शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सर्पराज्ञीत कोल्ह्याच्या सोनेरी स्मृती अद्यापही कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 18:13 IST

निसर्गाच्या कुशीत : बालपणीच्या गोष्टीतल्या चतुर, धूर्त, कपटी, लबाडीच्या कथा आपण ज्या प्राण्याबद्दल वाचत व ऐकत आलो आहोत, असा कोल्हा हा प्राणी. अशाच एका सोनेरी कोल्ह्याच्या सर्पराज्ञीतील सोनेरी स्मृती माझ्या मनात कायम आहेत. प्रत्यक्षात सहवास देऊन चटका लावून गेलेल्या या मुक्या जिवाविषयी...

- सिद्धार्थ सोनवणे

गोमळवाडा (ता. शिरूर, जि. बीड) येथील शेतकरी भागवत काकडे यांच्या विहिरीत कोल्हा पडला असल्याची माहिती मिळताच मी व माझे मित्र इतेश चव्हाण, चंद्रकांत औसरमल, समीर पठाण व वनकर्मचारी शिवाजी आघाव घटनास्थळी गेलो. हा कोल्हा ५० फूट खोल विहिरीतून वर येण्यासाठी धडपडत होता. विहिरीत उतरून त्याला पकडणे धोक्याचे असल्याने वाघुरीने (जाळ्याने) पकडण्याचे ठरवले. त्यानंतर मी मित्रांच्या मदतीने हळूहळू विहिरीत वाघूर सोडत होतो. वाघूर कोल्ह्याच्या जवळ जात होती तसा हा कोल्हा वाघुरीवर धावून येत होता. 

कोल्हा वाघुरीच्या जवळ येताच मी वाघूर त्याच्या बरोबर अंगावर सोडली. तसा तो चवताळून स्वत:ला सोडवून घेण्याच्या धडपडीत वाघुरीत जास्तच अडकून गेला. त्यानंतर त्याला वर काढले. बाहेर आल्यानंतर तो आमच्याही अंगावर धावून येत होता. त्यामुळे मित्रांनी त्याच्या तोंडावर पोते टाकून वाघुरीतून त्याला बाहेर काढले. तो चांगलाच जखमी झालेला होता. नाका-तोंडातून, डाव्या पायातून रक्त वाहत होते. त्याच्यावर तातडीने उपचार करणे गरजेचे असल्याने त्याला पोत्यात टाकून मी आणि वनकर्मचारी शिवाजी आघाव मोटारसायकलवर घेऊन शिरुर कासार येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात आलो. 

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. वाघमारे व डॉ. आंधळे यांनी त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर आम्ही त्याला सर्पराज्ञीत आणून पिंजऱ्यात मोकळे सोडले. तो एका कोपऱ्यात जाऊन आमच्याकडे पाहत बसला. त्याला सृष्टीने प्यायला पाणी आणि खायला मटण, बोरे टाकली. कोल्हा हा निव्वळ मांसाहारी प्राणी नाहीत. तो फलाहारही करतो. त्यामुळे कोल्ह्याकडून निसर्गातील सफाईचे काम तर होतेच. शिवाय जंगल निर्मितीचे कार्यही अविरत चालू राहते. 

दुसऱ्या दिवशी त्याने त्याला टाकलेले खाद्य संपवले होते आणि पहिल्यासारखा तो घाबरत नव्हता. तो आमच्याकडे प्रेमाने पाहत होता. त्याच्या चेहऱ्यावर क्रू रता दिसून येत नव्हती. आम्ही आमच्याकडे उपचारासाठी आणलेल्या प्रत्येक प्राण्याला नाव ठेवतो आणि त्याला त्याच नावाने बोलत राहतो. ‘जॉकी’ असे नाव या कोल्ह्याला आम्ही देऊन टाकले. ५-६ दिवसांतच जॉकी आमचा चांगलाच सोबती झाला. आता त्याला उपचारासाठी पकडण्याची गरज नव्हती. बोलत बोलत मी त्याच्या जवळ जायचो. त्याला मानेजवळ हळूहळू कुरवाळत मांडीवर घ्यायचो. सृष्टी मग खुशाल त्याची मलमपट्टी करायची.

१५ दिवसांनंतर त्याची जखम पूर्ण बरी झाली होती. त्याला आता निसर्गात मुक्त करणे गरजेचे होते. त्यामुळे मी व वनकर्मचारी शिवाजी आघाव त्याला मोटारसायकलवर घेऊन जंगलात गेलो. जंगलात सोडताच तो थांबून एकटक माझ्याकडे पाहत राहिला. नंतर हळूहळू जंगलाच्या दिशेने चालू लागला. पुढे काही अंतरावर गेल्यावर आणखी एकदा पाहून त्याने आमचा निरोप घेतला. 

टॅग्स :forestजंगलdoctorडॉक्टर