबूल केले. गॅरी कॉस्पोरोवच्या मते, कार्लसनचा गेम हा कॉर्पोव आणि बॉबी फिशरसारखा आहे. तो अभिजात खेळतो. तो डावातील ‘पोझिशन’वर विश्‍वास ठेवतो आणि डाव अखेरपर्यंत घेऊन जायला त्याला आवडते. आनंदही २0१२मध्ये एका मुलाखतीत म्हटला होता, ‘कार्लसन खरेच काहीही करू शकतो.’ त्याच्या याच ‘काहीही’ खेळण्याची प्रचिती आनंदला जगज्जेतेपदाच्या गेल्या दोन मालिकांमध्ये आली असेल. 
सोचीमध्ये झालेल्या जगज्जेतेपदासाठीच्या लढतीत कार्लसन पुन्हा एकदा सरस ठरला. विश्‍वविजेतेपद पटकावयाची संधी गेल्यानंतर आनंदला एका पत्रकाराने अनेक भारतीयांच्या मनातील प्रश्न विचारलाच.. ‘आता तू बुद्धिबळ सोडणार का?’ खरे तर खेळाडूच्या बाबतीत असा प्रश्न विचारणो किंवा तसा मनातही येणो गैर.  त्याने एकाच शब्दात उत्तर दिले. ‘नाही.’ आनंदचे हे उत्तर ऐकल्यानंतर सोचीचा ‘तो’ अखेरचा सामना पाहायला आलेल्या सर्वांनी आनंदला ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले, ते उगाच नाही. आनंदचा स्वभाव शांत; पण तो एक बलाढय़ लढवय्या. तो पुन्हा एकदा उभा राहील. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये जगज्जेतेपद गमावल्यानंतर तो उभा राहिला. पुन्हा नव्या दमाने मॅग्नसला झुंज दिली. ती अयशस्वी ठरली असली, तरी आनंद उभा राहील, ही बुद्धिबळ जगातील त्याच्या तमाम चाहत्यांना खात्री आहे. 
(लेखक लोकमत मुंबई आवृत्तीमध्ये 
उपमुख्य उपसंपादक आहेत.)