शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन हायवे

By admin | Updated: August 29, 2015 15:26 IST

‘‘पर्यावरणाला बाधा पोहोचवून केलेला विकास काय कामाचा? यापुढे महामार्ग चकचकीत तर होतीलच, पण त्यांचं नैसर्गिक सौंदर्यही वाढेल. वृक्षारोपणासाठी लागणारी जागा पूर्वी गृहीतच धरली जात नव्हती, आता त्यासाठी स्वतंत्र नियोजन केलं जाईल. पैशांची ददात असणार नाही आणि ‘हरित महामार्गाचा देश’ अशी भारताची नवी ओळख निर्माण होईल.’’

नितीन गडकरी

(केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री)
 
विकासाची संकल्पना बदलणारी दीड लाख किलोमीटर हरित महामार्गाची महत्त्वाकांक्षी योजना.
काय आहे या योजनेत?
 
विकास आणि पर्यावरण!
या दोन गोष्टी वेगवेगळ्या कशा असू शकतात?
पर्यावरणाशिवाय विकास होऊच शकत नाही आणि त्याचं भान प्रत्येकालाच असायला हवं.
या दोन्ही गोष्टी हातात हात घालून वावरत असतील तर ‘मेक इन इंडिया’चा आपला प्रवास आणखी सोपा होईल. आपल्याला विकास तर हवा आहेच; पण त्यासाठी पर्यावरणाचा समतोल कदापि बिघडता कामा नये. रस्ते गुळगुळीत व्हायला हवेत, पण सोबत आजूबाजूच्या झाडांनी त्यांचे सौंदर्यही वाढायला हवे. 
अमेरिकन प्रेसिडेंट जॉन केनेडी यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे. ते म्हणतात, ‘अमेरिकन रोड्स आर नॉट गुड, बिकॉज अमेरिका इज रिच. बट अमेरिका इज रिच, बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड.’ वरुन अगदी साधे वाटणारे हे वाक्य, पण त्यात खूप तथ्य आहे. 
गेल्या 65 वर्षात विकासाकडे आणि विकासाच्या महामार्गाकडे नेणा:या रस्त्यांकडे अपवाद वगळता पुरेसे लक्षच दिले गेले नाही. यापुढे आता तसे होणार नाही. त्यासाठीच आम्ही विकासाचा हरित महामार्ग हाती घेतला आहे. 
देशातील नव्या-जुन्या तब्बल एक लाख 4क् हजार किलोमीटरच्या महामार्गाना हरित करणा:या या योजनेचे नाव आहे. ‘ग्रीन हाय-वे..’ एनडीए सरकारच्या ‘स्वच्छ भारत’ मिशन अंतर्गत या योजनेतून देशभरातील महामार्गावरील जळमटं दूर केली जातील आणि दळणवळणाबरोबरच देशाच्या विकासाचा एक नवा मार्ग त्यातून खुला होईल.
पुणो-मुंबईसारख्या काही महामार्गाचा अपवाद सोडला तर आपल्याकडील रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. अनेक रस्त्यांची वेळेवर डागडुजी केली जात नाही. ज्या रस्त्यांची डागडुजी होते तीही फार काळ टिकत नाही. त्यामुळे यापुढे डांबरीकरणाला बाय-बाय करायला हवा. पुणोकरांनी अंतर्गत रस्ते करत असताना चांगला प्रयोग राबविला आहे. रॉ मटेरियल वापरून त्यांनी खर्चातही कपात केली आहे. आता 40-45 वर्षे यारस्त्याकडे पाहण्याची गरज नाही. 
रॉ मटेरियलमधून काँक्रीटीकरण करण्यावर आमचा भर असेल. त्यामुळे खर्च तर मोठय़ा प्रमाणावर कमी होईलच, शिवाय डांबरी रस्त्यांसारखी वारंवार डागडुजीची चिंता राहणार नाही. केवळ महामार्ग चकचकीत करून आम्ही थांबणार नाही. पर्यावरणाला बाधा पोहोचवून केलेला विकास आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही हरित महामार्ग निर्माण करणार आहोत. वाहतूक मंत्रलयाच्या या योजनेतून देशभरातील महामार्ग पर्यावरणपूरक होतील. यातून स्थानिकांना रोजगार मिळेल, प्रदूषणाला आळा बसेल आणि पर्यावरणालाही हातभारही लागेल.