शहरं
Join us  
Trending Stories
1
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
2
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
3
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
4
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
5
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
6
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
7
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
8
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
9
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
10
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
11
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
12
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
13
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
14
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
15
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
16
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
17
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
18
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
19
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
20
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट

ग्रीन हायवे

By admin | Updated: August 29, 2015 15:26 IST

‘‘पर्यावरणाला बाधा पोहोचवून केलेला विकास काय कामाचा? यापुढे महामार्ग चकचकीत तर होतीलच, पण त्यांचं नैसर्गिक सौंदर्यही वाढेल. वृक्षारोपणासाठी लागणारी जागा पूर्वी गृहीतच धरली जात नव्हती, आता त्यासाठी स्वतंत्र नियोजन केलं जाईल. पैशांची ददात असणार नाही आणि ‘हरित महामार्गाचा देश’ अशी भारताची नवी ओळख निर्माण होईल.’’

नितीन गडकरी

(केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री)
 
विकासाची संकल्पना बदलणारी दीड लाख किलोमीटर हरित महामार्गाची महत्त्वाकांक्षी योजना.
काय आहे या योजनेत?
 
विकास आणि पर्यावरण!
या दोन गोष्टी वेगवेगळ्या कशा असू शकतात?
पर्यावरणाशिवाय विकास होऊच शकत नाही आणि त्याचं भान प्रत्येकालाच असायला हवं.
या दोन्ही गोष्टी हातात हात घालून वावरत असतील तर ‘मेक इन इंडिया’चा आपला प्रवास आणखी सोपा होईल. आपल्याला विकास तर हवा आहेच; पण त्यासाठी पर्यावरणाचा समतोल कदापि बिघडता कामा नये. रस्ते गुळगुळीत व्हायला हवेत, पण सोबत आजूबाजूच्या झाडांनी त्यांचे सौंदर्यही वाढायला हवे. 
अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, ‘अमेरिकन रोड्स आर नॉट गुड, बिकॉज अमेरिका इज रिच. बट अमेरिका इज रिच, बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड.’ वरुन अगदी साधे वाटणारे हे वाक्य, पण त्यात खूप तथ्य आहे. 
गेल्या 65 वर्षात विकासाकडे आणि विकासाच्या महामार्गाकडे नेणा:या रस्त्यांकडे अपवाद वगळता पुरेसे लक्षच दिले गेले नाही. यापुढे आता तसे होणार नाही. त्यासाठीच आम्ही विकासाचा हरित महामार्ग हाती घेतला आहे. 
देशातील नव्या-जुन्या तब्बल एक लाख 4क् हजार किलोमीटरच्या महामार्गाना हरित करणा:या या योजनेचे नाव आहे. ‘ग्रीन हाय-वे..’ एनडीए सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत या योजनेतून देशभरातील महामार्गावरील जळमटं दूर केली जातील आणि दळणवळणाबरोबरच देशाच्या विकासाचा एक नवा मार्ग त्यातून खुला होईल.
पुणो-मुंबईसारख्या काही महामार्गाचा अपवाद सोडला तर आपल्याकडील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. अनेक रस्त्यांची वेळेवर डागडुजी केली जात नाही. ज्या रस्त्यांची डागडुजी होते तीही फार काळ टिकत नाही. त्यामुळे यापुढे डांबरीकरणाला बाय-बाय करायला हवा. पुणोकरांनी अंतर्गत रस्ते करत असताना चांगला प्रयोग राबविला आहे. रॉ मटेरियल वापरून त्यांनी खर्चातही कपात केली आहे. आता 40-45 वर्षे यारस्त्याकडे पाहण्याची गरज नाही. 
रॉ मटेरियलमधून काँक्रीटीकरण करण्यावर आमचा भर असेल. त्यामुळे खर्च तर मोठय़ा प्रमाणावर कमी होईलच, शिवाय डांबरी रस्त्यांसारखी वारंवार डागडुजीची चिंता राहणार नाही. केवळ महामार्ग चकचकीत करून आम्ही थांबणार नाही. पर्यावरणाला बाधा पोहोचवून केलेला विकास आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही हरित महामार्ग निर्माण करणार आहोत. वाहतूक मंत्रलयाच्या या योजनेतून देशभरातील महामार्ग पर्यावरणपूरक होतील. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल, प्रदूषणाला आळा बसेल आणि पर्यावरणालाही हातभारही लागेल.