शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
4
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
5
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
6
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
7
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
8
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
9
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
10
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
11
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
12
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
13
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
14
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
15
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
16
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
17
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
18
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
19
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
20
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...

‘डॉग थेरपी’ घ्या, आजार पळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:35 IST

कुत्रा हा अनंत काळापासून माणसाचा मित्र आणि त्याचा सोबती मानला जातो. अनेक गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढण्यात तर प्रशिक्षित कुत्र्यांचा हातखंडा आहे. अनेक आजारांवरील उपचारांसाठीही कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र ठरू शकतो असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.

ठळक मुद्देज्यांना अगोदर हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्यांनी कुत्र्याशी दोस्ती केली तर या आजारामुळे येऊ शकणाऱ्या मृत्यूचं प्रमाण तब्बल ३३ टक्क्यांनी कमी होऊ शकतं.

एकटेपणा वाटणं, नैराश्य येणं, कमी वयातच हृदयाचे प्रॉब्लेम्स सुरू होणं, ही गोष्ट आता संपूर्ण जगासाठीच नवीन राहिलेली नाही. अनेकांना लहान वयातच हे त्रास होताहेत आणि त्याचं प्रमाणही जगभर वाढत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे.

हे आजार कसे कमी करता येतील, त्यावर प्रभावी उपचार कोणते आहेत, याबाबत निरंतर संशोधनही सुरू आहे. पण याचसंदर्भात स्वीडनमध्ये झालेल्या एका आगळ्यावेगळ्या संशोधनानं अनेकांना दिलासा दिला आहे.

एरवी या आजारांवर अनेक औषधोपचार, पैसा खर्च करावा लागतो, पण या स्वीडिश संशोधनानं केवळ औषधांवरचंच अवलंबित्व कमी होऊ शकतं हे शोधून काढलं आहे.

कुत्रा हा अनंत काळापासून माणसाचा मित्र आणि त्याचा सोबती मानला जातो. अनेक गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढण्यात तर प्रशिक्षित कुत्र्यांचा हातखंडा आहे. या आजारांवरील उपचारांसाठीही कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र ठरू शकतो असं त्यांनी सिद्ध केलं आहे आणि कुत्रा पाळण्याचा सल्लाही दिला आहे. कुत्र्याशी दोस्ती केली तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता, किमान ते आजार कमी करू शकता असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

थोडाथोडका नव्हे, तर तब्बल १२ वर्षे त्यांनी यावर संशोधन केलं आहे आणि आपला निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे.

ज्यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी कुत्रा हा सर्वेात्तम मित्र ठरू शकतो, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार ज्यांना अगोदर हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्यांनी कुत्र्याशी दोस्ती केली तर या आजारामुळे येऊ शकणाऱ्या मृत्यूचं प्रमाण तब्बल ३३ टक्क्यांनी कमी होऊ शकतं. जे आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि सोबत कुत्राही पाळलेला आहे, अशांचाही मृत्यूचा धोका १५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. याशिवाय नैराश्य आणि एकटेपणावरही कुत्र्यांची सोबत खूपच फायदेशीर ठरु शकते, अनेकांचे विविध आजार सुसह्य होऊ शकतात आणि त्यांचं आरोग्य तुलनेत चांगल्या वेगानं सुधारु शकतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.