शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

‘डॉग थेरपी’ घ्या, आजार पळवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 00:35 IST

कुत्रा हा अनंत काळापासून माणसाचा मित्र आणि त्याचा सोबती मानला जातो. अनेक गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढण्यात तर प्रशिक्षित कुत्र्यांचा हातखंडा आहे. अनेक आजारांवरील उपचारांसाठीही कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र ठरू शकतो असं शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.

ठळक मुद्देज्यांना अगोदर हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्यांनी कुत्र्याशी दोस्ती केली तर या आजारामुळे येऊ शकणाऱ्या मृत्यूचं प्रमाण तब्बल ३३ टक्क्यांनी कमी होऊ शकतं.

एकटेपणा वाटणं, नैराश्य येणं, कमी वयातच हृदयाचे प्रॉब्लेम्स सुरू होणं, ही गोष्ट आता संपूर्ण जगासाठीच नवीन राहिलेली नाही. अनेकांना लहान वयातच हे त्रास होताहेत आणि त्याचं प्रमाणही जगभर वाढत आहे. याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनंही चिंता व्यक्त केली आहे.

हे आजार कसे कमी करता येतील, त्यावर प्रभावी उपचार कोणते आहेत, याबाबत निरंतर संशोधनही सुरू आहे. पण याचसंदर्भात स्वीडनमध्ये झालेल्या एका आगळ्यावेगळ्या संशोधनानं अनेकांना दिलासा दिला आहे.

एरवी या आजारांवर अनेक औषधोपचार, पैसा खर्च करावा लागतो, पण या स्वीडिश संशोधनानं केवळ औषधांवरचंच अवलंबित्व कमी होऊ शकतं हे शोधून काढलं आहे.

कुत्रा हा अनंत काळापासून माणसाचा मित्र आणि त्याचा सोबती मानला जातो. अनेक गुन्हे आणि गुन्हेगार शोधून काढण्यात तर प्रशिक्षित कुत्र्यांचा हातखंडा आहे. या आजारांवरील उपचारांसाठीही कुत्रा हा माणसाचा अतिशय जवळचा मित्र ठरू शकतो असं त्यांनी सिद्ध केलं आहे आणि कुत्रा पाळण्याचा सल्लाही दिला आहे. कुत्र्याशी दोस्ती केली तर अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता, किमान ते आजार कमी करू शकता असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

थोडाथोडका नव्हे, तर तब्बल १२ वर्षे त्यांनी यावर संशोधन केलं आहे आणि आपला निष्कर्ष प्रसिद्ध केला आहे.

ज्यांना पूर्वी हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी कुत्रा हा सर्वेात्तम मित्र ठरू शकतो, असं या संशोधकांचं म्हणणं आहे.

त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निष्कर्षानुसार ज्यांना अगोदर हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे, त्यांनी कुत्र्याशी दोस्ती केली तर या आजारामुळे येऊ शकणाऱ्या मृत्यूचं प्रमाण तब्बल ३३ टक्क्यांनी कमी होऊ शकतं. जे आपल्या कुटुंबासोबत राहतात आणि सोबत कुत्राही पाळलेला आहे, अशांचाही मृत्यूचा धोका १५ टक्क्यांनी कमी होऊ शकतो. याशिवाय नैराश्य आणि एकटेपणावरही कुत्र्यांची सोबत खूपच फायदेशीर ठरु शकते, अनेकांचे विविध आजार सुसह्य होऊ शकतात आणि त्यांचं आरोग्य तुलनेत चांगल्या वेगानं सुधारु शकतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.