शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

खरी आकडेवारी द्या, शाबासकी घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 06:05 IST

गावातील कर्मचार्‍यांनी कुठलीही लपवाछपवी न करता, गावातली कुपोषित मुलं हुडकून काढली, त्यासाठी मेहनत घेतली आणि ‘खरी’ आकडेवारी सादर केली. त्यात अनेक गोष्टींची भर घालत कुपोषण निर्मूलनाचं ‘नाशिक मॉडेल’ आकाराला आलं..

ठळक मुद्देसत्कार आणि सन्मान मिळू लागल्यानं जे काम अगोदर कमीपणाचं वाटायचं किंवा आकडेवारी दडवण्याचा प्रकार व्हायचा तो बंद झाला, कर्मचारी प्रोत्साहित झाले.

डॉ. नरेश गिते (मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक जिल्हा परिषद)ठिकाण : नाशिक जिल्हा

काय केले?नाशिक जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील कुळवंडी हे टिकलीएवढं गाव. या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, पर्यवेक्षिका, आरोग्यसेवक, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका. या सर्व कर्मचार्‍यांना व्यासपीठावर बोलवून नाशिक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांचा जाहीर सत्कार केला. नाशिक जिल्हा परिषदेचा कार्यभार हाती घेतल्यानंतर डॉ. गिते यांनी काही दिवसांत पहिली कृती केली ती हीच. कारण या गावातील कर्मचार्‍यांनी कुठलीही लपवाछपवी न करता, गावातली कुपोषित मुलं हुडकून काढली, त्यासाठी मेहनत घेतली आणि ‘खरी’ आकडेवारी सादर केली. त्यात अनेक गोष्टींची भर घालत कुपोषण निर्मूलनाचं ‘नाशिक मॉडेल’ आकाराला आलं. आणखी काय काय केलं त्यांनी?.1. कुपोषित निर्मूलन हा नाशिक जिल्हा परिषदेचा सर्वाधिक अग्रक्रमाचा विषय केला.2. आयसीडीएस आणि आरोग्य विभागात समन्वय साधला. 3. कर्मचार्‍यांना प्रोत्साहित, सन्मानित करतानाच काही हजार कर्मचार्‍यांना प्रशिक्षित केलं. उजळणी प्रशिक्षण वर्ग घेतले, कर्मचार्‍यांतला न्यूनगंड झटकून टाकला.4. जिल्ह्यातल्या प्रत्येक बाळाचं वजन, उंची होईल, कुपोषित बालक शोधून त्यावर उपचार होतील याकडे कटाक्षानं लक्ष पुरवलं.5. कुपोषित किंवा त्या वाटेवर असलेल्या प्रत्येक बाळाला सुयोग्य आहार आणि उपचार मिळतील याची व्यवस्था केली.6. सरकारी मदतीची वाट न पाहता ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांचा थेट सहभाग मिळवला. 7. बाळांच्या आईलाही प्रशिक्षित केलं. 8. कुपोषणासंदर्भात ग्रामपंचायतींनाच ‘ओनरशिप’ देताना अंगणवाडीसेविकांवर विश्वास टाकला. त्यासाठीचा निधी थेट त्यांच्या खात्यात वर्ग केला.9. बालकल्याणाचा जो निधी पूर्वी टेबल, खुच्र्या, शिलाई मशीन यांसारख्या गोष्टींवर खर्च व्हायचा किंवा पडून राहायचा, तो कुपोषणाकडे वळवून आहे त्याच निधीचं नियोजन केलं.10. गावपातळीवरच कुपोषणाचा बंदोबस्त केला. 

काय घडले?1. सुरुवातीला कुपोषित मुलांची संख्या वाढली; पण खरी माहिती मिळाल्यानं त्यांच्यावर उपचार करणं सोयीचं झालं.2. हजारो कुपोषित बालकांना उपचार मिळाले.3. सत्कार आणि सन्मान मिळू लागल्यानं जे काम अगोदर कमीपणाचं वाटायचं किंवा आकडेवारी दडवण्याचा प्रकार व्हायचा तो बंद झाला, कर्मचारी प्रोत्साहित झाले.4. कुपोषित बालकांना दिवसातून आठ वेळा अमायलेजयुक्त व सकस आहार मिळू लागला.5. कुपोषित बालकांची संख्या तर झपाट्यानं खाली आलीच; पण जी कुपोषणाच्या वाटेवर होती, त्यांनाही त्यापासून वाचवता आलं. 5. मातेच्या गर्भधारणेपासून पहिले 1000 दिवस अत्यंत महत्त्वाचे मानले जाऊन त्यांना टारगेट केलं गेल्यामुळे त्यांच्या भविष्यातील कुपोषणाची आणि कमजोरीचीही समस्या मिटली. 6. अनेक कुपोषित बालकांचं वजन एका महिन्यातच पाचशे ते एक हजार ग्रॅमपर्यंत वाढलं.7. कुपोषणासंदर्भात ग्रामपंचायत, गाव आणि नागरिक स्वत:च सक्षम झाले.8. गावागावांत ग्राम बालविकास केंदं्र स्थापन झाली.9. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कुपोषण निर्मूलनाचा उपक्रम देशात नाशिकमध्ये पहिल्यांदाच राबवला गेला.10. नाशिकचं हे मॉडेल आता देशभरात राबवलं जाण्याची शक्यता आहे.

निम्मी लढाई जिंकली की!कुपोषणाला सरकारला जबाबदार धरलं जातं; पण यासंदर्भात ग्रामपंचायतींना ओनरशिप का दिली जाऊ नये? स्थानिक स्वराज्य संस्थांना जबाबदारी द्या, अंगणवाडीसेविकांवर विश्वास टाका, त्यांना खर्चाचा अधिकार द्या. तसं जर झालं, त्यांच्यावर विश्वास टाकला, जबाबदारी दिली, तर सारेच अधिक जबाबदारीनं काम करतील. कुपोषणाविरुद्धची निम्मी लढाई आपण तिथेच जिंकू शकतो. - नरेश गिते

(मुलाखत आणि शब्दांकन : समीर मराठे, लोकमत, नाशिक)

टॅग्स :Poshan Parikramaपोषण परिक्रमा