शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

गढूळ पाण्याचा अर्धा माठ

By admin | Updated: May 17, 2014 20:35 IST

स्वत:च्या ज्ञानाचे उठसूट प्रदर्शन करीत नसतो आणि या अफाट ज्ञानसागरात अजून खूप खोलवर आणि लांबर्पयत जायचे आहे,

 नानं काठोकाठ भरलेला प्रज्ञावंत फळानं भरगच्च झालेल्या वृक्षासारखा असतो- निदान असावा, अशी अपेक्षा असते. फळांनी लगडलेला वृक्ष जसा भूमीला अभिवादन करण्यासाठी झुकतो, म्हणजे नम्रता धारण करतो, तसा ज्ञानी माणूस असतो. त्यासाठीच ‘विद्या विनयेन शोभते’ असे एक संस्कृत सुभाषित आहे. खराखुरा ज्ञानी माणूस स्वत:च्या विद्वत्तेचा गर्व करीत नसतो. तो उन्मत होत नसतो. इतरांना कमी लेखत नसतो. स्वत:च्या ज्ञानाचे उठसूट प्रदर्शन करीत नसतो आणि या अफाट ज्ञानसागरात अजून खूप खोलवर आणि लांबर्पयत जायचे आहे, आपल्या ज्ञानाला खूप मर्यादा आहेत, याची त्याला पदोपदी जाणीव झालेली असते. ज्याला आपल्या अपूर्णतेची जाणीव असते, त्यालाच पूर्णत्वाचा ध्यास लागतो व त्यासाठी आयुष्याचे समर्पण करून तो ज्ञानोपासना करतो. धर्मकारण, समाजकारण, अर्थकारण, इतिहास, भाषा, संस्कृती अशा नाना ज्ञानशाखांची निष्ठेने साधना करणा:या अर्वाचिन तपस्व्यांची फार मोठी परंपरा आपल्यामध्ये होऊन गेली आहे. पण, यांपैकी कोणीही ‘मी सर्वज्ञ आहे आणि इतर बाकीचे अज्ञ आहेत,’ अशी अहंमन्य भाषा वापरल्याचे वाचनात नाही, ऐकण्यात नाही.

आजकाल मात्र याच्या उलटा अनुभव येतो आहे. संशोधन, लेखन, चिंतन आणि प्रबोधन यांमध्ये पावशेर योगदान असले, तरी सव्वाशेराची ऐट मिरविणारी मंडळी खूप भेटतात. यांच्याकडे मौलिक स्वरूपाचे संशोधनही नसते आणि नवविचारांचे धनही नसते. चार संदर्भग्रंथांच्या आधारे चार पानांचे विस्कळीत गाठोडे म्हणजे यांचा शोधनिबंध असतो. असे लेखन करणारी मंडळीही फार कमी आहेत. बाकीची सारी विद्वान मानली जाणारी मंडळी बायको-मुलांचे वाढदिवस साजरे करण्यात, भारी व्याजदराने दिलेल्या कर्जाचा हिशेब ठेवण्यात गर्क झालेली असतात. बिघडलेले हवामान, बिघडलेले राजकारण, बिघडलेला समाज अन् वाया गेलेली तरुण पिढी यांवर ते तावातावाने बोलतात. पण, बिघडलेल्या शिक्षणात माझाही अंशमात्र दोष आहे, हे मानायला ते तयार नसतात. त्यामुळे अशा या चार पानी संशोधकांना आपोआप प्रतिष्ठा मिळते, नव्हे ती ओरबाडून घेतात. ‘बोडक्या बायांत मूठभर केसांची बाई गंगावती’ अशी एक म्हण आहे. ती यांना लागू पडते. फेस समुद्रावर तरंगावा आणि रत्ने तळाशी असावीत, अशी आजची परिस्थिती आहे. थोर तत्त्वचिंतक दलाई लामा यांनी म्हटल्याप्रमाणो ‘पदव्या भरपूर झाल्या, पण ज्ञान आणि शहाणपण दुर्मिळ झाले,’ असेच म्हणावे लागेल.
हे एवढे रडगाणो सांगण्याचे कारण असे, की एका विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रला जाण्याचा योग आला. त्यासाठी त्या विषयातले ब:यापैकी लेखन असलेले आणि ब:यापैकी नाव असलेले चार-पाच मान्यवर आलेले होते. तसा विचार केला, तर त्यांच्या तुलनेत माझी पात्रता आणि माङो योगदान मी स्वत:च कमी मानतो. या चर्चासत्रला आसपासची बरीच अभ्यासू प्राध्यापक मंडळी आली होती. चहापानावेळी,  जेवताना, रात्री शिळोप्याच्या गप्पा मारताना आमच्या बैठकीत असलेला एक तरुण प्राध्यापक मला जरा उथळ आणि बोलण्याचा विवेक नसलेला वाटला. आधी त्याने या निमंत्रित मान्यवरांच्या भाषणावर वेडीवाकडी टीका केली. ‘त्यांच्या भाषणात दम नव्हता. यांच्या भाषणात काही राम नव्हता.  त्यांचे भाषण केवळ पाल्हाळिक बडबड वाटली. यांचे भाषण शुद्ध वेळखाऊ झाले,’ अशी त्याची मुक्ताफळे ऐकून सारे चकित झाले. बरे, या विषयाचा त्याचा सखोल अभ्यास आहे, त्याचे चार-दोन लेख प्रसिद्ध झालेले आहेत, असेही नव्हते. त्याचे एक पुस्तक प्रसिद्ध झालेले असले, तरी ते वेगळ्या विषयावरचे होते आणि त्या ग्रंथालाही फारशी गुणवत्ता नव्हती. 
तो अधूनमधून कविता करतो, हे आम्हा सर्वाना ज्ञात होते; पण त्याच्या कविता म्हणजे क्रियापदे गाळलेले गाळीव गद्य वाटायचे किंवा रंगीबेरंगी अशा यमक साधणा:या शब्दांची ती माळ वाटायची. ‘गडे-नागडे, साकडे-लाकडे, तुरी-अस्तुरी, इतके तिकडे-चोहीकडे आनंदी आनंद गडे’ अशा अवगुणांनी त्याची कविता माखलेली असली, तरी केशवसुत, मर्ढेकर, कुसुमाग्रज, करंदीकर यानंतरचा श्रेष्ठ कवी मीच, अशी त्याची भाषा असायची. काही माणसे अध्र्या हळकुंडाने पिवळी होतात, पण या थोर कवीला आणि थोर समीक्षकाला पिवळे होण्यासाठी अर्धे हळकुंड नुसते अंगाला टेकविले, तरी पुरेसे व्हायचे.
दुस:या दिवशी चर्चासत्रला प्रारंभ होण्यापूर्वी आम्ही सारे चहापान करीत होतो. मोजकेच लेखन केलेले, पण सखोल व्यासंग असलेले त्या भागातील दोन निवृत्त प्राध्यापकही शेजारी होते. कुणी काय लिहिले, नवे कुणी काय वाचले, यांवर आमची चर्चा चाललेली असतानाच हे थोर पंडित आमच्या शेजारी येऊन बसले. आमची चर्चा एका नव्या समीक्षाग्रंथावर चालली असताना मध्येच हा तसा बडबडला. म्हणाला, ‘‘काय आहे त्या पुस्तकात? चार इंग्रजी पुस्तके हाताशी घेऊन तयार केलेला हा उद्योग आहे. त्याला फार अक्कल लागत नाही. नाही तरी त्याला काय येते? तो अमुकअमुक गडी स्वत:ला विद्वान प्राध्यापक समजतो. पण, सारा उसने-पासने- मागून घेतलेला हा प्रपंच. कागद आणि शाई सोडली, तर त्याचे स्वत:चे त्या ग्रंथात काय आहे? आपण उगीच खोटय़ा स्तुतीची मोरपिसे लावतो या लोकांना.’’ त्यावर सेवानिवृत्त झालेले प्राध्यापक अस्वस्थ झाले. त्यांनी आपला चहाचा कप शेजारी ठेवला. कदाचित त्यांना त्याची पूर्ण माहिती असावी. कदाचित, ते त्याला शिकवायला असावेत. त्याचा वकूबही त्यांना ठाऊक असावा. त्यांच्याकडे वळून ते म्हणाले, ‘‘पुस्तक न वाचता, त्या विषयातले आपणाला फारसे ठाऊक नसताना अशी मूर्ख बडबड करणो चुकीचे आहे. त्याला आपण खोटी तरी चार मोरपिसे लावतो. पण, तुला कोण लावतो आणि किती लागली? कुणावरही अशी उथळ टीका करणो, प्रत्येकाची अक्कल काढणो म्हणजे स्वत: ज्ञानी नव्हे. तुझा पीएच. डी. प्रबंध मला ठाऊक आहे. तूच मला कमी-जास्त बघण्यासाठी दिला होता. तो काय पात्रतेचा आहे, मी जाणतो. तुङो शुद्धलेखन मला ठाऊक आहे. तुला सीता-गीता शब्द लिहिता येत नाहीत. वारांगणा आणि वीरांगना, रोडगा आणि रोडका, घास आणि घाट यांतला अर्थभेद तुला ठाऊक नाही. निदरेष आणि सुसंगत वाक्यरचना तुला जमत नाही. 
नेत्रदीपक वैचारिक ङोप घेतलेला आणि मौलिक विचार सांगणारा तुझा लेख सांगशील का आम्हाला? बाळा, हे बरे नव्हे. हा उथळपणा झाला. मत्सराचा आविष्कार म्हणजे ज्ञान नव्हे. कोणताही माणूस पूर्ण नसतो. त्यांच्यातला चांगुलपणा घ्यावा. हीनपणा दुर्लक्षित करावा. तुझा स्वभाव म्हणजे जनावराला झालेल्या जखमेवर नजर ठेवून त्यातले किडे खाणा:या कावळ्यासारखा झाला.’’ 
‘‘सर, पण मला असं म्हणायचं होतं की..’’ असे तो म्हणू लागताच ते प्राध्यापक म्हणाले, ‘‘एखादी रेघ पुसून छोटी करण्यापेक्षा त्या रेषेखाली मोठी ठळक रेघ आपण काढायची असते. बिरबलाने आपणाला हेच दाखवून दिले आहे.’’ 
शरमिंदा चेहरा न दाखवता तो खाली मान घालून बसला.
 
(लेखक ज्येष्ठ साहित्यिक असून, मराठी भाषा, लोकसंस्कृती यांचे ज्येष्ठ अभ्यासक व 
निवृत्त प्राचार्य आहेत.)